श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 2

Sep 26, 2021 | ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

Share

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय – ज्या घरात स्वामी सेवा केली जाते तिथे कश्याची कमतरता नसते. या ठिकाणी घरात म्हणजेच आपले ह्रदय मंदिर. ज्या वेळेस आपण स्वामींची सेवा करतो त्या वेळेस हळू हळू आपले मनाला स्थिरता प्राप्त होते. मनाची शुद्धता झाली कि हृदयातून स्वामी नाम येऊ लागते म्हणजेच ह्रदयात स्वामी विषयी अनन्य भक्ती प्रेम जागृत होते आणि मग त्या आपल्या जीवनात कशाचीच कमतरता राहत नाही. आपले जीवन प्रेम आनंद आणि मौन याने भरून जाते.

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय – स्वामी महाराज स्वतः आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवतात. आपण अनेकदा या गोष्टीची अनुभूती घेतली आहे. अनेकदा आपण अडचणीत संकटात असतो. स्वामी महाराजांना प्रार्थना करतो… ती प्रार्थना करताना आपल्या मनात अनन्य भाव असतो आणि आपण पाहतो कि आपणस व असणारी गोष्टीची प्राप्ती आपणस होते म्हणजेच आपणस अनुभूती येते कि कश्या पद्धतीने स्वामी महाराज आपले प्रारब्ध घडवतात.

आज्ञेविणा काळ ना नेई त्याला – स्वामींच्या इच्छे शिवाय परलोक प्राप्ती सुद्धा होत नाही. याची अनुभूती आपणा पैकी बहुतेकांनी घेतला आहे. अनेक व्यक्ती अश्या परिस्थिती मध्ये असतात कि आपणस असे वाटतं असते कि कधी हि हि व्यक्ती परलोकी जाऊ शकते.. अश्या वेळेस आपण सर्व आपल्या भाव भटकी नुसार स्वामी महाराजांना प्रार्थना करतो आणि मृत्यू शय्ये वर असणारी व्यक्ती बरी होते.. म्हणजेच स्वामींच्या आज्ञे शिवाय आपणस परलोक सुद्धा होत नाही.

परलोकही ना भिती तयाला – आता आपणस जरी मृत्यू आला तरी आपण ज्या कोणत्या लोकी जाऊ तिथे सुद्धा आपणस स्वामी कृपेची अनुभूत प्राप्त होते. म्हणजेच आपणास जरी मृत्यू आला तरी आपणस मृत्यू भीती राहत नाही. पहा समजा आपणस कुणी सांगितलें कि तुम्ही उद्या मरणार आहात. अश्या वेळेस आपल्या मनात असंख्य विचार येतात. मला कसे मरण येणार.. मरण इतक्या लवकर नको… काही त्रास होईल का. असं अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. पण जेव्हा स्वामी सेवेत असतो अन स्वामी कृपेने आपणस आपल्या सत्य स्वरूपाची जाणीव हते तेव्हा सर्व प्रकारची भीती नाहीशी होते व आपले मन सांगते. स्वामीच्या इच्छे नुसार होणार आहे. मी कशाला चिंता , भीती बाळगू


Share
और पढिये !!

परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)* *आजचे चिंतन-मनन* परमशांती मधील स्वरनाद तू , शून्या मधील अस्तित्व तू , बुद्धीच्या ही पलीकडे असलेला , ऐसा अतर्क्य समर्थ तू !! www.SwamiVaanni.co.in स्वामीं भक्तहो...परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो...

अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७) आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा , प्रसादरूपे दिलासी ! www.SwamiVaani.com आजचे चिंतन-मनन अक्कलकोटी आलो देवा , तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा ! अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,...

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो...पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम...

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६) आजचे चिंतन-मनन मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे ! माता म्हणोनिया !! प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी ! कुटुंब प्रमुख म्हणोनिया !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन...

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५) आजचे चिंतन-मनन नामाचा नको कंटाळा ! स्वामींचा असावा जिव्हाळा !! प्रेमभावे नित्य आळवावा ! स्वामी माझा !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ,...

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४) आजचे चिंतन-मनन अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !! निरंतर ध्यास दे समर्था ! आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.....

जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !!

स्वामी वाणी पुष्प ५३९(पर्व ४ थे भाग ४३) आजचे चिंतन-मनन जावे स्वामींना शरण ! करावे स्वामी आज्ञेचे पालन !! ह्यातच आहे आपुले कल्याण ! संशय न धरावा मनी !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो.. वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेल च..जावे स्वामीं ना शरण..इथे आपली गल्लत होऊ...

तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१) आजचे चिंतन-मनन तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !! दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !! दास राहीन सदैव !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो...भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द...खरच...

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

आजचे चिंतन-मनन तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता ! शरण आलो तुला !! 'मी' पणाच्या जाळ्यात,मन हे फसले ! मुक्त कर तू मला !! स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक...

वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !!

स्वामी वाणी पुष्प ५३५(पर्व ४ थे भाग ३९) आजचे चिंतन-मनन वटवृक्षातळी अक्कलकोटी , आजही समर्थ निवास करती !! प्रेमभावे दर्शना जाती , प्रत्यक्ष दिसती स्वामी !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वरील ओवी तर स्पष्ट आहे.. आपण सर्वच जाणता अक्कलकोट ला वटवृक्ष मंदिर आहे.. जिथे...