साडेसाती म्हणजे – आपला उत्कर्ष

Oct 31, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

लेखाचे शीर्षक वाचून आपण म्हणाल हे काय सांगता… आज पर्यंत आम्ही साडेसाती म्हंटले कि आम्ही फारच घाबरतो… कुणाला विचारले कि तुम्हाला साडेसाती सुरु आहे का ? आणि जर खरंच त्या व्यक्तीला साडेसाती सुरु असेल तर तो… त्याला त्रास असो वा नसो तो म्हणतो हो ना खूपच त्रास आहे… साडेसाती सुरु आहे… त्याला जर विचारले साडेसाती म्हणजे काय तर तो सांगू शकत नाही.. खरंच साडेसाती म्हणजे काय ? खरंच  साडेसाती म्हणजे अडचण कि आपला परिपूर्ण उत्कर्ष ? आज आपण यावर थोडीशी माहिती घेऊ या… शनी देव हे प्रत्येक राशीतून गोचर भ्रमण करत असतात हा कालावधी अडीच वर्षाचा असतो … म्हणजेच जेव्हा तो आपल्या राशीच्या आधीच्या राशीला येतो तेव्हा आपणस साडेसाती सुरु होते… म्हणजेच आपल्या राशीच्या आधीची रास अडीच वर्ष + आपली रास अडीच वर्ष + आपल्या राशी नंतर ची रास अडीच वर्ष अश्या सर्वांची बेरीज म्हणजे साडेसाती… आता आपणस साडेसाती म्हणजे काय हे समजले असावे.. आता आपणस एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनिदेव हे न्याय प्रिय देव आहेत.. आपण म्हणाल शनीदेव  न्याय प्रिय आहेत… यावर जेव्हा आपण चिंतन मनन करू तेव्हा आपणस अनेक गोष्टींची उत्तरे प्राप्त होतील..आणि नक्की साडेसाती म्हणजे काय हे आपणस समजेल… आपण जे ही  काही काम करता ते प्रामाणिक पणे करत असाल… ते काम  करत असताना कुणाचेही नुकसान आपण करत नाही… मग आपणस किती वाईट वेळ असो.. आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करावे हि शनि देवांची अपेक्षा असते…आपण जर आपले कर्म करत असताना जर चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असाल तर नक्कीच आपणास आपल्या कर्माचे फळ मिळते… मग तो कालावधी साडेसाती असतो असे म्हणण्यास हरकत नाही… जर आपण आपले कर्म प्रामाणिक पणे करत असाल तर नक्कीच आपणस साडेसाती ची तीव्रता जाणवणारा नाही… आता आपणस कळले असावे न्याय प्रिय शनिदेव आहेत… न्याय प्रिय म्हणजे फक्त चांगले वागणेच न्याय प्रिय आहे का ? खरंतर ज्यांना साडेसाती आहे त्याच्या जीवनाच्या परिवर्तन चा हा काळ असतो… मग हे परिवर्तन चांगले असू शकते वा वाईट असू शकते… चांगले किंवा वाईट हे सर्व आपल्या वर अवलंबुन असते.. आपण आपल्या मनाला सांगितले कि आता माझ्या राशीला साडेसाती सुरु आहे… त्यामुळे मला खूप त्रास होत आहे… हि साडेसात वर्ष कशी जाणार माहित नाही… त्या वेळेस शनिदेवाच्या न्याय प्रिय स्वभावानुसार ते म्हणतात तुझी इच्छा पूर्ण होवो… म्हणजेच आपले नकारात्मक मन शनिदेवांची उपासना करण्यापेक्षा त्यांचा उपहास करते..आता तुम्हीच विचार करा.. जर तुमची कुणी टीका केली तर ती तुम्ही सहन करू शकता का ?नाही ना? मग या ठिकाणी आपण न्याय प्रिय  शनी देवांना नाव ठेवतो.. आपले मन पण तेच खरे मानते…  आणि एक म्हण आपणस माहीत असेलच  ती म्हणजे… वैरी न चिंती ते मन चिंती ” या म्हणी प्रमाणे आपणस फळ प्राप्त होतात आणि मग आपण आणखीन नकारात्मक बनून… साडेसाती… साडेसाती… करत त्यात पूर्णपणे फसून जातो…आणि मग सर्व रस्ते आपणस बंद दिसतात आणि खूपच त्रास होतो.. मग आपण म्हणाला काय केले तर खरंच  आम्हाला साडेसाती जाणवणार नाही … आमची प्रगती होईल… खरंतर… साडेसाती म्हणजे आपल्या जीवनाच्या यशाचा राजमार्ग आहे… कोणत्या आईला वा बापाला  वाटते का आपले बाळ मागे राहावे नाही ना… तसेच शनिदेवांना का वाटेल माझी भक्ती करणारे माझे भक्त अधोगतीस जावेत.. नाही ना.. तर मग आजपासून आपणस आपले विचारात  परिवर्तन करायचे आहे.. आपल्या मनाला सांगा हि जी काही  साडेसाती आली आहे ती मला सांगत आहे आता तुझा उत्कर्ष चा काळ सुरु झाला आहे… आजपर्यंत नक्कीच मी माझे कर्म करताना अनेक चुका केल्या असतील… त्या चुका पुन्हा करू नकोस असे शनी महाराज सांगत आहेत…जसे घर बांधताना आधी पाया मजबूत असावा लागतो नाही तर इमारत कोसळू शकते … तसेच हि साडेसाती मला सांगत आहे… बाळा तुझा पाया मजबूत कर म्हणजेच आधी तुझे मन जे आहे ते मजबूत बनव… मन हे तुझ्या जीवनाचा पाया आहे… तो मजबूत झाला कि… मग साडेसाती म्हणजे हि जी काही साडेसात वर्ष आहेत हि.. तुझे जीवन बदलून टाकण्यासाठी आली आहेत… प्रत्येक कर्म हे प्रामाणिकपणे कर … सुरवातीला तुला खूप त्रास होणार आहे कारण… हे काम शाब्दिक नाही तर कार्मिक आहे… प्रत्येक अडचणीला सामोरे जाताना श्री शनिदेवांना धन्यवाद द्या… पहा नक्कीच आपणस आपल्या

जीवनात चमत्कार पाहण्यास मिळतील.. मग कितीही  त्रास होऊ द्या तुमचे अंतर्मनातून एकच नाद येईल तो म्हणजे… धन्यवाद शनिदेव … कोटी कोटी धन्यवाद .

चला आपण सर्व मिळून शनी देवांना प्रार्थना करूया – हे शनिदेव मला माफ करा आजपर्यंत मला असे वाटायचे कि… साडेसाती म्हणजे शनिदेवांची वक्र दुष्टी.. पण मला आज समजले आहे कि साडेसाती म्हणजे माझ्या प्रगती साठी ईश्वराने मला दिलेली एक साद… एक कालावधी ..शनी देव आपल्या मुळेच तर मी जागृत झालो आहे… माझ्याकडून आपणस अपेक्षित असणारी कर्म करवून घ्या… हि साडेसात वर्ष माझे जीवन बदलून टाकणारी ठरावीत… आणि माझे मन सदैव सकरात्मक प्रतिसाद देऊ दे… धन्यवाद शनिदेव आपण मला हि समज  दिलीत त्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद ! हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद ! श्री शनी महाराज कि जय !!


Share
और पढिये !!

चोवीस तास स्वामीं भक्तीत कसे रहावे..!

स्वामी भक्तहो.. आपण अनेकदा म्हणतो ऐकतो.. अनेकदा स्वामी वाणीतून आपण ऐकतो "स्वामी भक्तीत रहावे" स्वामी भक्तीत राहणे याचा अर्थ असा आहे का आपण २४ तास स्वामी नाम घ्यायचे आहे.. हे शक्य सुद्धा नाही.. तर मग आपण स्वामी भक्तीत राहणार कसे.. स्वामी भक्तीत राहणे शक्य आहे का ? हो...

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ८ श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले...

अगर हमें कोई कुछ बता रहा हो.. हमें वो पसंद नहीं आ रहा हो.. क्यूंकि हम उसका अर्थ अपने विचारों से लगाते है. स्वामी वाणी

स्वामी भक्तो ..बहोत बार हम कुछ पढ़ते है या सुनते है लेकिन बहोत बार बार हम उसका अर्थ हमारी समझ की तहत लगाते है.. उससे बहोत बार हमें निराशा आती है या हमारे मन में शंका निर्माण होती है.. यह नियम केवल अध्यात्म में ही नहीं तो हमारे जीवन में लागु होता है.. इसे हम स्वामी वाणी...

हमें संकट में ईश्वर को दोष न देते हुवे ईश्वर का प्रसाद समझकर उस पर कार्य करना है.. स्वामी वाणी

हमारे जीवन में कोई समस्या आती है तो हमें लगता है की ईश्वर की हमपर अवकृपा है क्या इसलिए मेरे जीवन में समस्या आ रही है.. लेकिन ईश्वर किसी के ऊपर अवकृपा कभी नहीं करता..लेकिन हमारा मन ऐसा है की कभी कुछ अच्छा होता है तो हम क्या कहते है जरा सोचो..हम कहते है मैंने किया इसलिए...

स्थानों का महत्व

हमें पवित्र स्थानों को जाना चाहिए वहाँ हमे सकारात्मक ऊर्जा की प्राप्ती होती है..इसके बारे में शिव महा पुराण में कथा आती है..एक दिन नारद मुनि साधना करने के लिए हिमालय के एक गुफा में बैठे थे..अब इनकी साधना में बाधा निर्माण करने हेतु काम देव को विनती की..काम देव ने उनकी...

हमारा जीवन कब तक है हमे मालूम नहीं हमें सिर्फ हर एक कर्म ईश्वर सेवा समझ कर रहना है.

हमारा संपूर्ण जीवन नियोजित है.. कब हमारा जन्म होगा कब मृत्यु यह हमारे हाथ में नहीं.... फिर भी हमें ऐसा लगता है की मैं कर्ता हु.. लेकिन उस वक्त हम यह नहीं सोचते की कब ये साँस बंद हो पता नहीं फिर भी हम यह सब भूल जाते है.. हमें यह भूलना नहीं है.. चलो हम स्वामी वाणी की...

ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है

स्वामी भक्तो ईश्वर के दरबार में तो कोई जाती नहीं , धर्म नहीं या पंथ भी नहीं है.. लेकिन जब हम हमसे खुद से पूछे तो हम हमको सिर्फ एकहि धर्म के मानते है.. हमें हमारे धर्म का अभिमान जरूर होना चाहिए.. लेकिन और किसी धर्म पर घृणा नहीं होनी चाहिए.. क्यूंकि हम सब को निर्माण...