आपण सर्व जाणतो का ?

स्वामी वाणी पुष्प ५७९(पर्व ४ थे भाग ८३)

आजचे चिंतन-मनन

न शास्त्र जाणतो , न धर्म जाणतो ,
न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो !
मुठमती मी अज्ञानी,
तुझ्या चरणापेक्षा काहीही मोठे नाही
इतुके मात्र जाणतो !
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी समज हि आहे आणि प्रार्थना हि आहे.. हे समर्था मी शास्त्र जाणत नाही.. पहा आपण एखादे शास्त्राचा जरी आपण परिपूर्ण अभ्यास केला तरी देखील त्यातील काही तरी ज्ञान आपण जाणत नसतो.. पहा जसे आपणस एका जीव शास्त्राचे ज्ञान आहे तर भौतिक चे नाही.. हाच नियम अध्यात्मात हि लागू होतो.. न धर्म जाणतो.. इथे आपण म्हणू असे कसे मला माहित आहे कि मी अमूक अमुक धर्मात जन्म घेतला आहे हे मी जाणतो कि.. अहो पण इथे धर्म याचा अर्थ आहे आपणस मुख्य मनुष्य जन्माचा धर्म कोणता आहे.. नक्की कोणता धर्माचे पालन स्वामींना अपेक्षित आहे.. याचे आपल्या माहिती नाही.. न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो ! आपण भक्ती कशी करावी सेवा कोणती करावी हे पण जाणत नाही..पहा आपण एका देवाची भक्ती करतो का नाही.. आपण या देवाची भक्ती करतो कधी त्या देवाची सेवा करतो.. म्हणजेच आपले चित्त एका ठिकाणी स्थिर होते का नाही..म्हणजेच आपण सर्वच गोष्टीत अज्ञानी आहोत.. पण मग या सर्वांवर उपाय काय.. स्वामी चरण सेवा.. कारण आपण कितीही ज्ञान प्राप्त केले तरी जो पर्यत आपणस सत्याचे ज्ञान मिळत नाही तो पर्यंत सर्व व्यर्थ आहे..यावर उपाय काय स्वामी नाम सेवा.. रोज स्वामी नाम घ्या.. वेळ मिळाला कि स्वामी नाम घ्या.. स्वामी नाम साठी वेळ द्या.. स्वामी नाम ध्यान करा.. पहा स्वामी कृपेचा वर्षाव कसा होतो .. हा स्व अनुभव आहे.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

सज्जन कुणाला म्हणावे ?

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२)

आजचे चिंतन-मनन

सज्जनांचे सज्जनत्व वाढव !
दुर्जनांचे दुर्जनत्व घालव !
अवघे विश्व स्वामीमय होवो !
हेचि मागणे समर्था !!
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो कि आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो कि सज्जन नेमके कुणास म्हणायचे.. आपल्या मनात एक व्याख्या असते आणि व्यक्ती नुसार ती बदलत असते.. पण मग सज्जन कुणास म्हणावे.. स्वामी तुम्हींच यावर चिंतन मनन करून घ्या.. प्रत्येक व्यक्ती हि सज्जनच असते.. कारण प्रत्येक व्यक्ती मध्ये चांगले बनायची लालसा असते.. अशी एक व्यक्ती नाही कि तिला दुर्जन बनून आनंद होतो पण तो वेळेनुसार आपल्यात बदल करतो आणि स्वतःला दुर्जनांच्या यादीत बसवतो..आपण सज्जनांची व्याख्या करण्याचा प्रयत्न करूया ” जो कोणत्याही परिस्थितीत स्वामींना भूषणावह असेच आचरण करतो तोच सज्जन” पहा आपला काही तरी व्यक्तिगत फायदा होत आहे पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे नुकसान होते आहे तरीही आपण आपल्या फायदा व्हावा या साठी चुकीचे वर्तन करतो तेव्हा आपण सज्जनांच्या भूमिकेतून दुर्जनांच्या भूमिकेत जातो .. आता आपल्या सर्वांच्या मनात येते कि जर आपण वेळेनुसार आम्हीं तसे वागलो नाही तर आमचे कोणतेच काम होऊ शकत नाही मग आम्ही काय करायचे.. पहा जेव्हा आपण अडचणीत असतो आणि तेव्हाही संयम बाळगतो थोडे थांबतो आणि मग निर्णय घेतो नक्कीच स्वामींना भूषणावह निर्णय घेत असतो.. जेव्हा आपल्या मनात संभ्रम असेल तेव्हा थोडे शांत व्हा स्वामींना प्रार्थना करा मार्गदर्शन करा.. पहा आपला निर्णय हा स्वामींना भूषणावह म्हणजे सज्जन माणसाचा असेलसुरवातीला अवघड वाटेल पण नंतर आपणस यात यश.. जेव्हा प्रत्येक जण असा प्रयत्न करेल तेव्हा सर्व दुर्जनांचे दुर्जनत्व दूर होणार आहे.. आपल्या मनात येते मी एकटा चांगला वागून काय फायदा.. पहा पत्त्याचा बंगला असतो.. त्यातील एक पत्ता काढला तर बंगला पडतो तसेच आपण आपल्यातील दुर्गुण काढला तर इतर लोक हि आपल्यातील दुर्गुण काढतील..सज्जन होतील.. आणि संपूर्ण विश्व् हे स्वामी मय होईल.. पहा किती सुंदर नियोजन आहे आपल्या स्वामींचे फक्त गरज आहे आपल्यातील दुर्गुण काढून चांगले गुण धारण करण्याची म्हणजेच आपल्यात स्वामींना भूषणावह असणारे सज्जनांचे गुण आपल्यात धारण करण्याचा.. चला तर मग आपल्या स्वतःवर कार्य करूया.. धन्यवाद समर्था.. कोटी कोटी धन्यवाद… बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

देहभान हरपणे म्हणजे काय ?

स्वामी वाणी पुष्प ५७५(पर्व ४ थे भाग ७९)*

*आजचे चिंतन-मनन*

देहाचें भान न उरो !
गळून जाऊ दे अहंपणा !
कर चित्ताची शुद्धता !
मात्र तव चरण दर्शने !!

www.SwamiVaani.co.in
स्वामीं भक्तहो.. आजच्या स्वामीं वाणीत पहिली ओवी आहे…देहाचें भान न उरो ! देहाचे भान विसरून जर आपण एखादे काम करत असू तर आपणस त्या कामात यश नक्की प्राप्त होते..हा नियम आध्यत्मिक बाबतीत ही लागू होतो..पण इथे एक गल्लत आपली होऊ शकते…अन्न पाण्याचा त्याग करणे..असा अर्थ नसून.. स्वामीं नाम घेताना आपणस इतर गोष्टीचा त्याग करता यावा..जसे स्वामीं नाम घेताना आपणस झोप येते..कंटाळा येतो..या गोष्टींवर आपणस मात करण्याची समज स्वामीं आपणस देत आहेत.. पहा आपणस स्वामीं नाम घेताना झोप येते किंवा कंटाळा येतो..मग हे असे का होते यावर आपणस कार्य करायचे आहे..पहा जेव्हा आपण यावर काम करू तेव्हा आपला देह स्वामीं नाम सेवेस तयार होणार आहे..म्हणजेच आपल्या देहाचे भान हरपेल.. यासाठी मनाला आणि शरीराला स्वामीं नाम सेवेस बसवा..मन नको म्हणेल..ते का नको म्हणता आहे..त्याचा अभ्यास करा..आपल्यातील ते दोष दूर करा..नक्कीच आपणस यश येईल..गळून जाऊ दे अहंपणा ! अध्यात्म असो वा व्यक्तीगत जीवन यात मोठा अडसर कोणता असेल तर..तो आहे..अहंपणा..पहा मी इतकी सेवा करतो..सेवा कोण करतो मी..मी इतके देवाचे करतो…म्हणजेच अहंपणा..अहो त्याच्या इच्छे शिवाय आपण पुढचा श्वास घेऊ शकत नाही..स्वामीं सेवा किंवा इतर गोष्टी काय करणार..इथं असा गैरसमज करून घेऊ नका मी काहीच कर्म करणार नाही..असे नाही सर्व काही करा पण आपल्यातील अहंपणा सोडा..कर्म करून विसरून जा..म्हणजेच स्वामीं सेवा केली असे म्हणण्या ऐवजी म्हणा…” स्वामीं नी सेवा करून घेतली” पहा कसा हळूहळू अहंभाव गळून पडेल..कर चित्ताची शुद्धता !
मात्र तव चरण दर्शने !! पहा जर आपले चित्त शुद्ध नसेल तर आपणस अडचणी येतात..पहा दोन भांडी आहेत..दोन्ही स्वच्छ दिसतात..एक भांडे असे आहे त्यात नकळत थोडा भांडे घासण्याचा साबण राहिला आहे..पहा काय परिणाम होईल..जर आपल्या दिसले तर आपण ते स्वच्छ करू..जर ते स्वच्छ नाही केले तर त्यातील दूध खराब होईल..त्याच प्रमाणे आपण जर आपले चित्त शुद्धी केली नाही तर…आपण कोणतेच कार्य व्यवस्थित करू शकता नाही..म्हणून रोज प्रत्येक क्षणी चित्त शुद्धी वर लक्ष ठेवा..आपले चित्त स्वामीं चरणी लीन व्हावे यासाठी प्रार्थना करा..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नक्कीच यश देतील..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!

स्वामीं नाम आणि आपले जीवन

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)*

*आजचे चिंतन-मनन*

नाम घ्यावे,नाम द्यावे !
नाम सांगावे, नाम ऐकावे !
नाम पुजावे,नाम भजावे !
अवघे जीवन करावे नाममय !!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात सातत्य ठेवतो..तेव्हा नामाचा महिमा अनुभवास येतो..जर आपणस नामाची अनुभूती हवी असेल तर नाम घ्या..कोणतेही नाम घ्या…असे नाही की अमुकच नाम घ्यावे..कोणतेही नाम घ्यावे..नामावर मनाल स्थिर करा…नाम द्यावे..इथे आपणस वाटते की इतरांना नाम दयाचे आहे..असे नाही तर आपल्या मनाला, विचारांना खाद्य द्यावे कशाचे तर नामाचे.. रोज जेवतो..तसे मनाला ही खाद्य हवे आहे कोणते..नामाचे..मनाला नाम रुपी सेवेचे खाद्य द्या..नाम सांगावे.. इथे आपणस वाटते की इतरांना नाम घेण्यास सांगायचे आहे..असे नाहीये..आपल्या मनाला सांगा आता बाकी काही आवश्यकता नाही..स्वामीं नामच सर्व काही आहे..आता किती दिवस ही सेवा करू की ती करू..नको नको आता फक्त मनाला एकच ध्यास लागावा..यासाठी स्वामीं नाम घ्यावे..नाम ऐकावे..काय ऐकावे हे सुद्धा आपणस इथे स्वामीं समज देत आहेत.. स्वामीं नाम ऐका.. स्वामीं चरित्र ऐका.. स्वामीं महिमा ऐका.. आपण दिवसाची सुरुवात कशाने करतो..सकाळी उठले की काय ऐकतो..सकारात्मक विचार ऐकणे हे सुद्धा स्वामीं नामच..म्हणजेच असे ऐका ज्याने आपली चेतना उंचावेल..बाकी काही नाही ऐकता आले तर..स्वतः स्वामी नाम घ्या आपल्याला ऐकू येईल त्या आवाजात..तेच श्रवण करा…नाम पुजावे.. इथे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो..नामाची पुजा करायची म्हणजे काय..आता एक उदाहरण पहा आपण काय जपतो, कशाची पुजा करतो..दिवस रात्र आपण कष्ट करतो..पैसे कमवण्यासाठी..म्हणजेच एक प्रकारे पूजा करतो..पैसे आवश्यक आहेतच..आता मग स्वामी नामाची पुजा कशी करावी..ज्याप्रमाणे आपण नेहमी पैसे कमी होऊ नये या साठी प्रयत्न करतो..त्याचप्रमाणे ” स्वामी नामाची पुजा करा” स्वामी नामाचा विसर होणार नाही, जसा पैसे महत्वाचे तसे आपल्या जीवनात नामाला महत्व द्या..जसा पैसे वाढतात तसे आपल्या जीवनात नामाचे महत्त्व वाढावे..ही एकच अशी गोष्ट आहे जी आपल्या जीवनातून कमी करू शकत नाही..नाम असे जपा की शेवटचा श्वास हा स्वामी नामाचाच असेल..या साठी रोज स्वामीं नाम घ्या..नाम भजावे.. नाम भजावे म्हणजे आपल्या मुखाने स्वामीं नाम घ्या..बाकी वायफळ बडवड करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या जिभेला स्वामीं नामाची गोडी द्या..पहा जेव्हा जिभेला ही सवय लागेल तेव्हा प्रत्येक परिस्थितीत स्वामीं नामच येईल..आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा स्वामीं नाममय बनवू..इथे आपल्या मनात येते असे कसे.. अहो जेव्हा आपल्या मनात हा भाव निर्माण होईल स्वामीं नाम सेवा ( इतर कोणतेही नाम) ही सेवा स्वयंपूर्ण सेवा आहे..आता बाकी कोणती सेवेची आवश्यकता नाही..हे जेव्हा आपल्या अंतर्मनात कोरले जाईल…स्वामीं नामच आपल्या।मुखातून येईल..स्वामीं भजन होईल..प्रत्येक कर्म स्वामीं सेवा वाटेल तेव्हाच आपले जीवन स्वामीं मय होणार आहे..या साठी आपणस रोज स्वामीं नाम सेवा करायची आहे..स्वामीं ना प्रार्थना करायची आहे..नक्कीच स्वामीं कृपा होत आहे..आपले जीवन स्वामीं मय होत आहे..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)*

*आजचे चिंतन-मनन*

जया अंगी क्षमा भाव करुणेचा !
ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !!
म्हणोनि चुकलेल्या माफ करावे !
चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी म्हणतो..कुणी सॉरी म्हंटलं की..इंग्रजीत आपण It’s ok किंवा अजून काही म्हणतो..इतकाच अर्थ आहे का क्षमा या शब्दाचा..यांवर आपण चिंतन मनन करणे खूप आवश्यक आहे..जो पर्यंत आपण क्षमा या शब्दाचा अर्थ समजून घेत नाही तो पर्यंत क्षमा हा गुण आपण आपल्यात धारण करू शकत नाही..जो पर्यंत हा गुण धारण करत नाही..तो पर्यंत स्वामीं च्या जवळ आपण पोहचू शकत नाही..पहा आपण आपल्याकडून काही चुकी झाली तर आपण।ह्रदयातून माफी मागतो का ? हा प्रश्न आज स्वतः ला विचारायचा आहे? उत्तर हो आले तर खूपच छान..नाही आले तर..यांवर चिंतन करा असे का होत आहे.. आता काही म्हणेल मी सर्वांची माफी मागू शकतो..सर्वांना माफ ही करू शकतो पण एका व्यक्तीला कधीच माफ करू शकत नाही..याचाच अर्थ आपल्यात क्षमा हा गुण अजून अवगत झाला नाही..पहा जर आपण यात व्यक्ती नुसार बदल केला तर आपण कधीच कुणालाच माफ करू शकणार नाही.. पहा आज पर्यंत आपण ही अनेक चुका केल्या असतील..करत ही असतो..आपल्याला आपल्या आई वडिलांनी माफ केले की नाही.. आपण आपल्या मुलांना माफ करतो की नाही..मग आपण सर्वांना माफ का नाही करू शकत..आपले चुकत असेल..आपले चुकले असेल तर आपण माफी का नाही मागत..कारण आपल्यातील अहंकार जागृत आहे.. जर आपल्यात अहंकार असेल तर आपण स्वामींच्या जवळ कसे जाणार..जाऊच शकत नाही..म्हणून आज या क्षणापासून हा गुण धारण करा..त्यावर काम करा..पहा कसे छान वाटते..इथे आणखी एक महत्वाची गोष्ट स्वतःला ही माफ करा..कारण अनेकजण स्वतःला माफ करत नाहीत..मनातल्या मनात कुढत राहतात..तुमच्याकडून चुकी झाली.. झालेली चुकी ची माफी मागा..नाही मागू शकत स्वामीं समोर मागा.. पहा किती मोकळे।मोकळे वाटते..क्षमा करणे व क्षमा मागणे हे स्वामींच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे..या मार्गाचा जो अवलंब करतो तो स्वामीं चा सदैव प्रिया भक्त होतो…आपल्या सर्वांना स्वामीं चा प्रिय भक्त व्हायचे आहे ना! मग एकच उपाय..क्षमा करा..क्षमा मागा..चला।आजपासूनच या सेवेला सुरवात करूया..स्वामींच्या जवळ रोज क्षमा प्रार्थना करूया..हे समर्था मला माफ..आज पर्यंत क्षमा मागितली नाही त्याबद्दल माफ कर…आमच्यात क्षमा हा गुण वाढव..आम्हाला सर्वांना माफ करण्याची शक्ती दे..समज दे..आम्हाला स्वतःला माफ करण्याची समज दे..आज पर्यंत आमच्याकडून जाणते..अजाणतेपणी कुणाचेही मन दुखावले गेले असले तर आम्हाला माफ कर..आमच्या मनातून त्या व्यक्तीबद्दल आदर भाव..प्रेम निर्माण कर..हे तुझ्या कृपे शिवाय शकय नाही..कृपा कर.. ही समज दिल्याबद्दल धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!