राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते का हे सर्व..नक्कीच तो मुक्त होईल का जर त्याच्या पोटी जन्म घेणारे भाऊ बहीण माझ्या संपत्ती साठी भांडत आहेत.. खरंच यासाठीच मी कष्ट केले का ? कुठेतरी माझे संस्कार कमी पडले का? अरे बाळांनो भांडू नका रे..माझ्यासाठी तुम्ही दोघेही समानच आहात.. चूक कुणाची हे माझ्यासाठी महत्वाचे नाही…कारण मी तुम्हाला सांभाळताना दुजाभाव केला नाही..पण माझ्या संपत्ती साठी तुम्ही भांडता..थोडीशी जरी तुम्हाला माझा आदर असेल..मला मुक्ती मिळावी असे वाटत असेल तर कृपा करून भांडू नका रे..मी तरच मुक्त होईल जर तुम्ही न भांडता राहिलात..नाही ना रे बाळांनो भांडणार..हीच मला श्रद्धांजली असेल..चला या राखी पौर्णिमेस आपले नाते दृढ करूया…!
परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ
स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)* *आजचे चिंतन-मनन* परमशांती मधील स्वरनाद तू , शून्या मधील अस्तित्व तू , बुद्धीच्या ही पलीकडे असलेला , ऐसा अतर्क्य समर्थ तू !! www.SwamiVaanni.co.in स्वामीं भक्तहो...परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो...