डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

Sep 14, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

  • आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये…खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का… असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे स्वामींचे सेवेकरी आहेत ज्यांनी आज पर्यंत अखंड निस्वार्थ सेवा केली आहे..आपणस स्वामीं वाणी ही वेबसाईट तसेच अँप देखील माहीत असेल..या वर आपण स्वामीं वाणी ऐकली असेल..वाचली असेल..पण ही लिहिली कुणी..ही प्रसिद्ध कोण करत आहे..हे आज पर्यंत काही मोजक्याच लोकांना माहीत आहे..आपण म्हणाल की मग यात काय झाले ? एक स्वामी वाणी प्रसिद्ध झाली की ती लाखो लोक ती वाचत होते..श्रवण करत होते..वेबसाईट Views सुध्दा लाखो.. जर याचा हिशोब केला तर या माध्यमातून ते वार्षिक लाखो रुपये कमवू शकत होते पण..स्वतःला शब्द दिला होता स्वामीं सेवेचे बाजारी करण करणार नाही..अशी ही निस्वार्थ सेवा अखंडपणे ३.५ वर्ष सुरु होती..साधारण ३०९ भागांची स्वामीं वाणी वेबसाईटवर उपल्बध होती..पण अचानक काही गोष्टी झाल्या..कुठंतरी वाटले की स्वामीं लिलामधून काही जण चुकीचा अर्थ लावत आहेत.. मग विचार आला..आपले काम स्वामी सेवा करणे आहे..आपले मत इतरांवर लादणे नाही..क्षणाचाही विचार न करता त्यांनी सर्व स्वामीं वाणी संग्रह अर्चिव केला..विचार निस्वार्थ होता..अनेकांनी उत्पन्न कमावले.. पण ते स्वामी विचारांचा प्रचार करत होते म्हणून आणि चांगलं कार्य कार्य करत होते म्हणून त्यानां सुद्धा परवानगी दिली.. उत्पन्न महत्वाचे नाही तर स्वामी विचार महत्वाचे आहे हा मुद्दा महत्वाचा..
  • या जागी माझ्यासारखी व्यक्ती नक्कीच नाही म्हणाली असती अथवा मला काहीं मोबदला दे म्हणाली असते पण यांनी असे काहीच केले नाही..
  • मग विचार केला चिंतन मनन केले की स्वामीं सेवा तर थांबली नाही पाहिजे..मग स्वामीं वाणी चे नवीन पर्व सुरु झाले..दैनंदिन जीवनातील स्वामीं वाणी..म्हणजे आपणस अनेक प्रश्न असतात..त्यावर उत्तर मिळत नाही..अश्या प्रश्नांवर चिंतन मनन करून उत्तर मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे..ही सेवा सुद्धा निस्वार्थ सुरू आहे.. कदाचित आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल..ही व्यक्ती गर्भ श्रीमंत असेल..हिला पैशाचे महत्त्व समजलं नसेल.. वेडी व्यक्ती..असे अनेक गोष्टी आपल्या मनात येतील..अनेकांना जेव्हा मी हे सांगितले तेव्हा त्यांनी मला असेच उत्तर दिले..पण खरंतर ती व्यक्ती देखील सर्व सामान्यच आहे…प्रापंचिक आहे..तरुण आहे..कुटुंब चालवण्यासाठी १८-१८ तास काम करते..पण निस्वार्थ स्वामीं सेवेचा विडा उचलला आहे असे म्हणावे लागेल..आपण म्हणाल काय फायदा..अहो स्वामीं चा नियम आहे ते कुणाचेच काही ठेवत नाहीत..वेळ आली की व्याजासह परत..एक दिवस अचानक त्यांचे भयानक डोके दुखू लागले..डॉक्टर कडे गेले तर BP २८० झाला होता..ब्रेन स्ट्रोक चा अटॅक होता..प्यारलेसिस पासून ते जिवंत राहणे अशक्य होते.. परंतु दररोजची ध्यानधारणा आणि सर्वांच्या अप्रत्यक्ष आशीर्वाद ह्या मुळे तर काय.. डॉक्टर आश्चर्य चकित होऊन बोलले की, ‘तुम्ही अजून बोलत आहात यावर विश्वास बसत नाही..’ त्यांना ICU मध्ये ऍडमिट केले… परिस्थिती क्रिटिकल होती.. या परिस्थितीत सुद्धा या व्यक्तीने गुरूवार ची स्वामीं वाणी प्रसिद्ध केली.. त्यांना ऑडिओ करता आला नाही..त्याबद्दल त्यांनी स्वामीं भक्तांची माफी मागितली व कारण सांगितले..
  • *अहो ज्या माणसाचे नाव माहीत नाही..चेहरा माहीत नाही.* अश्या स्वामीं सेवेकरी बरा व्हावा यासाठी.. फेसबुक, इन्स्टाग्रामवर, व्हाट्सएपच्या माध्यमातून लोकांना सकारात्मक प्रार्थना केल्या..यात नाही म्हंटल तरी हजारो लोकांच्या सकारात्मक प्रार्थना काम करत होत्या..आपल्या सर्वांच्या सकारात्मक प्रार्थना आणी डॉक्टरांचे प्रयत्न यातून मृत्यू वर मात केली..डॉक्टरांचे प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या सकारात्मक प्रार्थनेचे बळ.. 72 तासाच्या आत डॉक्टरांनी सांगितले आता आपणस धोका नाही..आणि 7-8 दिवसांतच त्याना discharge मिळाला..ते सुख रूप घरी आले..अजूनही डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे.. पण धोक्याच्या बाहेर हेत..
  • हे सर्व काय होते तर निस्वार्थ स्वामीं सेवेचे फळ…एखादी व्यक्ती मृत्यु च्या दारात असून सुद्धा निस्वार्थ सेवा सुरू ठेवते मग त्याचे फल या पेक्षा मोठे ते काय असणार.. असो..यातून आपणस काय बोध मिळतो..आपले प्रत्येक कर्म निस्वार्थ भावनेने करा..मग ती स्वामीं सेवा असो वा..आपण करत असणारी नोकरी.. धंदा असो तो जेव्हा आपण एक स्वामीं सेवा म्हणून करू तेव्हा नक्कीच स्वामीं महाराज आपणस भरभरून देतात..दुसरे आपले थोडे फार दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका तात्काळ डॉक्टर कडे जा ..त्यांचा सल्ला घ्या.. मनाने किंवा इतरांचे ऐकून उपचार करू नका..शरीराची काळजी घ्या कारण हेच जेव्हा आपण याची काळजी घेऊ तेव्हा ते देखील आपली काळजी घेणार आहे..निस्वार्थ स्वामीं सेवा करा..मेवा नक्कीच मिळेल..या सर्व अनुभवात आज त्या निस्वार्थ सेवेकरी चे नाव सांगणे अपरिहार्य आहे पण त्यांनी स्वामीं सेवेकरी हीच ओळख कायम असावी ही इच्छा व्यक्त केली….!
    नक्कीच अशीच प्रेरणात्मक सेवा तुमच्या द्वारे व्हावी हीच समर्थ चरणी प्रार्थना..धन्यवाद स्वामीं
    ,”काही जण असेही बोलतील की,स्वामींचीच कृपा होती तर मग डॉक्टर कडे कशाला गेला? आशा लोकांना सांगावेसे वाटते की, डॉक्टरांना सुद्धा देवानेच बनवले आहे.. आणि क्वांटम फिसिक्स च्या नियमांने सर्व लोकांच्या सकारात्मक प्रार्थना- तरंगाचा प्रभाव उपचारात सहकार्य करत असतो.. म्हणून दवा आणि दुवा ह्याचे महत्व आहे..😊”

Share
और पढिये !!

स्वामी सेवेचा सोपा मार्ग

स्वामी भक्तहो..जप सेवा करायचीच आहे तर सोप्पा मार्ग.. रोज सकाळी उठलात कि मोबाईल फोन सुरु करण्यापूर्वी स्वामी नाम घ्या.. मग मोबाइल हातात घेऊन आजची सेवा सबमिट करा.. झाली कि आजची सेवा.. पहा किती सोपे आहे स्वामी नाम सेवेचा...

स्वामी नाम घ्या

स्वामी भक्तहो सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने रोज थोडी तरी स्वामी नाम सेवा आणि किमान एकदा तरी तारक मंत्र सेवा करा.. आपण दिवस भरात किती तरी वेळ वाया घालवतो ते आपणस जाणवतही नाही.. आणि जेव्हा स्वामी नाम सेवा येते तेव्हा आपले मन कारणे देते.. हि सामूहिक सेवा आहे.. या मध्ये...

स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१

स्वामी वाणी पुष्प ५२१(पर्व ४ थे भाग २५) कलियुगी दिवसेंदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१ www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी स्वामीं चरित्र यातील आहे..यावर आपण चिंतन मनन करा..अशी रोज...

कर्ता कोण आहे ?

स्वामी वाणी पुष्प ५२३(पर्व ४ थे भाग २७) कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१ ओ.५० www.SwamiVaani.com वरील ओवीवर आपण चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नाचे उत्तर स्वामी आपणस देतात.. कर्ता हा भाव हा आपल्यात...

स्वामी कोण आहेत ?

स्वामीं भक्तहो..आजची चिंतन मनन ची ओवी.. यावर आपण चिंतन मनन करावे.. स्वामीं नेमके काय सांगत आहेत..पहिल्या ओवीतून कदाचित आपला संभ्रम निर्माण होईल..जर आपण दुसरी ओवी वाचली नाही तर...देवांचे ही देव स्वामीं आहेत..स्वामीच ब्रम्हा आहेत..स्वामीं च ब्रह्म आहेत..स्वामीच परब्रह्म...

स्वामी नाम सेवेतील अडचणी

स्वामीं नाम सेवेतील अडचणी १)वेळ नाही २) खूप काम ३)कंटाळा ४)आज इच्छा नाही ५) उद्या पासून करू ६) जप करताना झोप येते अशी हजारों कारणे आपल्याकडे आहेत पण जेव्हा मी माझ्या स्वामीं ना हाक मारतो ना..स्वामीं आई वाचव..तेव्हा मात्र स्वामीं आई कोणतेच कारण देत नाही.. जर स्वामीं नी...

आपण सर्व जाणतो का ?

स्वामी वाणी पुष्प ५७९(पर्व ४ थे भाग ८३) आजचे चिंतन-मनन न शास्त्र जाणतो , न धर्म जाणतो , न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो ! मुठमती मी अज्ञानी, तुझ्या चरणापेक्षा काहीही मोठे नाही इतुके मात्र जाणतो ! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी समज हि आहे आणि...

सज्जन कुणाला म्हणावे ?

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२) आजचे चिंतन-मनन सज्जनांचे सज्जनत्व वाढव ! दुर्जनांचे दुर्जनत्व घालव ! अवघे विश्व स्वामीमय होवो ! हेचि मागणे समर्था !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा...

देहभान हरपणे म्हणजे काय ?

स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)* *आजचे चिंतन-मनन* देहाचें भान न उरो ! गळून जाऊ दे अहंपणा ! कर चित्ताची शुद्धता ! मात्र तव चरण दर्शने !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे...देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण...

स्वामीं नाम आणि आपले जीवन

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)* *आजचे चिंतन-मनन* नाम घ्यावे,नाम द्यावे ! नाम सांगावे, नाम ऐकावे ! नाम पुजावे,नाम भजावे ! अवघे जीवन करावे नाममय !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात...