नवरात्र व आपली प्रगती

Oct 7, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

 

नवरात्र म्हणजे म्हणजे आपल्या प्रगतीचा कालावधी…आपण अनेक सण- वार साजरे करतो… करत आहोत… आणि करणार आहोत पण.. आपल्या पूर्वजानी जे अनेक सण  आपणस सांगितले आहेत या मागे फार विचारपूर्वक आपल्या प्रगती चा विचार करून हे सर्व केले आहे… आपण दरवर्षी नवरात्र साजरी करतो.. उपवास करतो…अनेक गोष्टी करतो पण आपल्या प्रगती साठी या कालावधी मध्ये काय करतो… आपण म्हणाल आम्ही जे काही करतो ते आमच्या प्रगती साठीच तर करतो…खरं  तर नवरात्र म्हणजे शक्ती च्या जागृती चा उत्सव… प्रत्येक आई ला वाटते आपले मुलं खूप मोठे व्हावे… पण मग त्यासाठी आपण सुद्धा कष्ट करणे आवश्यक आहे कि  नाही… खरं तर नवरात्र उत्सव म्हणजे आध्यत्मिक उन्नतीचे पर्व..पण मग आपली अध्यात्मिक प्रगती कशी होईल… केवळ उपवास करून… तीर्थ यात्रा करून होईल का … खरतर नवरात्र म्हणजे आपल्या घरीच राहून साधना करण्याचे पर्व..या कालावधी मध्ये जपानुष्ठान साठी सर्वोत्तम असतो… आपण या काळात आपल्या ज्या कोणत्या देवावर श्रद्धा असेल त्याची अशी जप संख्या करण्याचे अनुष्ठान करावे… जसे देवीचा कोणताही मंत्राचे आपण या ९ दिवसात… २१, ५१ किंवा १ लाख जपाचे अनुष्ठान करू शकता का…यातून आपली अध्यात्मिक प्रगती तर होईलच पण त्याच बरोबर आपले चित्त स्थिर होण्यास मदत  होईल..आणि हीच खरोखर देवी भगवतीची सेवा असेल… चला तर मग आपल्या कडे जे काही दिवस आहेत त्यात अधिकाधिक आपल्यावर काम करू या… चला तर मग सेवेस सुरुवात करूयात… पुढील भागात या विषयावर अजून सविस्तर चर्चा करूया… आपले चॅनेल सुब्स्क्रिब करा इतरांनाही सांगा… धन्यवाद.. कोटी कोटी धन्यवाद

प्रार्थना – हे देवी भगवती… हा नवरात्र उत्सव आमच्या जीवन बदुलन टाकणारे होऊ दे… आम्हाला आमच्या स्वतः वर काम करण्याची प्रेरणा तू उत्सवाला निमित्त करून आम्हाला दिलीस हि तुझी कृपाच आहे… हे आई तुला भूषणावह होईल अशी कर्म रुपी सेवा आमच्या कडून करून घे… धन्यवाद आई… धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद! www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...