श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Feb 13, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली…. खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती… परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच… पण उलट श्री महाराजां बद्दल अश्रद्धा युक्त शब्द उच्चारले… असो त्याच दिवशी श्री जानकीराम यांच्या कडे श्राद्ध होते …श्राद्ध विधी साठी त्यांनी अनेक लोकांना बोलावले होते… श्राद्ध पूजा साठी त्यांनी सर्व स्वयंपाक केला होता …त्यात मुख्य असते ती खीर आणि वडा हे पदार्थ सुद्धा त्यानी बनवले होते… श्राद्ध पूजा पूर्ण झाली ..आता भोजन करण्याची वेळ आली.. सर्व जण जेवण करण्यासाठी बसले सर्व पदार्थ वाढण्यात आले खीर वाढण्यासाठी श्री जानकीराम यांनी पातेले हातत घेतले तर.. त्यांना खिरीत काही तर वळवळ करताना दिसले …त्यानी व्यवस्थित पाहिले तर त्यांना दिसले कि संपूर्ण खिरीच्या भांडयात त्यांना अळया दिसू लागल्या.. हे सर्व पाहून सर्व लोक जेवण न करताच तसेच निघून गेले..  हे सर्व कसे झाले यावर त्यानी विचार केल्या नंतर त्याना असे वाटले कि आपण श्री महाराजांना अग्नी दिला नाही …तसेच त्यांच्या बद्दल अपशब्द बोललो त्या मुळे हे घडले असावे… हा विचार क्ररुन ते श्री महाराजांकडे गेले तिथे बंकटलाल होते.. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि त्याना विनंती केली कि मला श्री महाराजकडे घेऊन चला… मला त्याची माफी मागायची आहे… बंकटलाल त्याना श्री महाराजांकडे नेतात श्री महाराजांकडे जाताच जानकीराम क्षमा प्रार्थना करतात …महाराज आपण साक्षात उमानाथ आहात… मला माफ करा… आज माझे सर्व संशय दूर झाले ..माझे अपराध पोटात घ्या… इथून पुढे मी कुणाचीच मजाक करणार नाही… कुणाची टीका करणार नाही.. मला आज जी शिक्षा दिलीस ती पुरी आहे… तू अनाथांचा नाथ आहेस… आता माझा अंत पाहू नकोस… महाराजांनी श्री जानकीराम यांच्याकडे पाहिले आणि बोलले.. अरे आन इकडे ते खिरेचे भाडे अरे यात अळया नाहीत… उलट तुझी खीर खुपच मधुर आहे …महाराजांची हि लीला पाहून सर्वाना महाराजांच्या अंत साक्षीत्वाचा अनुभव आला सर्वानी एक घोषात महाराजांचा जय जय कार केला.

बोध – वरील लीला म्हणजे आपल्या मनाला शिकवण आहे.. श्री जानकी राम यांच्या मनात जश्या शंका येत होत्या… अश्या अनेक शंका आपल्या मनात आपण अडचणीत असताना येत असतात… नक्की महाराज माझे काम करतील का ? अनेकदा आपण इतक्या अडचणीत असतो कि आपण कळत न कळत महाराजांन बद्दल शंका मनात निर्माण होते … खरे तर त्या वेळेस आपल्यातील जानकीराम जागृत असतो.. आणि तो आपणस महाराजांपासून दूर नेत असतो ..आणि आपण कधी दूर जातो हे आपणस हि कळत नाही.. वरील लीलेत खिरीत अळ्या झाल्या असे श्री जानकी राम यांना दिसल्या.. यातून महाराज आपणस सांगत आहेत ..अरे जश्या त्या खिरीत अळ्या झाल्या त्या मुळे ती खीर खाण्यास लायक नाही ..त्याच प्रमाणे आपल्या मनात.. विचारात जी बाधा आहे… ती असेल तर आपण खरी भक्ती करू शकत नाही… त्या साठी आपणस आपल्या मनावर कार्य करणे आवश्यक आहे… जेणेकरून मनातील अळ्या म्हणजे कुविचार जातील… आणि आपण आपले लक्ष प्राप्त करू शकू ..खरे तर महाराजांची प्रत्येक लीला हि आपल्या साठीच आहे.. फक्त गरज आहे त्यावर चिंतन मनंन करण्याची व त्या नुसार काम करण्याची चला तर मग आपण महाराजांना प्रार्थना करूया !!

श्री गजानन महाराज आजच्या लीलेस माध्यम करून… आज आपण आम्हाला आमच्या मनाचे दर्शन घडवलेत.. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.. खरे तर आम्ही अनेक काम करतो ..पण कधी स्वतःच्या मनावर कार्य करत नाही.. कारण माझे मन नेहमी सांगते कि मीच बरोबर आहे.. आणि हि जी ..मी ..मी ..ची बाधा आहे.. तीच मला तुझ्या सत्य स्वरूपा पासून दूर नेते.. जसे जानकीराम यांच्यावर कृपा केलीत तशी कृपा आमच्यावर करा… माझे मन मी ..मी च्या ऐवजी …तुझ्या नामाचा धावा करेल ..अशी शिकवण माझ्या मनाला दे.. कारण जेव्हा मन तुझ्या नामात अडकेल.. तेव्हा ते मी ..मी करणार नाही.. आणि त्यामुळे तुला अपेक्षित असणारी अभिव्यक्ती सहजपणे आमच्याकडून होईल ..धन्यवाद आई.. हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !!!

 


Share
और पढिये !!

परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)* *आजचे चिंतन-मनन* परमशांती मधील स्वरनाद तू , शून्या मधील अस्तित्व तू , बुद्धीच्या ही पलीकडे असलेला , ऐसा अतर्क्य समर्थ तू !! www.SwamiVaanni.co.in स्वामीं भक्तहो...परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो...

अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७) आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा , प्रसादरूपे दिलासी ! www.SwamiVaani.com आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,...

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो...पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम...

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६) आजचे चिंतन-मनन मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे ! माता म्हणोनिया !! प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी ! कुटुंब प्रमुख म्हणोनिया !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन...

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५) आजचे चिंतन-मनन नामाचा नको कंटाळा ! स्वामींचा असावा जिव्हाळा !! प्रेमभावे नित्य आळवावा ! स्वामी माझा !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ,...

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४) आजचे चिंतन-मनन अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !! निरंतर ध्यास दे समर्था ! आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.....

जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३) आजचे चिंतन-मनन जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !! ह्यातच आहे आपुले कल्याण ! संशय न धरावा मनी !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ...

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१) आजचे चिंतन-मनन तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !! दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !! दास राहीन सदैव !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो...भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द...खरच...

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता ! शरण आलो तुला !! 'मी' पणाच्या जाळ्यात,मन हे फसले ! मुक्त कर तू मला !! स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक...

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९) आजचे चिंतन-मनन वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !! प्रेमभावे दर्शना जाती , प्रत्यक्ष दिसती स्वामी !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे...