शिव पुराण कथा ३

Oct 5, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

शिव पुराण कथा 3

आपण शिव पुराण च्या दुसऱ्या कथेत पाहिले की चंचुला हिला।शिव लोक प्राप्ती झाली..म्हणजेच ती मुक्त झाली..मुक्त झाल्यानंतर सुद्धा तिची शिव भक्ती सुरूच होती..ती शिव पार्वती यांच्या समोर विनम्र भावनेने उभी राहिली..तिच्या डोळ्यात आनंद अश्रू येत होते…पार्वती माता ने तर तिला आपल्या सखी चे स्थान दिले…एके दिवशी ती पार्वती माते जवळ जाते आणि विनम्र भावनेने प्रार्थना करू लागली..तिच्या प्रार्थनेतील भाव इतका खोल होता की पार्वती माता..तिला म्हणाल्या की अग सखे तुला काय हवे आहे..जे हवे ते माग… तेव्हा ती म्हणाली की माझी तर मुक्ती झाली पण माझे पती कुठे आहेत..त्यांच्या कडून अनेक चुका झाल्या आहेत…तेव्हा पार्वती माता सांगतात..तुझा पती..विंध्य पर्वतावर..पिशाच्च योनीत दुःख भोगत आहे…चंचुला हिला फार वाईट वाटले आणि तिने आपल्या पतीच्या उद्धार होण्यासाठी काय मार्ग आहे तो सांगण्याची विनंती केली…पार्वती माता सांगतात की जर त्याने शिव पुराण कथा श्रवण केली तर तो मुक्त होईल..चंचुला विचारते हे कसे शक्य आहे…हे तर आपणच करू शकता..तेव्हा पार्वती माता..शिव कीर्ती गाणारे जे गंधर्वराज तुंबूर होते त्यांना बोलावले…व सांगितले की तुम्ही या चंचुला बरोबर…विंध्य पर्वतावर जा…आणि तिथे एक पिशाच्च आहे त्याला प्रयत्न पूर्वक  शिव पुराण ची कथा ऐकवा…जेणेकरून त्याचे ह्रदय शुद्ध होईल…आणि तो पिशाच्च योनीतुन मुक्त होईल…गंधर्व तुंबूर पार्वती मातेची आज्ञा घेऊन..चंचुला बरोबर विंध्य पर्वतावर जातात..तिथे त्या पिशाच्च दिसतो.. त्याच्या समोर शिव पुराण कथा सुरू करतात…शिव कथा ऐकून त्याचे चित्त शुद्ध झाले आणि तो पिशाच्च योनीतुन मुक्त झाला..दोघे पती पत्नी शिव भक्तीत तल्लीन झाले. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !

बोध – पहा उपरोक्त लीलेत माता पार्वती यांनी चंचुला यांना सखी चे स्थान दिले.. पहा आपले आणि ईश्वराचे नाते हि मित्रत्वाचे झाले पाहिजे.. पहा त्यासाठी आपल्याला आपल्यातील दोष दूर करणे आवश्यक आहे.. पहा चंचुला हिने काय फक्त श्री शिव महा पुराण कथा श्रवण केली का ? नाही तिने आपल्यात जे काही दोष आहेत ते आधी घालवले त्यावर कार्य केले.. आपणास हि तसेच करायचे आहे.. आपले दोष आपल्याला दिसत नाही ते दिसले पाहिजे.. जेणेकरून आपण ईश्वराच्या जवळ जाऊ आणि आपले आणि त्याचे नाते  मित्रत्वाचे होईल.. आता प्रत्येक मनुष्य हा कुटुंब वत्सल असतो.. ज्या प्रमाणे चंचुला हिने आपल्या पतीचा उद्धार व्हावा या साठी प्रयत्न केले.. इथे आपणस आपल्या कुटूंबासाठी करायचे आहेत.. आता ते कसे पहा सर्वप्रथम आपल्या स्वतःवर कार्य करा आता आपली अडचण काय मी जसे वागतो तसे घरच्यांनी वागावे.. पण हे शक्य नसते कारण आपणच तसे करत नाही..मग याला उपाय काय तर आपण घरात सकारात्मक वातावरण तयार करा.. कोणतीही गोष्ट असो.. ती सकारात्मक पणे हाताळा    पहा नक्कीच आपल्या घरच्यांवर हि त्याचा परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही.. कारण शिव महा पुराण कथा असो वा कोणताही ग्रंथ हा आपल्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे.. पण आपण त्यावर कार्य करत नाही.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !

चला आपण सर्व श्री महादेवाला प्रार्थना करूया.. हे महादेवा ज्या प्रमाणे श्री पार्वती माता यांनी  चंचुला हिला सखी चे स्थान दिले.. त्याच प्रमाणे आम्हाला त्या पात्रतेचे बनव.. आम्हाला आमच्या स्वतःवर कार्य करण्याची प्रेरणा दे.. परिस्थिती कोणतीही असुदे आमच्या कडून सकारात्मक प्रतिसाद येऊ दे.. धन्यवाद महादेवा.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !


Share
और पढिये !!

अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७) आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा , प्रसादरूपे दिलासी ! www.SwamiVaani.com आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,...

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो...पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम...

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६) आजचे चिंतन-मनन मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे ! माता म्हणोनिया !! प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी ! कुटुंब प्रमुख म्हणोनिया !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन...

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५) आजचे चिंतन-मनन नामाचा नको कंटाळा ! स्वामींचा असावा जिव्हाळा !! प्रेमभावे नित्य आळवावा ! स्वामी माझा !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ,...

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४) आजचे चिंतन-मनन अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !! निरंतर ध्यास दे समर्था ! आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.....

जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३) आजचे चिंतन-मनन जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !! ह्यातच आहे आपुले कल्याण ! संशय न धरावा मनी !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ...

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१) आजचे चिंतन-मनन तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !! दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !! दास राहीन सदैव !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो...भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द...खरच...

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता ! शरण आलो तुला !! 'मी' पणाच्या जाळ्यात,मन हे फसले ! मुक्त कर तू मला !! स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक...

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९) आजचे चिंतन-मनन वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !! प्रेमभावे दर्शना जाती , प्रत्यक्ष दिसती स्वामी !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे...

आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!

स्वामी वाणी पुष्प ५३४(पर्व ४ थे भाग ३८) आजचे चिंतन-मनन हे मना ! आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !! क्षणोक्षणी काळजी घेती भक्ताची ! ही गुरूमाऊली !! www.SwamiVaani.com या ओवीतून स्वामीं नी आपल्या मनावर प्रहार केला आहे..कोणतीही गोष्ट ही आपल्या...