साडेसाती म्हणजे – आपला उत्कर्ष

Oct 31, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

लेखाचे शीर्षक वाचून आपण म्हणाल हे काय सांगता… आज पर्यंत आम्ही साडेसाती म्हंटले कि आम्ही फारच घाबरतो… कुणाला विचारले कि तुम्हाला साडेसाती सुरु आहे का ? आणि जर खरंच त्या व्यक्तीला साडेसाती सुरु असेल तर तो… त्याला त्रास असो वा नसो तो म्हणतो हो ना खूपच त्रास आहे… साडेसाती सुरु आहे… त्याला जर विचारले साडेसाती म्हणजे काय तर तो सांगू शकत नाही.. खरंच साडेसाती म्हणजे काय ? खरंच  साडेसाती म्हणजे अडचण कि आपला परिपूर्ण उत्कर्ष ? आज आपण यावर थोडीशी माहिती घेऊ या… शनी देव हे प्रत्येक राशीतून गोचर भ्रमण करत असतात हा कालावधी अडीच वर्षाचा असतो … म्हणजेच जेव्हा तो आपल्या राशीच्या आधीच्या राशीला येतो तेव्हा आपणस साडेसाती सुरु होते… म्हणजेच आपल्या राशीच्या आधीची रास अडीच वर्ष + आपली रास अडीच वर्ष + आपल्या राशी नंतर ची रास अडीच वर्ष अश्या सर्वांची बेरीज म्हणजे साडेसाती… आता आपणस साडेसाती म्हणजे काय हे समजले असावे.. आता आपणस एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनिदेव हे न्याय प्रिय देव आहेत.. आपण म्हणाल शनीदेव  न्याय प्रिय आहेत… यावर जेव्हा आपण चिंतन मनन करू तेव्हा आपणस अनेक गोष्टींची उत्तरे प्राप्त होतील..आणि नक्की साडेसाती म्हणजे काय हे आपणस समजेल… आपण जे ही  काही काम करता ते प्रामाणिक पणे करत असाल… ते काम  करत असताना कुणाचेही नुकसान आपण करत नाही… मग आपणस किती वाईट वेळ असो.. आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करावे हि शनि देवांची अपेक्षा असते…आपण जर आपले कर्म करत असताना जर चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असाल तर नक्कीच आपणास आपल्या कर्माचे फळ मिळते… मग तो कालावधी साडेसाती असतो असे म्हणण्यास हरकत नाही… जर आपण आपले कर्म प्रामाणिक पणे करत असाल तर नक्कीच आपणस साडेसाती ची तीव्रता जाणवणारा नाही… आता आपणस कळले असावे न्याय प्रिय शनिदेव आहेत… न्याय प्रिय म्हणजे फक्त चांगले वागणेच न्याय प्रिय आहे का ? खरंतर ज्यांना साडेसाती आहे त्याच्या जीवनाच्या परिवर्तन चा हा काळ असतो… मग हे परिवर्तन चांगले असू शकते वा वाईट असू शकते… चांगले किंवा वाईट हे सर्व आपल्या वर अवलंबुन असते.. आपण आपल्या मनाला सांगितले कि आता माझ्या राशीला साडेसाती सुरु आहे… त्यामुळे मला खूप त्रास होत आहे… हि साडेसात वर्ष कशी जाणार माहित नाही… त्या वेळेस शनिदेवाच्या न्याय प्रिय स्वभावानुसार ते म्हणतात तुझी इच्छा पूर्ण होवो… म्हणजेच आपले नकारात्मक मन शनिदेवांची उपासना करण्यापेक्षा त्यांचा उपहास करते..आता तुम्हीच विचार करा.. जर तुमची कुणी टीका केली तर ती तुम्ही सहन करू शकता का ?नाही ना? मग या ठिकाणी आपण न्याय प्रिय  शनी देवांना नाव ठेवतो.. आपले मन पण तेच खरे मानते…  आणि एक म्हण आपणस माहीत असेलच  ती म्हणजे… वैरी न चिंती ते मन चिंती ” या म्हणी प्रमाणे आपणस फळ प्राप्त होतात आणि मग आपण आणखीन नकारात्मक बनून… साडेसाती… साडेसाती… करत त्यात पूर्णपणे फसून जातो…आणि मग सर्व रस्ते आपणस बंद दिसतात आणि खूपच त्रास होतो.. मग आपण म्हणाला काय केले तर खरंच  आम्हाला साडेसाती जाणवणार नाही … आमची प्रगती होईल… खरंतर… साडेसाती म्हणजे आपल्या जीवनाच्या यशाचा राजमार्ग आहे… कोणत्या आईला वा बापाला  वाटते का आपले बाळ मागे राहावे नाही ना… तसेच शनिदेवांना का वाटेल माझी भक्ती करणारे माझे भक्त अधोगतीस जावेत.. नाही ना.. तर मग आजपासून आपणस आपले विचारात  परिवर्तन करायचे आहे.. आपल्या मनाला सांगा हि जी काही  साडेसाती आली आहे ती मला सांगत आहे आता तुझा उत्कर्ष चा काळ सुरु झाला आहे… आजपर्यंत नक्कीच मी माझे कर्म करताना अनेक चुका केल्या असतील… त्या चुका पुन्हा करू नकोस असे शनी महाराज सांगत आहेत…जसे घर बांधताना आधी पाया मजबूत असावा लागतो नाही तर इमारत कोसळू शकते … तसेच हि साडेसाती मला सांगत आहे… बाळा तुझा पाया मजबूत कर म्हणजेच आधी तुझे मन जे आहे ते मजबूत बनव… मन हे तुझ्या जीवनाचा पाया आहे… तो मजबूत झाला कि… मग साडेसाती म्हणजे हि जी काही साडेसात वर्ष आहेत हि.. तुझे जीवन बदलून टाकण्यासाठी आली आहेत… प्रत्येक कर्म हे प्रामाणिकपणे कर … सुरवातीला तुला खूप त्रास होणार आहे कारण… हे काम शाब्दिक नाही तर कार्मिक आहे… प्रत्येक अडचणीला सामोरे जाताना श्री शनिदेवांना धन्यवाद द्या… पहा नक्कीच आपणस आपल्या

जीवनात चमत्कार पाहण्यास मिळतील.. मग कितीही  त्रास होऊ द्या तुमचे अंतर्मनातून एकच नाद येईल तो म्हणजे… धन्यवाद शनिदेव … कोटी कोटी धन्यवाद .

चला आपण सर्व मिळून शनी देवांना प्रार्थना करूया – हे शनिदेव मला माफ करा आजपर्यंत मला असे वाटायचे कि… साडेसाती म्हणजे शनिदेवांची वक्र दुष्टी.. पण मला आज समजले आहे कि साडेसाती म्हणजे माझ्या प्रगती साठी ईश्वराने मला दिलेली एक साद… एक कालावधी ..शनी देव आपल्या मुळेच तर मी जागृत झालो आहे… माझ्याकडून आपणस अपेक्षित असणारी कर्म करवून घ्या… हि साडेसात वर्ष माझे जीवन बदलून टाकणारी ठरावीत… आणि माझे मन सदैव सकरात्मक प्रतिसाद देऊ दे… धन्यवाद शनिदेव आपण मला हि समज  दिलीत त्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद ! हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद ! श्री शनी महाराज कि जय !!


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...