स्वामी वाणी पुष्प ५२८(पर्व ४ थे भाग ३२)
आजचे चिंतन-मनन
अरे किती सोसतोस त्रास !!
बन तू स्वामींचा दास !
विश्वासाने सांगतो ,
स्वामी करणार नाही तुला उदास !!
www.SwamiVaani.com
स्वामीं भक्तहो..काय आहे आजच्या स्वामीं वाणी चा संदेश..पहिली ओवी तुन प्रहार केला आहे..त्रास यावर..त्रास कोण करून घेते मन.. सर्व गोष्टी चे मुळ आहे..आपल्या मनातील विचार… कारण मन हे प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करून त्रास करून घेते..आपणस त्रास होतो वा आपण करून घेतो..अश्या ह्या मनाला आपणस जागेवर आणायचं.. मग काय करावे लागेल..त्याला काही तरी काम दयावे लागेल..काम कोणते..स्वामी भक्तीचे, स्वामीं नामाचे, स्वामीं चरित्र चिंतन मनन करण्याचे…याने काय होईल..त्याला नकारात्मक विचार करण्यास वेळ नाही मिळणार..मग याचा परिणाम काय होईल..मनात विश्वास निर्माण होईल..ह विश्वास.. स्वामी सेवेत असेल.. भक्तीत असेल..आपल्या दैनंदिन जीवनात असेल..मग फक्त उरेल..प्रेम.. आनंद…मौन.म्हणजेच स्वामींची अनुभूती.. चला तर मग मनाला..स्वामी सेवेला लावूया..धन्यवाद स्वामीं..!