अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

Sep 17, 2025 | मराठी

Share

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे…सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली, स्मरणशक्ती कमी झाली, महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या जाऊ लागल्या. …गोंधळून व्यासजी ब्रह्माजींकडे गेले आणि विचारले — “हे पितामह! माझे ज्ञान का हरवत आहे? काहीच सुचत नाही. याचे कारण काय?”ब्रह्माजींनी ध्यान करून सांगितले —“व्यासजी! आपण विद्वत्तेच्या गर्वात आहात..कुठेतरी अहंभाव आला आहे…त्यामुळे हे विस्मरण होत आहे..आपण गणेशस्मरण करा.. ते बुद्धिदाता आहेत..विघ्नहर्ता आहेत…व्यासजी नम्रतेने म्हणाले —“पण प्रभो! मला गणेशांचे स्वरूप माहीत नाही. मार्गदर्शन करा.” ब्रह्माजींनी सांगितले —
“गणेशजी हे परात्पर ब्रह्म आहेत. ‘ॐ गं गणपतये नमः’ हा मंत्र सर्वांत सोपा आणि फलदायी आहे. सकाळी स्नान करून, स्वच्छ आसनावर बसून, प्राणायाम करून या मंत्राचा जप करा. व्यासजींनी भक्तिभावाने जप सुरू केला. थोड्याच वेळात त्यांचे विस्मरण नाहीसे झाले. ज्ञान पुन्हा प्रकट झाले. आणि पुराणरचनेचे महान कार्य अखंड सुरू झाले.बोला गणपती बाप्पा मोरया..!

बोध खरंतर अध्यात्म म्हणजे… चालती बोलती..पाठशाळा…यातील अनेक कथा या आपल्या जीवनात लागू करण्यासाठी असतात..पण आपण कथा वाचून सोडून देतो..पहा या कथेत व्यासजी यांनी जे काही लिखाण कार्य केलं आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे..पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला आणि त्यांना अडथळा येऊ लागला…पहा आपल्या जीवनात ही आपण ही अनेक कार्य करत असतो…काही दिवसांनी आपल्याला असे वाटते की मी करतो म्हणून होत आहे..खरतर आज आपण जे काही कार्य करत आहोत..ते आपण नाही केलं तरी दुसरे कुणी तरी करणार आहे…उलट जर आपण जर कार्य करत आहोत त्याला एक संधी …मानले… त्या कार्या करायला मिळाले याबद्दल धन्यवाद भाव ठेवला तर..कोणतेही काम कार्य…काम न राहता ती सेवा बनेल..आणि आपल्यातील अहंभाव दूर होऊन आपण उत्कृष्ट असे कार्य करू…कारण अहंभाव आपल्यातील विचार करण्याची शक्ती कमी करतो..सेवाभाव आपली शक्ती वाढवतो…म्हणून प्रत्येक कार्य सेवा भाव ठेवून करूया…धन्यवाद बाप्पा..चला आपण गणपती बाप्पा ला प्रार्थना करूया..

प्रार्थना हे गजानना…अनेकदा आम्ही कार्य करत असताना.. आमच्यात अहंभाव निर्माण होतो..हा अहंभाव ते कार्य करताना जे लक्ष देऊन कार्य करण्याऐवजी..आमचे लक्ष…आमच्यातील अहंभाव यावर केंद्रित होते…कृपा कर..आमच्यातील अहंभाव दूर कर…कारण जे कार्य आम्ही करत आहोत..त्या साठी बुद्धिदाता तूच आहेस..विघ्नहर्ता तूच आहेस..मग मी तर फक्त निमित्त मात्र आहे..कृपा कर… हे तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही…ही समज दिल्याबद्दल धन्यवाद…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…बोला गणपती बाप्पा मोरया..!


Share
और पढिये !!

अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७) आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा , प्रसादरूपे दिलासी ! www.SwamiVaani.com आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,...

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो...पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम...

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६) आजचे चिंतन-मनन मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे ! माता म्हणोनिया !! प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी ! कुटुंब प्रमुख म्हणोनिया !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन...

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५) आजचे चिंतन-मनन नामाचा नको कंटाळा ! स्वामींचा असावा जिव्हाळा !! प्रेमभावे नित्य आळवावा ! स्वामी माझा !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ,...

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४) आजचे चिंतन-मनन अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !! निरंतर ध्यास दे समर्था ! आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.....

जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३) आजचे चिंतन-मनन जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !! ह्यातच आहे आपुले कल्याण ! संशय न धरावा मनी !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ...

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१) आजचे चिंतन-मनन तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !! दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !! दास राहीन सदैव !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो...भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द...खरच...

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता ! शरण आलो तुला !! 'मी' पणाच्या जाळ्यात,मन हे फसले ! मुक्त कर तू मला !! स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक...

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९) आजचे चिंतन-मनन वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !! प्रेमभावे दर्शना जाती , प्रत्यक्ष दिसती स्वामी !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे...

आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!

स्वामी वाणी पुष्प ५३४(पर्व ४ थे भाग ३८) आजचे चिंतन-मनन हे मना ! आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !! क्षणोक्षणी काळजी घेती भक्ताची ! ही गुरूमाऊली !! www.SwamiVaani.com या ओवीतून स्वामीं नी आपल्या मनावर प्रहार केला आहे..कोणतीही गोष्ट ही आपल्या...