चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?
मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात… असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान…खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको वाटते..कारण मनाला चांगले नको असते… आपण आपले बाह्य शरीर वा कपडे स्वच्छ करतो पण मन मात्र कधीच स्वच्छ करत नाही… जेव्हा हे विचार येतात याचा अर्थ आपण आतून स्वच्छ होत आहोत…जो पर्यंत आतून स्वच्छ होत नाही तो पर्यंत प्रगती कशी होईल.म्हणून कितीही त्रास होऊद्या पण नाम साधना..नाम जप सोडू नका..धन्यवाद स्वामीं… कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!
www.chetnakeswar.com
स्वामी नाम घ्या
स्वामी भक्तहो सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने रोज थोडी तरी स्वामी नाम सेवा आणि किमान एकदा तरी तारक मंत्र सेवा करा.. आपण दिवस भरात किती तरी वेळ वाया घालवतो ते आपणस जाणवतही नाही.. आणि जेव्हा स्वामी नाम सेवा येते तेव्हा आपले मन कारणे देते.. हि सामूहिक सेवा आहे.. या मध्ये...