नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 19, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात
” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें |
नामस्मरण भक्ति हि खूपच सुंदर अशी भक्ती आहे… हि भक्ती करण्यासाठी आपल्याला कोणत्याही सामुग्रीची आवश्यकता लागत नाही…उपरोक्त श्लोका द्वारे रामदास स्वामी सांगत आहेत… भगवंताचे स्मरण करावे रोज नित्यनेमाने , प्रातः ककाळी , दुपारी , आणि सायंकाळी नामस्मरण करावे… शिवाय जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करावे… ज्या पण कोणत्या देवावर आपली श्रद्धा असेल त्या भगवंताचे आपण नामस्मरण भक्ति आपण करू शकतो… जसे आपली भगवान श्री कृष्णावर श्रद्धा असेल तर आपण ” ओम नमो भगवते वासुदेवाय… थोडक्यात आपली ज्या देवावर आपली श्रद्धा असेल त्या देवाचे नामस्मरण रुपी सेवा आपण करावी… अनेकदा आपल्या मनात प्रश्न असतो कि नामस्मरण कधी करावे… याचे उत्तर आपणस समर्थ रामदास स्वामी यांनी आपणस दिले आहे कि रोज ना चुकता भगवंताचे नामस्मरण करावे… सकाळी उठले कि … दुपारी… संध्याकाळी तसेच आपणस जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अखंड नामस्मरण रुपी भक्ती करावी… या साठी कोणतेही बंधन नाहीये कि अमुक अश्या अवस्थेतच जप करावा…हा भगवंताच्या भक्तीचा खूप सुंदर असा मार्ग आहे… ज्याप्रमाणे आपला श्वास अखंड चालू आहे त्या प्रमाणे आपली नाम रुपी सेवा सुरु असली पाहिजे… या मुळे आपणस आपल्या मनास नाम रुपी सेवेची सवय लावायची आहे… सर्वांना नक्कीच विनंती आहे कि रोज किमान १ माळ आपली ज्या कोणत्या देवावर श्रद्धा असेल त्याभगवंताचे नाम सेवा करावी… या मध्ये एक गोष्ट महत्वाची कि अमुक एक मंत्रच श्रेष्ठ अशी शंका मनात आणू नये … प्रत्येक नाम हे श्रेष्ठच आहे.

चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था… नाम कधी घ्यावे हि समज तू आज आम्हाला दिलीस…आमचे मन अनेकदा अनेक मंत्राचा जप करते कारण… मनाला असे वाटते कि हा मंत्राचा जप केला तर अमुक फायदा होईल… आणि या कारणाने नामस्मरण भक्ति चा जो खरा फायदा मिळवायचा आहे त्यापासून आम्ही दूर जातो… आमची हीच प्रार्थना आहे कि एक नामावर आम्हाला स्थिर कर… धन्यवाद स्वामी… कोटी कोटी धन्यवाद.. !
जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)* *आजचे चिंतन-मनन* परमशांती मधील स्वरनाद तू , शून्या मधील अस्तित्व तू , बुद्धीच्या ही पलीकडे असलेला , ऐसा अतर्क्य समर्थ तू !! www.SwamiVaanni.co.in स्वामीं भक्तहो...परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो...

अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७) आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा , प्रसादरूपे दिलासी ! www.SwamiVaani.com आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,...

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो...पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम...

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६) आजचे चिंतन-मनन मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे ! माता म्हणोनिया !! प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी ! कुटुंब प्रमुख म्हणोनिया !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन...

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५) आजचे चिंतन-मनन नामाचा नको कंटाळा ! स्वामींचा असावा जिव्हाळा !! प्रेमभावे नित्य आळवावा ! स्वामी माझा !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ,...

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४) आजचे चिंतन-मनन अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !! निरंतर ध्यास दे समर्था ! आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.....

जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३) आजचे चिंतन-मनन जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !! ह्यातच आहे आपुले कल्याण ! संशय न धरावा मनी !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ...

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१) आजचे चिंतन-मनन तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !! दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !! दास राहीन सदैव !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो...भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द...खरच...

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता ! शरण आलो तुला !! 'मी' पणाच्या जाळ्यात,मन हे फसले ! मुक्त कर तू मला !! स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक...

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९) आजचे चिंतन-मनन वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !! प्रेमभावे दर्शना जाती , प्रत्यक्ष दिसती स्वामी !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे...