खरं तर तारक मंत्र म्हणजे प्रत्येक स्वामीं भक्ता साठी स्वामीं च कवच आहे..प्रत्येक शब्द हा स्वामीं अनुभूती आहे..खरंतर ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात गुंफला..त्यांची भक्ती ची अवस्था ही खूपच वरच्या पात्रते ची असणार..आणि त्यामुळेच स्वामींनी आपल्या सर्वांसाठी तारक मंत्र त्यांच्या कडून करून घेतला..ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात उतरवला त्यांचे उपकार तर आपण कधीच फेडू शकत नाही..उलट त्यांना प्रार्थना करू या ..आमच्या अल्प बुद्धी ला त्याचा अर्थ उलगडू द्या..जशी भक्ती.. सेवा तुमच्या मार्फत झाली त्यातील काही तर सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त व्हावी..आणि आमचे जीवन स्वामीं मय बनावे हीच प्रार्थना!
निःशंक हो निर्भय हो मन रे !
सुरवातीलाच स्वामीं आपल्या मनाला सांगत आहेत…हे मना..मनात कोणतीही शंका आणू नकोस..कोणतीच भीती मनात ठेवू नकोस…पहा सुरवातीलाच स्वामीं सांगत आहेत आपल्या स्वतःच्या मनावर कार्य करण्यास..कारण आपले मन हे सर्व गोष्टीचे कारक आहे..आपण मनात शंका उपस्थित केली की..आपले होणारे काम ही होत नाही..आपण मनाला सांगायच आहे..हे मना कोणतीच शंका भीती मनात आणू नकोस मनाला सांगायचं आहे..तू जी नकारात्मक बडबड करत आहेस..त्यापेक्षा स्वामीं नाम घे..मना एक गोष्ट लक्षात ठेव सर्व नकारात्मक विचारावर जे राम बाण औषध मला मिळालं आहे..ते म्हणजे “श्री स्वामीं समर्थ” हे नाम अंतर्मनात इतके रुजवा की आपले मन पण म्हणेल..अभी सिर्फ और सिर्फ श्री स्वामी समर्थ”
प्रचंड स्वामीं बळ पाठीशी रे- इथे स्वामीं महाराज आपल्या मनाला सांगण्यास सांगत आहेत ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती माझ्या पाठीशी आहे..आता इथे आपले मन शंका कुशंका निर्माण करते स्वामीं बळ पाठीशी आहे तरी पण आपले मन आपल्या मनात शंका निर्माण करते..या शंकेचे रूपांतर ..नकारात्मकते मध्ये होते..आणि आपल्यासोबत असणारी स्वामीं ची शक्ती जी कार्य करणार होती तिला अडथळा निर्माण होतो..आज आपण हाथ धुतो.. मास्क लावतो का ? कारण आपल्या मनावर हे खोल पर्यंत रुजले आहे की यानी आपण होणाऱ्या रोगाचा अटकाव करू शकतो अगदी तसेच नकारात्मक विचारांना हे माहीत आहे जर आपल्या मनावर नकारात्मक गोष्टी निर्माण झाल्या तर हा नक्कीच यांच्या पासून स्वामीं ची शक्ती बळ यांना प्राप्त होणार आहे यात अडथळा निर्माण होणार आहे..म्हणून मनाला सतत सांगा स्वामीं महाराजांची शक्ती माझ्या सतत सोबत आहे
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी…स्वामीं महाराज हे आपल्या सामान्य बुद्धी च्या पली कडे आहेत
.याचे आपणस सतत स्मरण ठेवायचे आहे..काय होतं आपल्या मनात स्वामीं विषयी एक विशिष्ट अशी कल्पना रुपी आकृती तयार आहे..आणि त्यानुसार आपण विचार करतो व मन ही यालाच सत्य मानते…आता आपण म्हणाल की मग आम्ही जी मूर्ती ..फोटो पाहतो ते स्वामीं नाहीत का ? असे नाही ते स्वामीच आहेत.. पण फक्त तसेच स्वामींचे स्वरूप जाणतो..पण स्वामीं हे चरा चरात आहेत..पण आपल्या मनावर आपण आज पर्यंत जे काही संस्कार केले आहेत..करत आहोत त्यामुळे… आपण त्यांना ओळखू शकत नाही…त्यामुळं स्वामीं या ठिकाणी सांगत आहेत..की मी सतत तुझ्या सोबत आहे पण तू कोणतेही तर्क.. वितर्क लावत बसू नकोस..कारण तू त्यातच अडकशील.
अशक्य ही शक्य करतील स्वामीं..हा तर आपल्या सर्वांसाठी स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे..जर हा आशिर्वाद रुपी मंत्र आपल्या अंतर्मनात कोरला गेला तर या सारखा सुवर्ण योग असूच शकत नाही..कारण ही खूपच उच्चतम स्वामीं कृपा असेल कारण कोणत्याही परिस्थिती मध्ये ह्रदयातून एकच हाक येईल…अशक्य ही शक्य करतील स्वामीं त्याच क्षणी आपली इच्छा पूर्ण झालेली असेल.
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन १
वेळ
भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...
राखी पौर्णिमा
राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...
आपण स्व आदर करतो का
आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...
श्री दासबोध दशक १२ समास १
श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...
नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा
आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...
श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5
संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...
श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5
लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...
श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5
श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...
श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4
ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...