शिव पुराण कथा ३

Oct 5, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

शिव पुराण कथा 3

आपण शिव पुराण च्या दुसऱ्या कथेत पाहिले की चंचुला हिला।शिव लोक प्राप्ती झाली..म्हणजेच ती मुक्त झाली..मुक्त झाल्यानंतर सुद्धा तिची शिव भक्ती सुरूच होती..ती शिव पार्वती यांच्या समोर विनम्र भावनेने उभी राहिली..तिच्या डोळ्यात आनंद अश्रू येत होते…पार्वती माता ने तर तिला आपल्या सखी चे स्थान दिले…एके दिवशी ती पार्वती माते जवळ जाते आणि विनम्र भावनेने प्रार्थना करू लागली..तिच्या प्रार्थनेतील भाव इतका खोल होता की पार्वती माता..तिला म्हणाल्या की अग सखे तुला काय हवे आहे..जे हवे ते माग… तेव्हा ती म्हणाली की माझी तर मुक्ती झाली पण माझे पती कुठे आहेत..त्यांच्या कडून अनेक चुका झाल्या आहेत…तेव्हा पार्वती माता सांगतात..तुझा पती..विंध्य पर्वतावर..पिशाच्च योनीत दुःख भोगत आहे…चंचुला हिला फार वाईट वाटले आणि तिने आपल्या पतीच्या उद्धार होण्यासाठी काय मार्ग आहे तो सांगण्याची विनंती केली…पार्वती माता सांगतात की जर त्याने शिव पुराण कथा श्रवण केली तर तो मुक्त होईल..चंचुला विचारते हे कसे शक्य आहे…हे तर आपणच करू शकता..तेव्हा पार्वती माता..शिव कीर्ती गाणारे जे गंधर्वराज तुंबूर होते त्यांना बोलावले…व सांगितले की तुम्ही या चंचुला बरोबर…विंध्य पर्वतावर जा…आणि तिथे एक पिशाच्च आहे त्याला प्रयत्न पूर्वक  शिव पुराण ची कथा ऐकवा…जेणेकरून त्याचे ह्रदय शुद्ध होईल…आणि तो पिशाच्च योनीतुन मुक्त होईल…गंधर्व तुंबूर पार्वती मातेची आज्ञा घेऊन..चंचुला बरोबर विंध्य पर्वतावर जातात..तिथे त्या पिशाच्च दिसतो.. त्याच्या समोर शिव पुराण कथा सुरू करतात…शिव कथा ऐकून त्याचे चित्त शुद्ध झाले आणि तो पिशाच्च योनीतुन मुक्त झाला..दोघे पती पत्नी शिव भक्तीत तल्लीन झाले. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !

बोध – पहा उपरोक्त लीलेत माता पार्वती यांनी चंचुला यांना सखी चे स्थान दिले.. पहा आपले आणि ईश्वराचे नाते हि मित्रत्वाचे झाले पाहिजे.. पहा त्यासाठी आपल्याला आपल्यातील दोष दूर करणे आवश्यक आहे.. पहा चंचुला हिने काय फक्त श्री शिव महा पुराण कथा श्रवण केली का ? नाही तिने आपल्यात जे काही दोष आहेत ते आधी घालवले त्यावर कार्य केले.. आपणास हि तसेच करायचे आहे.. आपले दोष आपल्याला दिसत नाही ते दिसले पाहिजे.. जेणेकरून आपण ईश्वराच्या जवळ जाऊ आणि आपले आणि त्याचे नाते  मित्रत्वाचे होईल.. आता प्रत्येक मनुष्य हा कुटुंब वत्सल असतो.. ज्या प्रमाणे चंचुला हिने आपल्या पतीचा उद्धार व्हावा या साठी प्रयत्न केले.. इथे आपणस आपल्या कुटूंबासाठी करायचे आहेत.. आता ते कसे पहा सर्वप्रथम आपल्या स्वतःवर कार्य करा आता आपली अडचण काय मी जसे वागतो तसे घरच्यांनी वागावे.. पण हे शक्य नसते कारण आपणच तसे करत नाही..मग याला उपाय काय तर आपण घरात सकारात्मक वातावरण तयार करा.. कोणतीही गोष्ट असो.. ती सकारात्मक पणे हाताळा    पहा नक्कीच आपल्या घरच्यांवर हि त्याचा परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही.. कारण शिव महा पुराण कथा असो वा कोणताही ग्रंथ हा आपल्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे.. पण आपण त्यावर कार्य करत नाही.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !

चला आपण सर्व श्री महादेवाला प्रार्थना करूया.. हे महादेवा ज्या प्रमाणे श्री पार्वती माता यांनी  चंचुला हिला सखी चे स्थान दिले.. त्याच प्रमाणे आम्हाला त्या पात्रतेचे बनव.. आम्हाला आमच्या स्वतःवर कार्य करण्याची प्रेरणा दे.. परिस्थिती कोणतीही असुदे आमच्या कडून सकारात्मक प्रतिसाद येऊ दे.. धन्यवाद महादेवा.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !


Share
और पढिये !!

चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...

अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी

स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...

हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी

हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...

स्थानों का महत्व

हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...

हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.

हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...

ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है

स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...