श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Feb 13, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली…. खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती… परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच… पण उलट श्री महाराजां बद्दल अश्रद्धा युक्त शब्द उच्चारले… असो त्याच दिवशी श्री जानकीराम यांच्या कडे श्राद्ध होते …श्राद्ध विधी साठी त्यांनी अनेक लोकांना बोलावले होते… श्राद्ध पूजा साठी त्यांनी सर्व स्वयंपाक केला होता …त्यात मुख्य असते ती खीर आणि वडा हे पदार्थ सुद्धा त्यानी बनवले होते… श्राद्ध पूजा पूर्ण झाली ..आता भोजन करण्याची वेळ आली.. सर्व जण जेवण करण्यासाठी बसले सर्व पदार्थ वाढण्यात आले खीर वाढण्यासाठी श्री जानकीराम यांनी पातेले हातत घेतले तर.. त्यांना खिरीत काही तर वळवळ करताना दिसले …त्यानी व्यवस्थित पाहिले तर त्यांना दिसले कि संपूर्ण खिरीच्या भांडयात त्यांना अळया दिसू लागल्या.. हे सर्व पाहून सर्व लोक जेवण न करताच तसेच निघून गेले..  हे सर्व कसे झाले यावर त्यानी विचार केल्या नंतर त्याना असे वाटले कि आपण श्री महाराजांना अग्नी दिला नाही …तसेच त्यांच्या बद्दल अपशब्द बोललो त्या मुळे हे घडले असावे… हा विचार क्ररुन ते श्री महाराजांकडे गेले तिथे बंकटलाल होते.. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि त्याना विनंती केली कि मला श्री महाराजकडे घेऊन चला… मला त्याची माफी मागायची आहे… बंकटलाल त्याना श्री महाराजांकडे नेतात श्री महाराजांकडे जाताच जानकीराम क्षमा प्रार्थना करतात …महाराज आपण साक्षात उमानाथ आहात… मला माफ करा… आज माझे सर्व संशय दूर झाले ..माझे अपराध पोटात घ्या… इथून पुढे मी कुणाचीच मजाक करणार नाही… कुणाची टीका करणार नाही.. मला आज जी शिक्षा दिलीस ती पुरी आहे… तू अनाथांचा नाथ आहेस… आता माझा अंत पाहू नकोस… महाराजांनी श्री जानकीराम यांच्याकडे पाहिले आणि बोलले.. अरे आन इकडे ते खिरेचे भाडे अरे यात अळया नाहीत… उलट तुझी खीर खुपच मधुर आहे …महाराजांची हि लीला पाहून सर्वाना महाराजांच्या अंत साक्षीत्वाचा अनुभव आला सर्वानी एक घोषात महाराजांचा जय जय कार केला.

बोध – वरील लीला म्हणजे आपल्या मनाला शिकवण आहे.. श्री जानकी राम यांच्या मनात जश्या शंका येत होत्या… अश्या अनेक शंका आपल्या मनात आपण अडचणीत असताना येत असतात… नक्की महाराज माझे काम करतील का ? अनेकदा आपण इतक्या अडचणीत असतो कि आपण कळत न कळत महाराजांन बद्दल शंका मनात निर्माण होते … खरे तर त्या वेळेस आपल्यातील जानकीराम जागृत असतो.. आणि तो आपणस महाराजांपासून दूर नेत असतो ..आणि आपण कधी दूर जातो हे आपणस हि कळत नाही.. वरील लीलेत खिरीत अळ्या झाल्या असे श्री जानकी राम यांना दिसल्या.. यातून महाराज आपणस सांगत आहेत ..अरे जश्या त्या खिरीत अळ्या झाल्या त्या मुळे ती खीर खाण्यास लायक नाही ..त्याच प्रमाणे आपल्या मनात.. विचारात जी बाधा आहे… ती असेल तर आपण खरी भक्ती करू शकत नाही… त्या साठी आपणस आपल्या मनावर कार्य करणे आवश्यक आहे… जेणेकरून मनातील अळ्या म्हणजे कुविचार जातील… आणि आपण आपले लक्ष प्राप्त करू शकू ..खरे तर महाराजांची प्रत्येक लीला हि आपल्या साठीच आहे.. फक्त गरज आहे त्यावर चिंतन मनंन करण्याची व त्या नुसार काम करण्याची चला तर मग आपण महाराजांना प्रार्थना करूया !!

श्री गजानन महाराज आजच्या लीलेस माध्यम करून… आज आपण आम्हाला आमच्या मनाचे दर्शन घडवलेत.. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.. खरे तर आम्ही अनेक काम करतो ..पण कधी स्वतःच्या मनावर कार्य करत नाही.. कारण माझे मन नेहमी सांगते कि मीच बरोबर आहे.. आणि हि जी ..मी ..मी ..ची बाधा आहे.. तीच मला तुझ्या सत्य स्वरूपा पासून दूर नेते.. जसे जानकीराम यांच्यावर कृपा केलीत तशी कृपा आमच्यावर करा… माझे मन मी ..मी च्या ऐवजी …तुझ्या नामाचा धावा करेल ..अशी शिकवण माझ्या मनाला दे.. कारण जेव्हा मन तुझ्या नामात अडकेल.. तेव्हा ते मी ..मी करणार नाही.. आणि त्यामुळे तुला अपेक्षित असणारी अभिव्यक्ती सहजपणे आमच्याकडून होईल ..धन्यवाद आई.. हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !!!

 


Share
और पढिये !!

स्वामी सेवेचा सोपा मार्ग

स्वामी भक्तहो..जप सेवा करायचीच आहे तर सोप्पा मार्ग.. रोज सकाळी उठलात कि मोबाईल फोन सुरु करण्यापूर्वी स्वामी नाम घ्या.. मग मोबाइल हातात घेऊन आजची सेवा सबमिट करा.. झाली कि आजची सेवा.. पहा किती सोपे आहे स्वामी नाम सेवेचा...

स्वामी नाम घ्या

स्वामी भक्तहो सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने रोज थोडी तरी स्वामी नाम सेवा आणि किमान एकदा तरी तारक मंत्र सेवा करा.. आपण दिवस भरात किती तरी वेळ वाया घालवतो ते आपणस जाणवतही नाही.. आणि जेव्हा स्वामी नाम सेवा येते तेव्हा आपले मन कारणे देते.. हि सामूहिक सेवा आहे.. या मध्ये...

स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१

स्वामी वाणी पुष्प ५२१(पर्व ४ थे भाग २५) कलियुगी दिवसेंदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१८ ओ.५१ www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी स्वामीं चरित्र यातील आहे..यावर आपण चिंतन मनन करा..अशी रोज...

कर्ता कोण आहे ?

स्वामी वाणी पुष्प ५२३(पर्व ४ थे भाग २७) कर्ता आणि करविता । तूचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥ - स्वामी चरित्र सारामृत अ.१ ओ.५० www.SwamiVaani.com वरील ओवीवर आपण चिंतन मनन केले तर अनेक प्रश्नाचे उत्तर स्वामी आपणस देतात.. कर्ता हा भाव हा आपल्यात...

स्वामी कोण आहेत ?

स्वामीं भक्तहो..आजची चिंतन मनन ची ओवी.. यावर आपण चिंतन मनन करावे.. स्वामीं नेमके काय सांगत आहेत..पहिल्या ओवीतून कदाचित आपला संभ्रम निर्माण होईल..जर आपण दुसरी ओवी वाचली नाही तर...देवांचे ही देव स्वामीं आहेत..स्वामीच ब्रम्हा आहेत..स्वामीं च ब्रह्म आहेत..स्वामीच परब्रह्म...

स्वामी नाम सेवेतील अडचणी

स्वामीं नाम सेवेतील अडचणी १)वेळ नाही २) खूप काम ३)कंटाळा ४)आज इच्छा नाही ५) उद्या पासून करू ६) जप करताना झोप येते अशी हजारों कारणे आपल्याकडे आहेत पण जेव्हा मी माझ्या स्वामीं ना हाक मारतो ना..स्वामीं आई वाचव..तेव्हा मात्र स्वामीं आई कोणतेच कारण देत नाही.. जर स्वामीं नी...

आपण सर्व जाणतो का ?

स्वामी वाणी पुष्प ५७९(पर्व ४ थे भाग ८३) आजचे चिंतन-मनन न शास्त्र जाणतो , न धर्म जाणतो , न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो ! मुठमती मी अज्ञानी, तुझ्या चरणापेक्षा काहीही मोठे नाही इतुके मात्र जाणतो ! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी समज हि आहे आणि...

सज्जन कुणाला म्हणावे ?

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२) आजचे चिंतन-मनन सज्जनांचे सज्जनत्व वाढव ! दुर्जनांचे दुर्जनत्व घालव ! अवघे विश्व स्वामीमय होवो ! हेचि मागणे समर्था !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा...

देहभान हरपणे म्हणजे काय ?

स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)* *आजचे चिंतन-मनन* देहाचें भान न उरो ! गळून जाऊ दे अहंपणा ! कर चित्ताची शुद्धता ! मात्र तव चरण दर्शने !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे...देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण...

स्वामीं नाम आणि आपले जीवन

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)* *आजचे चिंतन-मनन* नाम घ्यावे,नाम द्यावे ! नाम सांगावे, नाम ऐकावे ! नाम पुजावे,नाम भजावे ! अवघे जीवन करावे नाममय !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात...