स्वामी वाणी पुष्प ५३०(पर्व ४ थे भाग ३४)
आजचे चिंतन-मनन
अहंकार नसावा मनी !
समर्पित कर्म करावे प्रत्येक क्षणी !!
कर्ता करविता एकच समर्थ स्वामी !
ऐसा विवेक जागृत ठेवुनिया !!
www.SwamiVaani.com
वरील ओवीतून स्वामी आपणस काय सांगत आहेत .. अहंकार नसावा मनी.. म्हणजेच इथे पुन्हा आपल्या मनावर प्रहार करण्यात आला आहे.. आपले मन नेहमी मी.. मी चा पाढा म्हणत असते.. मी देवाचे इतकी सेवा करतो.. मी कुटुंबासाठी इतके करतो.. मी चा अहंकार आपल्या जीवनात इतका असतो कि.. आपणस असे वाटते कि मी करतो म्हणूनच होत आहे.. पण खरंच विचार करा आपण नव्हतो तेव्हा हि सर्व सुरु होते… मी नसेल तेव्हा हि सर्व सुरु असणारच आहे.. मग माझ्यातील मी काम करतो कि.. माझ्या द्वारे काम करून घेणारी दुसरी शक्ती आहे.. नक्कीच यावर चिंतन मनन कर.. म्हणजेच इथे स्वामी आपल्या तील अहंकारावर मात करण्यास सांगत आहेत.. अहंकार कमी झाला कि आपण जे काही कर्म करतो ते प्रत्येक कर्म स्वामींना समर्पित करा… जसे आज दिवसभर जे काम केले असेल.. स्वामी सेवा केली असेल ती सर्व स्वामींना अर्पण करा.. स्वामी ना म्हणावे धन्यवाद माझ्याकडून सेवा करून घेतलीस.. म्हणजेच इथे समर्पित भाव आपणस जागृत करायचा आहे… सर्व काही स्वामींच्या इच्छेने होत आहे.. स्वामीच कर्ता आहेत मी फक्त निमित्त आहे… हा विश्वास आपणस आपल्यात अंतर्मनात जागृत करायचा आहे.. चला मग आज आपल्यातील अहंकारावर काम करूया .. धन्यवाद समर्था .. !