जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

Sep 18, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज म्हणत आहेत… जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी श्री गजानन महाराज यांची महिमा ऐकून एक व्रत घेण्याचा निर्णय घेतला.. त्यांनी असे व्रत घेतले कि जर माझे अमुक अमुक काम झाले तर अमुक अमुक वस्तू श्री महाराजांना अर्पण करेल.. त्यांनी अमुक अशी वस्तू अर्पण करण्याचा निर्णय या साठी घेतला होता या मागे कारण असे होते कि ती वस्तू त्यांना फार आवडत होती.. काही दिवसातच त्यांचे काम झाले.. आता व्रताची पूर्ती करण्याचा दिवस आला त्यासाठी शेगांव मध्ये आले… आल्या नंतर त्यांनी पाहिले कि श्री महाराजांच्या दर्शनासाठी तर फारच गर्दी आहे.. त्यांनी विचार केला कि इतक्या गर्दीत माझे दर्शन कसे होणार… आणि इतक्या गर्दीत दर्शन झाले तरी मी जी वस्तू अर्पण करणार आहे ती इतक्या गर्दीत कशी अर्पण करणार.. कारण हि वस्तू पाहूनच लोक मला मारण्यास देखील कमी करणार नाहीत.. त्याच्या मनात हे विचार सुरु होते… त्याच वेळी श्री महाराजांना त्याच्या मनातील विचार समजले.. श्री महाराजांनी तिथे असणाऱ्या एका भक्ताला श्री गोसावी यांना बोलवण्यास सांगितले.. श्री गोसावी नम्रता पूर्वक श्री महाराजांच्या समोर हाथ जोडून उभे राहिले.. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणतात.. तू आणलेली भेट आम्हाला दे.. जी तीन महिण्यापासून तुझ्या पिशवीत आहे.. श्री महाराजांची हि वाणी ऐकून तो अचंबित झाला… त्याच प्रमाणे श्री महाराज त्यांना म्हणाले ” जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… ! अश्या पद्धतीने योग्य समज देऊन श्री महाराजांनी श्री गोसावी यांच्या व्रताची पूर्ती करून घेतली.. बोला श्री गजानन महाराज कि जय … !

बोला – अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – वरील लीला तर आपल्या साठी ज्ञानाचा भंडार आहे.. श्री गोसावी यांना समस्या होती ती समस्या सुटण्यासाठी त्यांनी व्रत घेतले.. व्रत असे घेतले कि जे त्यांना आवडत होते… जेव्हा त्यांचे काम होते व व्रत पूर्ती करण्याची वेळ येते तेव्हा ते घाबरू लागेल… अशीच स्थिती आपली सुद्धा होते… आपणस देखील काही समस्या आली तर आपण सुद्धा काही तर व्रत म्हणा किंवा संकल्प घेतो परंतु तो घेताना देखील आपण आपणस आवडणारा संकल्प घेतो… यातून महाराज सांगत आहेत.. व्रत घ्यायचे असेल तर असे व्रत घ्या ज्यातून आपल्यात जीवनात बदल घडेल.. वास्तविक भगवंताला आपल्याकडून कोणतीच भौतिक वस्तू नको आहे भगवंताची इच्छा आहे कि व्रताला निमित्त करून आपण आपल्यातील वाईट सवयींचा त्याग करून आपले जीवन आनंददायी बनवावे… काही जणांना तर सवयच असते कि काहीही समस्या आली कि लगेचच काही तर व्रत घेतात म्हणजे माझे अमुक काम झाले तर अमुक एखादी वस्तू अर्पण करेल.. खरंतर भगवंत व आपल्यातील नाते हे व्यवहारिक नाते आहे का ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.. जर याचे उत्तर नाही असे असेल तर भगवंताला मागायचे असेल तर भक्ती मागा… त्यासाठी कणखर पणा मागा.. त्यावर चालण्याचा संकल्प घ्या… ज्याने ब्रम्हांड निर्माण केले त्याला आपल्याकडून कोणत्याच भौतिक वस्तू नको आहेत.. तो तर म्हणत आहे उच्चतम अभिव्यक्ती कर.. किती खोल असा संदेश श्री महाराज आपणस देत आहेत… !

चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया – श्री गजानन महाराज आम्हाला आपल्याकडे काय मागावे याची समज नाही… आजच्या लीलेतून आपण आम्हाला हि समज दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद… आम्हाला व्यवहारिक नाही तर आम्हाला तुझी प्रेमळ भक्ती दे… आम्हाला काही मागण्याची नाही तर देण्याची सवय आमच्यात दृढ कर.. आमच्यातील विकार अर्पण करण्याची शक्ती .. समज आम्हाला दे.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद .. !

 

 


Share
और पढिये !!

चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...

अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी

स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...

हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी

हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...

स्थानों का महत्व

हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...

हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.

हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...

ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है

स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...