प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

Aug 25, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो यावर सर्व अवलंबुन आहे.. सर्वप्रथम प्रार्थना म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.. प्रार्थना म्हणजे सृष्टीतील प्रत्येकांच्या हितावह सृष्टीला घातलेले शाब्दिक… मानसिक… वैचारिक.. हृदयातून घातलेली साद म्हणजे प्रार्थना.. पहा खूप खोल असा अर्थ आहे..आपण म्हणाल असे कसे पहा आपण लहानपणी प्रार्थना करण्यास शिकलो.. दिवे लावताना आपणस प्रार्थना शिकवली ती आठवूया.. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते । दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार । दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥ दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी । माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥ ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे । तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात । घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो । घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ॥३॥ दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन । दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोsस्तुते ॥४॥ अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति । इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌ । मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: । अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥५॥ हि प्रार्थना आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत.. यावर जर चिंतन मनन आपण केले तर आपणस जाणवेल कि प्रार्थना हि सृष्टीतील सृष्टीला प्रत्येकासाठी असते.. व्यक्तिगत नसते.. कसे पाहूया.. सर्वांचे कल्याण कर.. आरोग्य मिळू दे.. कुणाविषयी मनात वाईट विचार येऊ नयेत…आपण नमस्कार कुणाला करतो जो अंधार दूर करतो अश्या दिव्याला.. आपण दिवा तुळशीपाशी लावला आहे पण उजेड संपूर्ण घरात पसरला आहे.. म्हणजेच आपण प्रार्थना करत आहोत याचा परिणाम सर्व सृष्टीवर होत आहे..आपण यात घरातील वडील धाऱ्या माणसांना उदंड आयुष्य लाभो या साठी प्रार्थना करतो म्हणजे यात व्यक्तिगत स्वार्थ आहे का नाही… कारण घरचा धनी म्हणजे फक्त आपल्या घरातील व्यक्ती असा मर्यादित अर्थ नसून सर्वसामावेशक असा अर्थ आहे .. पहा तो कसा आपले कुटूंब प्रार्थना करते तेव्हा आपण अर्थ घेतो घरातील कर्ता म्हणजे जी कमावती व्यक्ती आहे तिच्या साठी.. जेव्हा कमवणारी व्यक्ती प्रार्थना करते तेव्हा अर्थ होतो तो समजा नोकरी करत असेल तर त्याचा धनी म्हणजे कंपनीचा मालक.. मालक प्रार्थना करत असेल तर त्याचा धनी आहेत त्याचे ग्राहक.. म्हणजेच हि एक साखळी आहे.. आपण प्रार्थना करताना जितकी ती सर्व समावेशक करू तितका अधिक चांगला व लवकर परिणाम आपणस प्राप्त होतो.. म्हणून नेहमी प्रार्थना करताना सर्वांसाठी करूया.. म्हणजेच संपूर्ण सृष्टीसाठी प्रार्थना करूया.. नक्कीच आपणस प्रार्थनेचा अर्थ समजला असेलच त्यावर कार्य करून आजपासून सर्वहितकारी प्रार्थना करूयात … !

चला आपण प्रार्थनेसाठी समर्थाला प्रार्थना करूया.. हे समर्था आज तू आम्हाला प्रार्थना म्हणजे काय हि समज दिलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. नेहमी आमच्याकडून संपूर्ण सृष्टीसाठी हितकारीच प्रार्थना करून घे… प्रत्येक प्रार्थनेत व्यक्तिगत हिताचा नाहीतर.. संपूर्ण सृष्टीच्या हिताच्या प्रार्थना ह्रद्यातून प्रगट कर.. कारण तीच प्रार्थना तू पूर्ण करतो जी संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाची असते ..हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद


Share
और पढिये !!

चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...

अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी

स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...

हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी

हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...

स्थानों का महत्व

हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...

हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.

हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...

ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है

स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...