श्री दासबोध दशक १२ समास १

Jul 9, 2022 | मराठी

Share

श्री दासबोध दशक १२ समास १

दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत
प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत… प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही… रामदास स्वामी अश्या लोकांसाठी सांगतात कि आधी प्रपंच व्यवस्थित करा आणि मग परमार्थ कडे वळावे इथे आळस करू नये… जर आपण
प्रपंच सोडून परमार्थ कराल तर आपणस कष्ट.. दुःख.. यातना भोगाव्या लागतील म्हणजेच दोन्ही व्यवस्थित होणार नाही… म्हणून समर्थ म्हणतात कि जर आपण प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालाल तर आपण विवेकी आहोत… अनेक जण प्रपंच सोडून परमार्थ करतात मंग त्या माणसाला प्रथम अन्न खाण्यास मिळत नाही म्हणजेच अन्न मिळत नाही.. जर आपले पोटच भरले नसेल तर आपले लक्ष प्रपंच आणि परमार्थात कसे लागेल ? यावर खरे आहे कि नाही म्हणून प्रपंच सोडू नये… काही जण म्हणतात आम्ही फक्त प्रपंच करणार.. मग काय होते अनेक अडचणी येतात… मग आपणस काय करावे हेच समजत नाही म्हणजेच अनेक कष्ट यातना होतात .. म्हणजेच प्रपंच आणि परमार्थ याची आपणस सांगड घालायची आहे… एखादा मनुष्य आहे तो जर काम धंदा सोडून घरीच बसला तर त्याचे घर कसे चालेल सांगा त्याचा परिणाम काय होईल घरात आहे नाही ते सर्व संपेल व एक दिवस उपाशी राहण्याची वेळ येईल.. अशीच अवस्था प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड नाही घातली तर होते… थोडक्यात आपणस प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची अनुभूती घ्याची आहे… आपण फक्त पारमार्थिक माणसाचं योगी म्हणतो पण रामदास स्वामी खरा योगी जो परमार्थ आणि प्रपंच यांची सांगड घालतो त्यास म्हणतात.. इथे रामदास स्वामी सांगत आहे कि आपणस सांगत आहेत आपणस प्रपंच सावधपणे करायचा आहे जेणेकरून प्रपंच आणि परमार्थ याची सांगड बसेल… रामदास स्वामी म्हणतात कि जो प्रपंच व्यवस्थित करत नाही तो परमार्थ हि खोटेपणाने करतो…प्राणी, पक्षी कीटक सुद्धा विचारपूर्वक जीवन जगतात आपण तर मनुष्य आहोत मग आपण सुद्धा सारासार विचार करून प्रपंच करावा थोडक्यात आपले वागणे विवेक रुपी असावे… आपणात दूरदृष्टी असावी… आपणास सुखी व्हायचे आहे तर आपणस नेहमी सावध असणे आवश्यक आहे… थोडकयात प्रत्येक समस्येत चारही बाजूनी विचार करून आपण निर्णय घेतला तर प्रपंचातील सर्व गोष्टी छानच होतील.. आपण सारासार विचार ना करता निर्णय घेतला व तो निर्णय चुकला कि नंतर रडून काय उपयोग त्यासाठी आधीच आपण शहाणपण शिकावे इतरांकडून हि शिकावे.. तसेच आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आपल्यात काय अवगुण आहेत याची एक यादी बनवावी आणि एक एक अवगुण काढून टाकावेत जेणेकरून चित्त शुद्धी होईल.. भलेही आपण बाहेरून विचित्र दिसत असू आतून मात्र आपण शुद्ध असणे आवश्यक आहे हीच आध्यात्माची सुरवात आहे.. लोकांच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करावे मात्र त्यांच्यात कोणते चांगले गुण आहेत ते वेचून घ्यावेत जेणेकरून आपले शरीर मन सत्व गुणांची खाण बनेल … अनेकदा आपण लोकांचे मन दुखावतो हे टाळावे कारण यातून राग द्वेष निर्माण होतो जो आपल्या परमार्थात बाधा निर्माण करतो… थोडकयात प्रपंचात राहून चित्त शुद्ध करून परमार्थ मार्गावर अग्रेसर होण्यास समर्थ आपणस सांगत आहेत.

चला आपण समर्थाना प्रार्थना करूया – हे समर्था आज तू जो दासबोधातून बोध देत आहेस त्यावर काम करण्याची प्रेरणा आम्हाला दे… आज पर्यंत आम्हाला वाटत होते.. प्रपंच सोडूनच परमार्थ होतो पण आजच्या दासबोधातून आम्हाला तू सांगितलंस कि.. जो प्रपंच नीट करतो तोच परमार्थ व्यवस्थित करू शकतो.. आम्हाला आमच्यातील अवगुण दाखव… इतरांमधील फक्त गुणच दिसू दे.. चांगले ते घेण्याची वृत्ती आमच्यात विकसित कर.. आम्हाला शुद्ध कर.. कारण जो पर्यंत आम्ही शुद्ध होत नाही तो पर्यंत आम्ही प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालू शकत नाही… प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालण्याची प्रेरणा आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद.. आमच्यकडून हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद !! WWW.CHETNAKESWAR.COM


Share
और पढिये !!

स्वामी सेवेचा सोपा मार्ग

स्वामी भक्तहो..जप सेवा करायचीच आहे तर सोप्पा मार्ग.. रोज सकाळी उठलात कि मोबाईल फोन सुरु करण्यापूर्वी स्वामी नाम घ्या.. मग मोबाइल हातात घेऊन आजची सेवा सबमिट करा.. झाली कि आजची सेवा.. पहा किती सोपे आहे स्वामी नाम सेवेचा...

स्वामी नाम घ्या

स्वामी भक्तहो सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने रोज थोडी तरी स्वामी नाम सेवा आणि किमान एकदा तरी तारक मंत्र सेवा करा.. आपण दिवस भरात किती तरी वेळ वाया घालवतो ते आपणस जाणवतही नाही.. आणि जेव्हा स्वामी नाम सेवा येते तेव्हा आपले मन कारणे देते.. हि सामूहिक सेवा आहे.. या मध्ये...

स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१

स्वामी वाणी पुष्प ५२१(पर्व ४ थे भाग २५) कलियुगी दिवसेंदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१ www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी स्वामीं चरित्र यातील आहे..यावर आपण चिंतन मनन करा..अशी रोज...

कर्ता कोण आहे ?

स्वामी वाणी पुष्प ५२३(पर्व ४ थे भाग २७) कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१ ओ.५० www.SwamiVaani.com वरील ओवीवर आपण चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नाचे उत्तर स्वामी आपणस देतात.. कर्ता हा भाव हा आपल्यात...

स्वामी कोण आहेत ?

स्वामीं भक्तहो..आजची चिंतन मनन ची ओवी.. यावर आपण चिंतन मनन करावे.. स्वामीं नेमके काय सांगत आहेत..पहिल्या ओवीतून कदाचित आपला संभ्रम निर्माण होईल..जर आपण दुसरी ओवी वाचली नाही तर...देवांचे ही देव स्वामीं आहेत..स्वामीच ब्रम्हा आहेत..स्वामीं च ब्रह्म आहेत..स्वामीच परब्रह्म...

स्वामी नाम सेवेतील अडचणी

स्वामीं नाम सेवेतील अडचणी १)वेळ नाही २) खूप काम ३)कंटाळा ४)आज इच्छा नाही ५) उद्या पासून करू ६) जप करताना झोप येते अशी हजारों कारणे आपल्याकडे आहेत पण जेव्हा मी माझ्या स्वामीं ना हाक मारतो ना..स्वामीं आई वाचव..तेव्हा मात्र स्वामीं आई कोणतेच कारण देत नाही.. जर स्वामीं नी...

आपण सर्व जाणतो का ?

स्वामी वाणी पुष्प ५७९(पर्व ४ थे भाग ८३) आजचे चिंतन-मनन न शास्त्र जाणतो , न धर्म जाणतो , न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो ! मुठमती मी अज्ञानी, तुझ्या चरणापेक्षा काहीही मोठे नाही इतुके मात्र जाणतो ! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी समज हि आहे आणि...

सज्जन कुणाला म्हणावे ?

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२) आजचे चिंतन-मनन सज्जनांचे सज्जनत्व वाढव ! दुर्जनांचे दुर्जनत्व घालव ! अवघे विश्व स्वामीमय होवो ! हेचि मागणे समर्था !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा...

देहभान हरपणे म्हणजे काय ?

स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)* *आजचे चिंतन-मनन* देहाचें भान न उरो ! गळून जाऊ दे अहंपणा ! कर चित्ताची शुद्धता ! मात्र तव चरण दर्शने !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे...देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण...

स्वामीं नाम आणि आपले जीवन

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)* *आजचे चिंतन-मनन* नाम घ्यावे,नाम द्यावे ! नाम सांगावे, नाम ऐकावे ! नाम पुजावे,नाम भजावे ! अवघे जीवन करावे नाममय !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात...