प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

Aug 25, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो यावर सर्व अवलंबुन आहे.. सर्वप्रथम प्रार्थना म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.. प्रार्थना म्हणजे सृष्टीतील प्रत्येकांच्या हितावह सृष्टीला घातलेले शाब्दिक… मानसिक… वैचारिक.. हृदयातून घातलेली साद म्हणजे प्रार्थना.. पहा खूप खोल असा अर्थ आहे..आपण म्हणाल असे कसे पहा आपण लहानपणी प्रार्थना करण्यास शिकलो.. दिवे लावताना आपणस प्रार्थना शिकवली ती आठवूया.. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते । दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार । दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥ दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी । माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥ ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे । तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात । घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो । घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ॥३॥ दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन । दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोsस्तुते ॥४॥ अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति । इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌ । मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: । अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥५॥ हि प्रार्थना आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत.. यावर जर चिंतन मनन आपण केले तर आपणस जाणवेल कि प्रार्थना हि सृष्टीतील सृष्टीला प्रत्येकासाठी असते.. व्यक्तिगत नसते.. कसे पाहूया.. सर्वांचे कल्याण कर.. आरोग्य मिळू दे.. कुणाविषयी मनात वाईट विचार येऊ नयेत…आपण नमस्कार कुणाला करतो जो अंधार दूर करतो अश्या दिव्याला.. आपण दिवा तुळशीपाशी लावला आहे पण उजेड संपूर्ण घरात पसरला आहे.. म्हणजेच आपण प्रार्थना करत आहोत याचा परिणाम सर्व सृष्टीवर होत आहे..आपण यात घरातील वडील धाऱ्या माणसांना उदंड आयुष्य लाभो या साठी प्रार्थना करतो म्हणजे यात व्यक्तिगत स्वार्थ आहे का नाही… कारण घरचा धनी म्हणजे फक्त आपल्या घरातील व्यक्ती असा मर्यादित अर्थ नसून सर्वसामावेशक असा अर्थ आहे .. पहा तो कसा आपले कुटूंब प्रार्थना करते तेव्हा आपण अर्थ घेतो घरातील कर्ता म्हणजे जी कमावती व्यक्ती आहे तिच्या साठी.. जेव्हा कमवणारी व्यक्ती प्रार्थना करते तेव्हा अर्थ होतो तो समजा नोकरी करत असेल तर त्याचा धनी म्हणजे कंपनीचा मालक.. मालक प्रार्थना करत असेल तर त्याचा धनी आहेत त्याचे ग्राहक.. म्हणजेच हि एक साखळी आहे.. आपण प्रार्थना करताना जितकी ती सर्व समावेशक करू तितका अधिक चांगला व लवकर परिणाम आपणस प्राप्त होतो.. म्हणून नेहमी प्रार्थना करताना सर्वांसाठी करूया.. म्हणजेच संपूर्ण सृष्टीसाठी प्रार्थना करूया.. नक्कीच आपणस प्रार्थनेचा अर्थ समजला असेलच त्यावर कार्य करून आजपासून सर्वहितकारी प्रार्थना करूयात … !

चला आपण प्रार्थनेसाठी समर्थाला प्रार्थना करूया.. हे समर्था आज तू आम्हाला प्रार्थना म्हणजे काय हि समज दिलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. नेहमी आमच्याकडून संपूर्ण सृष्टीसाठी हितकारीच प्रार्थना करून घे… प्रत्येक प्रार्थनेत व्यक्तिगत हिताचा नाहीतर.. संपूर्ण सृष्टीच्या हिताच्या प्रार्थना ह्रद्यातून प्रगट कर.. कारण तीच प्रार्थना तू पूर्ण करतो जी संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाची असते ..हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद


Share
और पढिये !!

परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)* *आजचे चिंतन-मनन* परमशांती मधील स्वरनाद तू , शून्या मधील अस्तित्व तू , बुद्धीच्या ही पलीकडे असलेला , ऐसा अतर्क्य समर्थ तू !! www.SwamiVaanni.co.in स्वामीं भक्तहो...परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो...

अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७) आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा , प्रसादरूपे दिलासी ! www.SwamiVaani.com आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,...

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो...पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम...

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६) आजचे चिंतन-मनन मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे ! माता म्हणोनिया !! प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी ! कुटुंब प्रमुख म्हणोनिया !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन...

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५) आजचे चिंतन-मनन नामाचा नको कंटाळा ! स्वामींचा असावा जिव्हाळा !! प्रेमभावे नित्य आळवावा ! स्वामी माझा !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ,...

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४) आजचे चिंतन-मनन अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !! निरंतर ध्यास दे समर्था ! आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.....

जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३) आजचे चिंतन-मनन जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !! ह्यातच आहे आपुले कल्याण ! संशय न धरावा मनी !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ...

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१) आजचे चिंतन-मनन तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !! दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !! दास राहीन सदैव !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो...भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द...खरच...

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता ! शरण आलो तुला !! 'मी' पणाच्या जाळ्यात,मन हे फसले ! मुक्त कर तू मला !! स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक...

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९) आजचे चिंतन-मनन वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !! प्रेमभावे दर्शना जाती , प्रत्यक्ष दिसती स्वामी !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे...