श्री गजानन महाराज लीला दर्शन 2

Nov 11, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

 

श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे… ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत .
आपण पहिल्या लीलेत पाहिले कि ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कचरा कुंडी मध्ये फेकलेल्या उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात होते… आता हे दृश्य येणारे जाणारे लोक पाहत होते… परंतु त्यांच्यापाशी जाऊन कोणी त्यांच्याशी बोलले नाही… त्याच वेळेस त्या तिथून श्री बंकटलाल व त्यांचे स्नेही श्री दामोदरपंत कुलकर्णी तिथून जात होते… श्री बंकटलाल अग्रवाल यांनी पहिले कि महाराज कचरा कुंडीत टाकलेल्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात आहेत… हे पाहून ते श्री दामोदरपंत कुलकर्णी यांना म्हणाले कि आपणस दिसताना हे सर्वसामान्य व्यक्ती वाटत आहेत परंतु नक्कीच हे सामान्य व्यक्ती नसावेत कारण जर हे सामान्य व्यक्ती असते तर त्यांनी अन्न मागून खाल्ले असते आणि श्री पातुरकर यांनी सुद्धा त्यांना जेवण दिले असते… हे नक्कीच कुणीतरी मोठे संत असावेत… त्यानंतर श्री बंकटलाल श्री महाराजान जवळ गेले… आणि विनयपूर्वक श्री महाराजांना विचारले कि ” महाराज आपण हे काय करत आहात ? आपणस भूख लागली आहे का ? मी आपल्या साठी भोजन घेऊन येऊ का ? श्री महारांजानी त्यांच्याकडे पहिले… त्यांची तेजः पुंजः मुद्रा पाहून श्री बंकटलाल यांना काय बोलावे हे सुचलेच नाही व ते लगेचच श्री पातुरकर यांच्या कडे गेले व त्यांच्या कडून भोजनाचे ताट घेऊन आले… त्यात विविध पदार्थ होते.. सर्वांनी श्री महाराजांना भोजन करण्याची विनंती केली… महाराजांनी ताटातील सर्व पदार्थ एकत्र केले व भोजन केले… हा सर्व प्रकार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले… आणि त्याच वेळी श्री श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे… ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत .
| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||
बोध -वरील लीलेच्या माध्यमातून आपणस अनेक बोध प्राप्त होत आहेत… ब्रम्हांड नायकाची प्रत्येक लीला आपणस शिकवण देण्यासाठीच असते… परंतु ती समजण्यासाठी श्री बंकटलाल अग्रवाल यांच्या सारखी भक्ती असावी लागते… पहा ना वरील लीलेत असंख्य लोक त्या रस्त्यावरून गेले… परंतु प्रत्येकाने हाच विचार केला कि कुणीतरी सामान्य व्यक्ती आहे… भूख लागली असेल त्या कारणाने… कचरा कुंडीत टाकलेल्या पत्रावळी वरील भाताचे शीत खात असतील… त्याच रस्त्याने श्री बंकटलाल अग्रवाल त्यांच्या स्नेह्या सोबत जात असताना त्यांनी पाहता क्षणी ओळखले कि हे कुणी सामान्य व्यक्ती नसावेत… पहा त्यांची चेतनेची अवस्था कि उच्च होती… तत्यांची लीला पाहूनच त्यांनी ओळखले कि हे कुणी सामान्य व्यक्ती असू शकत नाहीत… श्री महाराज यांनी सर्व पदार्थ एकत्र केले व त्या नंतर भोजन केले… थोडक्यात बंकटलाल यांच्या मनात जे प्रश्न निर्माण होत होते.. त्या प्रश्नाचे श्री महाराजांनी काही न बोलता उत्तर दिले… खरोखर श्री बंकटलाल यांची भक्ती ची अवस्था किती उच्च्तम असेल कि त्यांनी श्री महाराजांची लीला पाहूनच समजून गेले कि … हे कुणी सामान्य व्यक्ती असूच शकत नाहीत… आपणस श्री महाराज हा सुद्धा बोध देत आहेत कि.. अनेकदा काय होते कि आपणस अनेक पदार्थ आवडत नसतात त्यामुळे आपण ते खात नाहीत… परंतु श्री महाराज आपणस सांगत आहेत कि कोणत्याही पदार्थाचा स्वाद हा जीभेपर्यंत मर्यादित असतो… अन्न हे आपल्या शरीराची गरज आहे… त्याचे मुख्य काम आपल्या पोटाची तृष्णा शांत करणे … आणि आपणस शक्ती… स्फूर्ति देणे आहे… स्वाद घेणे हे उद्दिष्ट नाही…. त्या मुळे आपणस सर्व अन्न पदार्थांचे सेवन देवाचा प्रसाद म्हणून करायचे आहे …आणि हाच गोष्ट आपल्याला आपल्या मुलांना शिकवायची आहे … !

| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… श्री गजानन महाराज.. आम्ही आपली लीला समजण्यास असमर्थ आहोत… आमच्या चेतनेची पायरी( समज) फारच कमी आहे… परंतु तुमची कृपा असेल तर नक्कीच ती वाढेल … आम्ही आपणास प्रार्थना करतो कि जशी कृपा श्री बंकटलाल अग्रवाल यांच्यावर केलीत.. त्या पात्रतेचे आम्हाला बनव… ! धन्यवाद आई… धन्यवाद हि प्रार्थना करवून घेतल्या बद्दल धन्यवाद!


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...