नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

May 14, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया

हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर सुद्धा मृत्यू येऊ नये ,  असा वर त्याने प्राप्त करून घेतला. हा वर प्राप्त झाल्यामुळे तो स्वतःला अजरामर समजू लागला त्याला वाटू लागले कि मीच देव आहे मीच सर्व शक्तिमान आहे  हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता मुलगा नेहमी  नामस्मरणात तल्लीन असत.  हे पाहून हिरण्यकश्यपू राजा ला फार राग येई त्याने आपल्या मुलाला खूप समजून सांगितले कि तू माझा जप कर मीच देव आहे.  पण प्रल्हाद मात्र भगवान विष्णूच्या नाम सेवेत तल्लीन असे हे सर्व पाहून हिरण्यकश्यपू  ला फार चीड येऊ लागली आणि त्याने  त्याला समजून सांगण्यासाठी त्याला शिक्षा केली पण तरी देखील प्रल्हाद विष्णूची नाम रुपी सेवा करणे सोडत नाही .मग मात्र हिरण्यकश्यपू  चा राग वाढला आणि त्याने शिपायांना प्रल्हादाला डोंगरावरून खाली ढकलून देण्यास सांगितले तरी देखील प्रल्हादाला काहीच इजा पोहचली नाही हे पाहून हिरण्यकश्यपूला खूपच राग आला आणि त्याने शिपायांना उकळत्या तेलात टाकण्याची आज्ञा दिली शिपायांनी प्रल्हादाला तेलात टाकले तर शिपायांना भाजले पण प्रल्हादाला काहीच झाले नाही. उलट प्रल्हाद नाम रुपी सेवेत तल्लीन होता .हे सर्व पाहून हिरण्यकश्यपू ने प्रल्हादला विचारला कि कुठे आहे तुझा ” नारायण नारायण ” दाखव मला कुठे आहे .तुझा भगवान विष्णू  बोलव त्याला तेव्हा प्रल्हाद म्हणाला माझा देव सर्वत्र आहे. तुम्ही जिथे पाहाल तिथे माझा देव आहे .आपण फक्त हाक मारा मग रागाच्या भरात  हिरण्यकश्यपूने विचारले कि या खांबात तुझा देव आहे का ? तेव्हा प्रल्हाद म्हणाला हो या खांबात माझा देव आहे. तेव्हा हिरण्यकश्यपू ने रागाच्या भरात लाकडी खांबाला लाथ मारली तेव्हा त्या खांबातून भगवान विष्णूंचा नृसिंह रूपात खांबातून बाहेर आले.  नृसिंह रूप पाहून हिरण्यकश्यपू खूप घाबरला .भगवान विष्णूं नृसिंह यांनी  हिरण्यकश्यपू ला मांडीवर घेतले व दाराच्या उंबऱ्यावर बसले ती वेळ होती सायंकाळची म्हणजे दिवस हि नव्हता रात्र हि नव्हती उंबरा म्हणजे घर हि नाही व घराच्या बाहेर हि नाही न कोणते शस्त्र न काही अस्त्र भगवान नृसिंह यांनी घराच्या उंबऱ्यावर नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून मुक्त केल अश्या प्रकारे भगवान विष्णूचा  नृसिंह अवतार झाला सर्वांनी एक घोषात ” नारायण नारायण ” ओम नमो भगवते वासुदेवाय ” नामाचा जय घोष केला

 

बोध – नृसिंह अवतार हा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा अवतार आहे. खरे तर हा अवतार म्हणजे आपणस आपला बोध करण्यास प्रेरणा देणार अवतार .चला आपण यावर चिंतन मनंन करूया, हिरण्यकश्यपू राजा होता .तो देखील देवाची सेवा करत होता व त्याने सेवा करून वर प्राप्त केला कि मला कधीच मरण येऊ नये खरे तर इथे आपणस आपल्यातील हिरण्यकश्यपू शोधायचा आहे कारण अनेकदा आपणस देखील विस्मरण होते कि आपण या पृथ्वी वर पाहुणे आहोत आपण अशा अविर्भावात जगतो कि मी अमर आहे. आजच्या लीलेतून आपणस बोध घ्यायचा आहे , कि मी देखील पाहुणा आहे .जे काही आयुष्य मला प्राप्त झाले आहे त्याचा मी सदुपयोग करेल जेणेकरून माझ्यातील हिरण्यकश्यपू मरून जाईल .भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त होता इथे आपणस भक्त प्रल्हाद यांच्या कडून नाम रुपी सेवेचे महत्व समजत आहे .समस्या कोणतीही असो आपणस नाम रुपी सेवा सुरु ठेवायची आहे. जसे भक्त प्रल्हाद यांना नृसिह यांनी तारले तसेच आपणास देखील आपली जी कोणती इष्ट देवता आहे ती तारणार आहे .आवश्यकता आहे केवळ अखंड नाम सेवेची इथे आपणस वाटते कि   हिरण्यकश्यपू हे वाईट होते खरे तर ते सुद्धा देव भक्त होते पण त्यांच्यात अहंकार निर्माण झाला होता व तो दूर करण्यासाठी  नृसिंह  अवतार झाला म्हणजेच आपल्यातील हिरण्यकश्यपू चा नाश व्हावा यासाठी अवतार झाला आहे .आपणस त्यावर काम करायचे आहे आणि खरी नृसिंह  जयंती साजरी करायची आहे व आपल्या जन्माचे सार्थक करायचे आहे.

चला आपण सर्व जण भगवान नृसिंह यांना प्रार्थना करूया – हे नृसिंहा तुझा नृसिंह अवतार म्हणजे आम्हाला आमच्या तील विकारांवर काम करण्यास प्रेरणा देणारा अवतार.. आमच्यातील हिरण्यकश्यपू चा नाश कर.. कारण खरा हिरण्यकश्यपू आमच्यात आहे… पण आम्ही तो फक्त तुझ्या गोष्टीत शोधतो.. खरेतर आमच्यातील हिरण्यकश्यपू नाश होणे गरजेचे आहे… आणि तो तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही… आम्हाला भक्त प्रल्हादा सारखी भक्ती दे… आमच्या कडून तुझी नाम रुपी सेवा करून घे… आम्हाला तुझ्या नामात स्थिर कर… आणि आमचे आयुष्य रोजच नृसिंह जयंती मय बनव… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद…  सर्वांना नृसिंह जयंती च्या खूप खूप शुभेच्छा

 


Share
और पढिये !!

चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...

अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी

स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...

हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी

हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...

स्थानों का महत्व

हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...

हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.

हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...

ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है

स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...