श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

Mar 20, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही… महाराज अचानक शेगांव सोडून… शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून गेले… महाराज कुठे गेले हे कुणासच ठाऊक नव्हते… त्या पिंपळगाव गावात अरण्यात एक हेमाडपंती शंकराचे मंदिर होते… महाराज मंदिरात जाऊन बसले… पद्मासनात महाराज ध्यानस्थ बसले… त्या अरण्यात अनेक गुराखी मुले आपले गुरे घेऊन येत असत… गुरे चरत असताना काही मुले भगवान शंकराच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी येतात… तेव्हा त्यांना महाराजांचे दर्शन होते… महाराजांचे स्वरूप पाहून ते मुले जरा गोंधळून गेली.. कारण महाराज ध्यानस्थ बसले होते… त्या मुलांनी महाराजांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण महाराज काहीच बोलले नाही… काहींना वाटले हे साधू जेवण न मिळाल्या मुळे कदाचित बोलत नसावेत… तेव्हा त्या मुलांनी आपल्या जवळील जी शिदोरी होती… ठेचा.. भाकरी… कांदा महाराजांना दिला परंतु महाराज काहीच बोलले नाहीत.. ते ध्यानावस्थेतच होते…  मुलांना काहीच समजत नव्हते… ते एकमेकांशी बोलत होते..कुणी म्हणे हे मरण पावले आहेत असेही नाही कारण… मृत माणसाचे अंग गार असते… यांचे अंग गार नाही… कुणी म्हणे भूत… पण भूत असू शकत नाही… भूत मंदिरात बसणार नाही… कुणी म्हणाले हे देव असावेत… आपण यांचे पूजन करू… त्या सर्वांनी महाराजांची पूजा केली.. पण महाराज काही ध्यानातून बाहेर आले नाही… आता दिवस मावळण्याची वेळ झाली होती… सर्व मुले एकमेकांना म्हणाली आता आपण घरी जाऊ या… आपले घरचे वाट पहात असतील… त्या मुलांनी ठेचा भाकरी तशीच ठेवली व सर्व जण आपापल्या घरी निघून गेले … सर्वांनी घरी गेल्यावर हि घटना आपल्या घरी सांगितली… संपूर्ण गावात हि बातमी पसरली… दुसऱ्या दिवशी सर्व गावाचं त्या मंदिरात आले… पाहतो तर काय… महाराज त्याच अवस्थेत होते… महाराजांनी भाकरी सुद्धा खाल्ली नव्हती… सर्वांना आश्चर्य वाटले… काही जण म्हणे हे शिवजी आहेत… समाधी अवस्थेत आहेत.. त्यांना त्रास होईल असे वर्तन करू नका… गावातील सर्व लोकांनी एक पालखी सजवली आणि त्यात महाराजांना बसवले… महाराजांची पूजा केली… वाद्य संगीतात महाराजांची पालखी सोहळा करण्यात आला… अनेक लोक भजन म्हणत होती… जय जय योगीराज मूर्ती… महाराजांची पालखी गावातील मारुती मंदिरात आणण्यात आली… पाटावर महाराजांना बसवण्यात आले.. महाराज समाधी अवस्थेतच होते… तोही दिवस तसाच गेला… आता लोकांना काय करावे समजत नव्हते… कुणी स्तवन करत होते… कुणी प्रार्थना करत होते… तर काही जणांनी उपवास पकडला… महाराजांनी समाधी अवस्थेतून बाहेर येऊन आपल्याशी बोलावे या साठी…आणि काय आश्चर्य महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले… उपस्थित सर्व मंडळी आनंदित झाली… सर्वानी महाराजांना नैवैद्य ग्रहण करण्याची विनंती केली… महाराजांनी नैवद्य ग्रहण केला… सर्व जण खूप आनंदित झाले… तो दिवस होता सोमवार चा … सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयजयकार केला… जय जय योगीराज मूर्ती .

बोध – वरील लीला तर आपल्या मनाचे दर्शन होण्यासाठी एक आरसाच आहे.. महाराज शेगांव सोडून अचानकपणे पिंपळगाव गावात आले.. म्हणजेच परब्रह्म हे कधीच एका ठिकाणी नसतात… ते सर्वत्र असतात.. त्यांना आपण कोणत्याही क्षेत्रा पुरते मर्यादित समजू नये… महाराज अरण्यातील शिव मंदिरात ध्यानस्थ बसले.. महाराज इथे आपणस ध्यानाचे महत्व सांगत आहेत.. आपणस जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ध्यानात जावे… म्हणजेच आपल्या मूळ अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करावा हा खूप खोल असा संदेश महाराज आपणस देत आहेत… इथे गुराखी मुले गुरांना चरण्यासाठी घेऊन आले होते… जेणेकरून त्यांना मनसोक्त चरण्याचा आनंद घेता येईल… इथे महाराज आपल्याला आपल्या मनाचे दर्शन घडवत आहेत… आपले मन देखील त्या गुरां प्रमाणे इकडे तिकडे चोहीकडे धावत असते… ते कधीच एका ठिकाणी स्थिर रहात नाही… महाराज यातून आपणस सांगत आहेत… ज्या प्रमाणे गुरे चरण्यासाठी गुराखी विशिष्ठ ठिकाणी घेऊन जातात जेणेकरून इतर कुणाचे नुकसान होऊ नये… इथे महाराज या गोष्टीला निमित्त करून सांगत आहेत ज्या प्रमाणे गुराखी गुरे एका ठिकाणी चरण्यासाठी आणतो… त्या प्रमाणे आपणस आपले मन चांगल्या गोष्टी साठी स्थिर करायचे आहे… जेणेकरून ते चुकीच्या ठिकाणी धाव घेणार नाही… महाराजांना पाहिल्या नंतर त्या मुलांच्या मनात अनेक प्रश्न आले… त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट केली कि महाराजांना खाण्यासाठी ठेचा… भाकरी आणून दिली… यातून आपणस बोध होतो कि आपण आपल्या भोजनातील काही हिस्सा गरजू व्यक्तीला देणे आवश्यक आहे… पहा त्या गुराखी मुलांकडे किती भाकरी असेल त्यांच्या पुरतीची असेल… पण तरी देखील त्यांनी आपल्यातील भाकरी त्यांना दिली… यातून आपणस इतरांना देण्याचा गुण विकसित करण्यास सांगत आहेत… गावांतील लोकांनी महाराजांना शिव स्वरूप मानले…आणि श्रद्धा युक्त त्यांनी महाराजांचे पूजन केली… अनके भजने … प्रार्थना केल्या पण महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले नाहीत… हे सर्व पाहून त्यानी उपवासाचे व्रत घेतले… या व्रतातून आपणस विश्वास … श्रद्धा व भक्ती कशी असावी याची आपणास महाराज ओळख करून देत आहेत… उपवास म्हणजे केवळ अन्न पाणी सोडणे नाही तर…आपल्यातील नकारात्मक विचारांचा उपवास करण्याची महाराज आपणस शिकवण देत आहेत.. थोडक्यात आजची लीला म्हणजे बोधांचा खजाना आहे. चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… हे समर्था आजच्या लीलेतून तू आम्हाला आमच्या मनाचे दर्शन घडवून दिलेस त्याबद्दल धन्यवाद…आपण आजच्या लीलेस माध्यम करून ध्यानाचे जे महत्व समजून दिलेस त्याबद्दल धन्यवाद..आम्हाला तुझ्या ध्यानात मग्न कर… आमच्या मनाला ध्यानाची सवय लागावी यासाठी मला मदत कर…आमच्यात इतरांना देण्याचा गुण विकसित कर.. आम्हाला आमच्यातील नकारात्मक विचारांवर उपवास करण्याची सवय आमच्यात दृढ कर… समर्था हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद !! 


Share
और पढिये !!

परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)* *आजचे चिंतन-मनन* परमशांती मधील स्वरनाद तू , शून्या मधील अस्तित्व तू , बुद्धीच्या ही पलीकडे असलेला , ऐसा अतर्क्य समर्थ तू !! www.SwamiVaanni.co.in स्वामीं भक्तहो...परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो...

अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७) आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा , प्रसादरूपे दिलासी ! www.SwamiVaani.com आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,...

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो...पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम...

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६) आजचे चिंतन-मनन मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे ! माता म्हणोनिया !! प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी ! कुटुंब प्रमुख म्हणोनिया !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन...

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५) आजचे चिंतन-मनन नामाचा नको कंटाळा ! स्वामींचा असावा जिव्हाळा !! प्रेमभावे नित्य आळवावा ! स्वामी माझा !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ,...

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४) आजचे चिंतन-मनन अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !! निरंतर ध्यास दे समर्था ! आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.....

जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३) आजचे चिंतन-मनन जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !! ह्यातच आहे आपुले कल्याण ! संशय न धरावा मनी !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ...

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१) आजचे चिंतन-मनन तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !! दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !! दास राहीन सदैव !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो...भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द...खरच...

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता ! शरण आलो तुला !! 'मी' पणाच्या जाळ्यात,मन हे फसले ! मुक्त कर तू मला !! स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक...

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९) आजचे चिंतन-मनन वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !! प्रेमभावे दर्शना जाती , प्रत्यक्ष दिसती स्वामी !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे...