उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात.

वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । – बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये… म्हणजे अनेकदा आपण बाहेर गावी जाण्याचे नियोजन करतो… अनेकदा आपणस तिथली माहिती नसती… अश्या वेळेस आपण अनेकदा दिशादर्शकाचा वापर करतो… वा अनेक ऑनलाईन पर्याय वापरतो… पण यातून अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते… यांपेक्षा आपण जर जाणकार व्यक्तींना विचारले तर नक्कीच आपल्या पुढील अनेक अडचणी आपण टाळू शकतो.. यातून अनेक गोष्टी आपणस माहिती होतील… जसे कसे जाणे योग्य आहे… तिथे काय काय आपण पाहू शकतो…अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणस मिळतील व आपला प्रवास सुखकारक होईल…यातून आणखीन एक मतीती अर्थ आपणस प्राप्त होते आहे… अनेकदा आपणस एखाद्य विषयाची अडचण असते.. पण अनेकदा आपण कुणास विचारत नाही नाही आणि आपणस अडचणी येतात.. जर आपण वेळीच जाणकारांचे मार्गदर्शन घेतले तर नक्कीच आपणस योग्य मार्ग मिळू शकतो… आपण काय खावे तर जे आपल्या प्रकृती ला योग्य आहे तेच पदार्थ आपण सेवन करावेत.. असे नाही कि आपल्या जिभेला आणि मनाला आवडते म्हणून आपण त्या पदार्थाचे सेवन करावे.. जे आपल्या प्रकृतीला योग्य आहे असाच आहार घ्यावा.. म्हणजेच आपण आपल्या आहारा विषयी जागृत असणे आवश्यक आहे.

अति वाद करू नये । पोटी कपट धरू नये – अनेकदा आपण अनेक विषयावर एकमेकांशी वाद घालत बसतो.. त्या वादाचा विषय मूलतः काहीच नसतो… जसे समजा एखादा खेळाचा सामना सुरु आहे… तेव्हा अनेक व्यक्ती एकमेकांशी वाद घालतात… कारण प्रत्येकजण हाच प्रयत्न करतो कि मीच योग्य आहे.. जर खोलवर विचार केला तर आपणस या वादातून त्या दोघांमध्ये कुणाचाच काहीच फायदा होणार नाही तरी देखील ते एकमेकांशी वाद घालून परस्पर संबध खराब करतात… असे वाद करून काय उपयोग आहे का? अनेकदा काय होते आपले एकमेकांशी भांडण होते… भांडण फार किरकोळ असते पण आपले मन त्याला मोठे करते आणि मग मन म्हणते मेलो तरी त्याच्याशी बोलणार नाही वा नाते ठेवणार नाही.. विचार करा आपणास एकदाच मनुष्य जन्म मिळतो.. या कोरोना तर आपणस हेच शिकवले आहे कि आपला क्षणाचा भरोसा नाही… कधी आपला श्वास बंद होईल… तरी देखील जर आपण मनात कपट ठेवत असू तर हे कितपत योग्य आहे.. यावा आपण जरूर चिंतन मनंन करावे.

विचारेंविण बोलू नये । विवंचनेविन चालों नये। मर्यादेविन हालो नये। – अनेकदा आपण इतके बोलतो कि आपणस देखील आठवत नाही कि आपण काय बोललो… आणि नंतर आपणस आपल्या बोलण्याचा पश्चताप होतो… एकदा बंदुकीतील गोळी सुटीला कि आप तिची दिशा बदलू शकत नाही… तसेच शब्दांचे आहे… अनेकदा आपण भावनेच्या भरात काही तरी अति बोलत असतो…आपण बोलताना मागचा पुढचा काहीच विचार करत नाही… समोरची व्यक्ती एक बोलली कि आपण दोन शब्द बोलतो … पण नेमकी समोरची व्यक्ती असे का बोलत आहे… नेमकी कोणती परिस्थिती असेल म्हणून ती विचार न करता बोलत आहे.. या सर्व गोष्टीं चा आपण आधी सारासार विचार करणे आवश्यक आहे… असे नाही कि समोरच्या व्यक्तीने आपणस अपशब्द बोलला कि लगेचच आपण बोलले पाहिजे… उलट अश्या वेळेस आपण काही काळ थांबावे… शक्य असेल तर आपण त्या स्थानाचा त्याग करू शकता.. याचा अर्थ असा नाही कि आपण माघार घेत आहोत… आपण आपल्या सारासार बुद्धी चा वापर करत आहोत. .. यातून आपण काही मर्यादांचे देखील पाल करत असतो… जसे समोरील व्यक्ती आपल्या पेक्षा मोठी असेल तर एक प्रकारे तिचा तो आदरच होईल.. तसेच आपण आपल्या मर्यादा पाळल्या हे समाधान आपणास नक्कीच आनंद देऊन जाईल.

निंदा द्वेष करू नये । असत्संग धरू नये – अनेकदा आपण एकमेकाची निंदा करतो..जर आपण जर खोलवर जर विचार केला तर आपणस जाणवेल कि आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीची निंदा करतो तेव्हा जर आपण विचार केला तर आपणस जाणवेल कि आपण किती मूर्ख पण करत आहोत… आपण त्याची निंदा करतो म्हणजे एक प्रकारे आपल्या मनात नकारात्मक विचार व द्वेष आपण त्या व्यक्ती विषयी आपल्या मनात टाकून.. आपले मंच खराब करून घेतो.. त्याचा फायदा तर काहीच नाही… कारण त्याची निंदा करून आपण नक्की काय साध्य करतो तर … आपले स्वतःचे नुकसान करत असतो… कारण आपण आपल्या विचारांना चुकीचे खाद्य देतो.. त्याचा परिमाण आपल्यावरच होत असतो… त्या मुळे प्रयत्न करूया कुणाची हि निंदा करणार नाही… आता आपण कुंची निंदा करत नाही पण .. समोरील व्यक्ती आपल्या समोर इतरांची निंदा करतो हा एक प्रकारचा असत्संग आहे.. तो आपण नक्कीच टाळू शकतो… आपण तो विषय तिथेच थांबवू शकतो.

ऐक्यतेसी फोडू नये । विद्याभ्यास सोडू नये – हा खूपच खोल विचार आपणस देत आहेत एकीचे बळ आपण सर्वच जाणतो… जर आपल्यात एकी असेल तर आपले कुणीच काही बिगडवू शकत नाही.. याबाबत आपण लहानपणी गोष्ट ऐकिली आहे.. पण आपण जसे मोठे होतो हि गोष्ट विसरतो .. आपणास हि गोष्ट कायम स्मरणात ठेवायची आहे… व आपल्या जीवनात अंमलात आणायची आहे… तसेच इतरांना सुद्धा या साठी प्रेरित करायचे आहे… तसेच आपण शाळा सोडली कि अभ्यास सोडून देतो… आपण जर पाहिलीत कि जी मोठी लोक असतात ते सदैव अभ्यास करत असतात.. हा अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी वाचन का ? तर तसे नाही तर नेहमी नवीन गोष्ट शिकतात… जसे एखादा क्रिकेटर आहे तो… कायम सराव करतात त्यामुळे ते उत्कृष्टपणे खेळू शकतात… हि त्यांची खूप मोठी मेहनत म्हणजेच विद्याभ्यास आहे.

चला आज आपण इथेच थांबू या – समर्थांना प्रार्थना करूया – महाराज आज आपण आम्हाला उत्तम गुणांची जी समज दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद… आज आपण आम्हाला इतरांशी संवाद साधण्याची समज दिलीत… वाद न करण्याची समज दिलीत … मनातं कुणाविषयी कपट न ठेवण्याची समज दिलीत… वाणी वरच्या नियंत्रणाची समज दिलीत…निंदा द्वेष न करण्याची समज दिलीत… संगत कशी असावी हि समज दिलीत.. एकता व विद्याभ्यास ची समज दिलीत… या सर्व समज वर काम करण्याची आम्हाला प्रेरणा द्या… फक्त हि गोष्ट विचारात ना राहता.. आमच्या जीवनात उतरावी.. हि प्रार्थना करू घेतल्याबद्दल धन्यवाद !!

 

 

मूर्खांचे लक्षण – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

खरंतर आपण अगदी सहजपणे एखादया मूर्ख म्हणतो.. पण खरंच मूर्ख कुणास म्हणावे… आपण आपल्या अल्प बुद्धी प्रमाणे कुणासही मूर्ख म्हणतो.. पण अनेक मूर्खपणाचे गुण आपल्या मध्ये असतात आपण त्यावर विचार करत नाहीत… समर्थ रामदास स्वामी यांनी श्री दासबोध ग्रंथांत याचे खूप सुंदर वर्णन केले आहे… इथे मला जे समजले… आणि मला त्यातील काही गुणांवर स्वतः काम करणे आवश्यक वाटले ते इथे मांडण्याचा एक छोटासा प्रयन्त करत आहे… रामदास स्वामी म्हणतात मूर्खांचे डॉ प्रकार असतात.. मूर्ख जो शिकलेला नाही व दुसरा शिकलेला मूर्ख… जन्माला जयाचे उदरी । तयासी विरोध करी -पहा आपले आई वडील आहे आपणस आपल्याभल्याच्या गोष्टी सांगत असतात… कारण कोणत्याही आई वडिलांस वाटते का आपल्या मुलाचे व मुलीचे वाईट व्हावे पण.. अनेकदा आपण त्यांच्या चांगल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो… खरंतर त्यांचा जो सल्ला असतो तो अनुभवाचा असतो… जो कोणत्याही शाळेत वा युनिव्हर्सिटी मध्ये प्राप्त होऊ शकत नाही पण… या ठिकाणी आपल्यातील मूर्ख पण आडवा येतो आणि… अनेकदा आपणस नंतर कळते कि आपण त्यांचा सल्ला न ऐकून कसा मूर्खपणा केला आहे. आपली आपण करी स्तुती । स्वदेशी भोगी विपत्त्ती । सांगे वडिलांची कीर्ती । तो एक मूर्ख । अनेकदा आपण आपल्या स्वतःची च स्तुती करतो… मी हे केले… मी ते केले… माझ्या मुळेच हे काम झाले… किंवा अनेकदा आपण आपलीच बढाई मारतो… समोरचा व्यक्ती आपली स्व स्तुती ऐकून मनात हसत असतो… तोही आपल्या हा ला हा मिळवत असतो… आणि आपणास वाटते कि मी किती मोठा आहे.. म्हणजेच स्वतःच स्वतःला मूर्ख बनवत असतो… अनेकदा आपण आपल्या पूर्वजांची स्तुती करतो… पूर्वजांची स्तुति करावी यांस काही हरकत नाही पण… आमचे पूर्वज अमुक होत… ते इतके थोर होते… हेच फक्त आपण लोकांना सांगतो.. पण त्या पूर्वजांच्या कर्तुत्वाला शोभेल असे आपले कर्तृत्व काय तर शून्य… मग हा मूर्खपणा नाही का?
औषध ने घे असोनि वेथा । पथ्य न करी सर्वथा । आपणस एखादा आजार आहे तरी देखील डॉक्टरांचा सल्ला न घेणे… आपला आजार लपवून ठेवणे… तसेच अनेकदा डॉक्टर काही पथ्य सांगतात पण ती आपण पाळत नाहीत… या सारखा मूर्खपणा तो काय ? भगवंताने आपणस इतके चांगले शरीर दिले आहे… त्याची काळजी कोण घेणार… आपणच ना… भगवंताने अपील शरीर इतके सुंदर बनवले आहे कि कोणताही रोग आजार… होण्यापूर्वी ते आपणस पूर्व सूचना देत असते.. जर आपण त्या कडे दुर्लक्ष केले नाही.. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर पुढील अनेक अवघड गोष्टी आपण टाळू शकतो पण… अनेकदा आपण आजार अंगावर काढतो आणि मग त्याचे वाईट परिणाम आपणास व आपल्या परिवारास भोगावे लागतात… मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो.. हा मूर्खपणा नाही तर मग काय आहे.

घरच्यावरी खाय दाढ । बाहेरी दिन बापुडा । ऐसा जो का वेड मूढा । तो एक मूर्ख – अनेकदा आपल्या कडून घरातील व्यक्तीवर चिडचिड होते… आपण विनाकारण त्याच्यावर चीडचीड करतो… पण बाहेर गेलो कि आपल्या मुखात साखर असते… बाहेरील लोक म्हणतात यांच्या सारखा सु स्वभावी माणूस नाही… पण घरातील माणसे म्हणतात आमचा हा म्हणजे मूर्ख माणूस आहे…कारण नसताना चिडचिड करत असतो… आमचे काही एक ऐकत नाही… मग अनेकदा आपण म्हणतो कि त्याचा स्वभाव तसा आहे… आता आपण स्वतः विचार करा ज्या आवाजात आपण घरच्यांवर चिडतो … रागावतो.. त्याच आवाजात आपण जिथे नोकरी करता तिथे बोलू शकतो का… आपण आपल्या बॉस शी तसे बोलू शकतो का? नाही ना … कारण आपणस माहित आहे जर आपण तसे केले तर नोकरी जाईल… हे व्यवसाय करणाऱ्यास पण लागू होते… ग्राहकाशी गोड गोड बोलता मग तसे घरी का नाही बोलू शकत ?

स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार । करी थोडे बोले फार । तो एक मूर्ख – कधीही कुना काही मदत करत नाही … दुसऱ्याने मदत केली तर त्याची जाण ठेवत नाही… आणि थोडी फार जरी कुणाला मदत केली तर त्याचा गाजावाजा जास्त करतो… पहा ना अनेकदा आपण दुसऱ्याला मदत करू शकतो तरी आपण करत नाही… हि मदत काय फक्त आर्थिक असते असे आहे का नाही ती इतरही असू शकते पण ती सुद्धा आपण करत नाही… कायम आपण फक्त आपलाच विचार करतो.. आपणस अडचण असताना अनेकदा अनेक लोक आपल्याला मदत करत असतात.. पण त्याच्या त्या मदतीची आपण जाणीव ठेवत नाही…आता समजा आपणस एखादयाने मदत केली… पुढे एखादी अडचण आपणस आली तर आपण पुन्हा त्या व्यक्ती कडे जातो… तेव्हा त्याची सुद्धा अडचण असते तो मदत करत नाही पण मग तेव्हा आपण त्याच्यावर राग धरतो वा त्याला अपशब्द बोलतो… हे योग्य आहे का ? अनेकदा आपण दुसऱ्याला मदत करतो थोडी पण गाजावाज़ा इतकं करतो कि जसे आपण आपली संपत्ती त्याच्या नावे केली असावी.. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण एखाद्य गरिबाला काही मदत करतो तेव्हा त्याचे सह फोटो काढून सोशल मीडियावर टाकतो… खरंच मदत करतो का .. दिखाऊपणा मग हा मूर्खपणा नाही का ?

जैसें जैसें करावे । तैसें तैसें पावावें । हे जयास नेणवे । तो एक मूर्ख – कर्माचा सिद्धांत आहे कि आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपणस भोगावेच लागते.. पण अनेकदा आपणस याचा विसर पडतो… अनेकदा आपण चुकीचे कर्म करतो आणि ते विसरून जातो… आपला स्वभाव असं असतो कि आपण आपले वाईट कर्म लगेचच विसरतो आपणस ते कधीच चुकीचे वाटत नाही… मग आपणस भविष्यात कधी तरी वाईट परिणाम भोगावे लागतात… मग तेव्हा आपण आपसूकपणे म्हणतो मी तरी कधीच कुणाचे वाईट केले नाही तरी मला असे दुःख की भोगावे लागत आहे… कर्म फक्त कृतीतून होत नाही तर आपल्या विचारातून सुद्धा होत असते… आणि सृष्टीचा नियम आहे आपल्या प्रत्येक कृतीचे फळ हे आपणास पार्ट मिळत असते… या सर्व गोष्टीचा विचार करून आपण प्रत्येक कर्म करताना जागृत राहून कर्म करणे आवश्यक आहे… नाही तर तो आपला मूर्खपणाच ठरणार आहे.

दोघे बोलत असती जेथें ।तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई खाजवी दोहीं हातें । तो एक मूर्ख। अनेकदा आपण हि चूक करतो दोन व्यक्ती बोलत असतात… आपणही तिथे जात्तो… त्याचा काही तरी महत्वपूर्ण असा विषय सुरु असतो आणि आपण अचानक तिथे जातो… तखडे वाक्य लय कानावर पडते आणि त्या वरून आपण आपले मत मांडतो… त्यानी आपले मत मागितले नसते… तरी आपण आपले मत मांडत असतो.. तसेच अनेकदा आपणस त्या विषयाचे पूर्ण माहिती पण नसते पण आपण अपील मत मांडत असतो… व आपले म्हणणे कसे बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयन्त करत असतो. खरंतर हि एक वाईट सवय तर आहेच म्हणजेच हा अपा मूर्खपणा आहे.

कलह पाहता उभा राहे । तोडविना कौतुके पाहे । खरे असता खोटें साहे । तो की मूर्ख – अनेकदा दोन व्यक्तीचे भांडण सुरु असतात.. त्या व्यक्तींना आपण ओळखत नसतो पण एक विरंगुळा म्हणून आपण त्याचे भांडण पाहत असतो… अनेक महाशय असे असतात कि मोबाइलला मध्ये विडिओ शूट करतात.. त्यांच्या मनात असा विचार सुद्धा येत नाही कि बुवा आपण हे भांडण सोडवू शकतो… उलट भांडण बघून म्हणतात किती मूर्ख आहेत … अरे ते मुख आहेत म्हून भांडत आहेत पण त्याच्या पेक्षा तू किती मूर्ख आहेस त्याचे भांडण भागात बसला आहेस… अनेकदा आपणस माहित असते कि अमुक एकदा व्यक्तीची काही चूक नाही तरी पण आपण त्या व्यक्तीची बाजू न घेत जो शक्तीशाली आहे त्याची आपण बाजू घेतो.. म्हणजेच भांडण सोडवणं तर सोडून द्या उलट ते भांडण कसे वाढेल अशी कृती आपण करतो … हा मूर्ख पण नाही का?

कलह पाहता उभा राहे । तोडविना कौतुके पाहे । खरे असता खोटें साहे । तो की मूर्ख – अनेकदा दोन व्यक्तीचे भांडण सुरु असतात.. त्या व्यक्तींना आपण ओळखत नसतो पण एक विरंगुळा म्हणून आपण त्याचे भांडण पाहत असतो… अनेक महाशय असे असतात कि मोबाइलला मध्ये विडिओ शूट करतात.. त्यांच्या मनात असा विचार सुद्धा येत नाही कि बुवा आपण हे भांडण सोडवू शकतो… उलट भांडण बघून म्हणतात किती मूर्ख आहेत … अरे ते मुख आहेत म्हून भांडत आहेत पण त्याच्या पेक्षा तू किती मूर्ख आहेस त्याचे भांडण भागात बसला आहेस… अनेकदा आपणस माहित असते कि अमुक एकदा व्यक्तीची काही चूक नाही तरी पण आपण त्या व्यक्तीची बाजू न घेत जो शक्तीशाली आहे त्याची आपण बाजू घेतो.. म्हणजेच भांडण सोडवणं तर सोडून द्या उलट ते भांडण कसे वाढेल अशी कृती आपण करतो … हा मूर्ख पण नाही का?

आपण वाचीना कधी । कोणास वाचावया नेदी बांधोन ठेवी बंदी । तो एक मूर्ख – आपण लहान पण पशूं एक म्हण ऐकली आहे ती म्हणजे – वाचेल तो टिकेल.. खरंतर आपल्याकडे समृद्ध असे साहित्य उपलब्ध आहे… इतके साहित्य आहे कि आपले आयुष्य कमी पडेल… पण शाळा… कॉलेज संपल्यावर आपली वाचण्याची सवय पूर्णपणे बंद होते.. खरंतर वाचन हा प्ले बुद्धीचा खुराक आहे… काय वाचावे हे पण समजे पाहिजे… जर आपण नकारात्मक वाचत असाल व म्हणलं कि इतके वाचतो तरी आमच्यात काही बदल होत नाही… अहो आपण किती या पेक्षा महत्वाचे आपण काय वाचतो… तसेच आपण जे काही चांगले वाचत असू ते पुस्तके इतरांना द्यावी… अनेकदा आपण धार्मिक ग्रंथ बांधून ठेवतो… संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्या प्रमाणे आपण त्या ग्रंथाच्या एका तरी ओवीचे चिंतन मनन आपण रोज केले पाहिजे हीच तर खरी भक्ती आणि श्रद्धे ची प्रथम पायरी नाही का .

चला आपण रामदास स्वामींना प्रार्थना करूया – स्वामी आपण तर ग्रंथ रूपाने मूर्खांचे अनेक लक्षण सांगितले आहेत… आम्ही ते लक्षण वाचतो… आम्हाला वाचताना असे वाटते कि.. हि सर्व लक्षण मूर्खांचे आहेत.. पण आम्ही यावर कधीच विचार करत नाहीत कि.. आमच्यात यातील किती लक्षणे आहेत… आम्ही आपणस प्रार्थना करतो कि आम्हला आमच्यातील मूर्ख पणाच्या लक्षणांचे दर्शन घडव.. आम्हाला त्यावर काम करण्याची प्रेरणा दे… तुझ्या कृपेशिवाय हे शक्य नाही … समर्था हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !

 

 

हमारे घर में भगवांन का घर कैसा हो

भगवान का घर कैसा हो इसके बारे में विभिन्न लोगों के विभिन्न विचार है… इसके ऊपर हर एक ने खुद चिंतन मनन करना चाहिए… भगवान् घर ऐसा हो… जहाँ हमारा चित्त स्थिर हो… मन शुद्ध हो… आंतरिक आनंद प्राप्त हो…ऐसा भगवांन का घर हो… आप बोलेंगे फिर भी भगवान् का घर कैसा हो… हमें आर्थिक स्तर पर किफायतशीर होना चाहिए …आपको आर्थिक स्तर पर जो अच्छा लगे वैसा आप भगवान् का घर ले सकते है… बेशक बाजार में कई विकल्प उपलब्ध हैं.. उसमे से आपको जो पसंद हो… आर्थिक स्तर पर भी आपके के लिए किफायतशीर हो ऐसा भगवान् का घर आप ले सकते है… भगवान् की मूर्ति या फोटो जिसपर रखते है… वहाँ कपडे का आसन होना चाहिए… अब सबसे महत्वपूर्ण बात… घर में कोन कोनसे भगवन की मूर्ति या फोटो होना चाहिए …शास्त्र के अनुसार भगवान् का पंचायतन होना चाहिए…यानि पाँच देवों की मुर्तिया हनी चाहिए… होनी चाहिए… गणेशजी, विष्णुजी, शंकरजी, सूर्यजी , देवी माता यह पांच मुर्तिया और शंख और घंटा होनी चाहिए… अब क्या होता है.. हम भगवान् के घर में मूर्तियोंकी इतनी भीड़ करते है की… हमें हमारे घर का भगवान् का घर छोटा लगने लगता है… इसके पीछे का मुख्य वजह यह है की… हम किसी आध्यत्मिक स्थल पर जाते है… या कोई हमें बताता है.. इसलिए हम अनेक भगवन की मूर्ति या फोटो लेकर आते है और हमें समझ में भी नहीं आता की कब भगवान का घर छोटा हो गया यानि भगवान की मूर्तियोंकी संख्या बढ़ गयी… इसलिए आपसे विनती है क यह गलत आदत बंद कर दो… जो भी भगवान की मुर्तिया या फोटो हमारे घर में है उसी की पूजा दिल से करो… बहोत बार क्या होता है अनेक मुर्तिया या फोटो खराब हो जाते है… उस वकत किसी के कहने पर या… हमर पूर्व मान्यतावो के आधार पर हम वो मुर्तिया या फोटो…किसी भी मंदिर में जाकर रख आते है… अब सके ऊपर आप खुद चिंतन करो और बतावो यह सह या गलत है… यह हमारी उस भगवान् के ऊपर की श्रद्धा है क्या? यह पागल जैसी आदत बंद करो… हफ्ते में एक बार या… ममहीने में सभी भगवान् क मूर्तियोंको…नीम… हल्दी…दही या बाजार में अनेक पावडर या लिक्विड उपलब्ध है उससे मुर्तिया साफ़ करके लो.. क्यूंकि क्या होता है पर्यावरण के बदल के कारण या रसायनं युक्त चंदन के कारण मुर्तिया ख़राब हो जाती है… इस तरह से साफ़ करने से करने में प्रसन्नता प्राप्त होंगी… हमें प्रतिदिन कुछ न कुछ भगवान को प्रसाद अर्पित करना चाहिए… हम हर रोज भगवान् को फूल चढ़ाते है.. दूसरे दिन वो फूलों का निर्माल्य हम नदी पात्र में.. जलाशय में दाल देते है.. एक तरफ हम कहत है… गंगा हमारी माता है और दूसरी और उसी माँ के पात्र में हम लोग निर्माल्य फेंकते है… सच में यह श्रद्धा है या फिर श्रद्धा के नाम पर गलत आदत.. आज से ही संकल्प लेते है की नदी के पात्र में हम कसी भी प्रकार का निर्माल्य नहीं डालेंगे…यही हमारी ९९ % भगवान् की सेवा पूर्ण होती है… ईश्वर खुश होकर हमें आशीर्वाद देता है… बस भगवान को नहला देने से , भगवान की पूजा खत्म होती है क्या ? नहीं तो ईश्वर के पास जाने का सबसे आसान मार्ग है.. . नामरूपी सेवा…हर रोज पूजा होने के बाद कम स कम पाँच मिनिट भगवान् का नामस्मरण रूप सेवा कारण चाहिए…देखो ५ मिनिट की नाम रूपी सेवा हमारे जीवन परिवर्तन आएगा…चलो तो फिर आज यह ठहरते है… फिर मिलते है… आपको जानकारी पसंद आयी हो तो जरूर हमारा वेबसाइट और चैनल सब्सक्राइब कीजिए। धन्यवाद !!

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 5

विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ या ठिकाणी सरळ सरळ अर्थ आहे कि विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ …म्हणजे स्वामी चरणाची विभूती… स्वामी चरणी व वंदन… स्वामी नामाची साधना… स्वामी नामाचे ध्यान… आणि स्वामी चरणाचे  तीर्थ… हे ज्या स्वामी सेवेकऱ्याच्या  जीवनात आहे… त्याला कसलीच भीती भय नाही… या ठिकाणी विभूती म्हणजे आपणस आपल्या नकारात्मक विचारांना हटवून सकारात्मक विचारांची विभूती  मनाला लावायची आहे. नमन म्हणजे नुसता नमस्कार नव्हे तर… पूर्णपणे आपल्या मनास  स्वामी चरणी लीन करायचे आहे… नाम म्हणजे आपणस नामरूपी सेवा रुजू करायची आहे… जेव्हा जेव्हा शकय आहे तेव्हा अखंड स्वामी नाम घ्यायचे आहे… कोणतेही संकट आले तर हृदयातून स्वामी नाम यावे.. इतकी स्वामी नामाची सवय आपणस लावायची आहे… ध्यान हि सर्वोच्च साधना आहे.. रोज थोडा वेळ तरी आपणस ध्यान साधने साठी द्याचा आहे…हे ध्यान आपण स्वामी नामाचे करू शकता.. किंवा आपणस जी ध्यानाची पद्धत सोपी वाटते ते करू शकता… पण ध्यान करावे… तीर्थ म्हणजे या ठिकाणी स्वामी सांगत आहेत अरे जेव्हा तू हि साधना सुरु करशील तेव्हा तुला जो अनुभव येईल तेच तीर्थ असणार आहे.

स्वामीच या पंच प्रानामृतात अनेकदा आपण प्रश्न विचारतो की स्वामी कुठे आहेत.. किंवा आपणस इतर कुणी विचारते कि स्वामी कुठे आहेत… स्वामी कुठे आहेत यांचे उत्तर तर स्वामींनी आधीच दिले आहे – विभूती नमन नाम ध्यान आणी तीर्थ  यात आपणस स्वामी भेटतील.. इथे याचा स्पष्ट अर्थ असा आहे.. जेव्हा आपण आपल्या स्वतः वर काम करू… आपली आंतरिक सफाई होईल तेव्हा आपणस नक्कीच स्वामी कुठे आहेत याची अनुभूती येईल.

हे तीर्थ घे आठवी रे प्रचीती स्वामी काय आहेत तर स्वामी हे अनुभूती आहेत.. मग स्वामींची अनुभूती घ्यायची असेल तर काय करावे..काही नाही फक्त आपणस वर सांगितल्या प्रमाणे सेवा करायची आहे .. मग अनुभूत येणारच आहे.. हो पण त्या साठी आपणस सेवेत सातत्य असणे गरजेचं आहे. सातत्य असेल तर आपणस प्रचिती येतेच.

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती एकदा आपण सेवेस सुरवात केली कि आपणस अनुभव येतात… पण यात कसे असते आपण स्वामींना आपल्या मनाची चावी त्यांच्याकडे  द्यायची आहे… मग स्वामी महाराज आपला हात धरतात.. स्वामींनी आपला हात धरला असताना आपल्या मनात जर अनन्य भक्ती आणि श्रद्धा असेल तरी.. स्वामी महाराज आपला हात कधीच सोडत नाहीत… फक्त गरज आहे आपल्या सेवा श्रद्धा आणि विश्वासाची.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4

खरा होई जागा श्रद्धे सहित आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे…असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते… पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि… आपण स्वामींचे सेवेकरी आहोत… कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते संकटा  विषयी आणि आपल्या अंतर्मनातील श्रद्धे ची जागा भीती नि घेतली असते… त्यामुळे आपल्या मधील श्रद्धा भाव कमी होतो… हि श्रद्धा कमी होऊ नये या साठी आपणस स्वामी नामाची कास धरायची आहे… आणि आपल्या अंतर्मनात श्रद्धा भाव पोहोचवायचा आहे.

कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त

मनात नाही भाव आणि स्वामी मला पाव… असे कसे होईल… फक्त आपण स्वामी सेवेकरी आहोत असे म्हणून.. आपण स्वामींचे सेवेकरी होणार आहोत का ? नाही त्या साठी आपणस आपल्यातील श्रद्धा हा गुण  वाढवायचा आहे… आता हा गुण  कसा वाढेल… सोपे आहे… रोज एक तरी स्वामी लीला वाचावी… त्यावर स्वतः चिंतन … मनन करावे… रोज किमान ५ मिनिटे स्वामी नाम जप रुपी सेवा करावी.. पहा नककीच आपली श्रद्धा वाढेल… आणि आपल्या अंतर्मनातून आवाज येईल मी स्वामींचा बाळ आहे .. आता  भीतीचे काय कारण .

किती दा दिला बोल त्यानीच हाथ आज पर्यंत आपणस अनेकदा संकट..  दुःख आली… आपणस  त्यातुन कुणी वाचवले… स्वामींनी च वाचवले ना.. मग आज जेव्हा संकट आले आहे तेव्हा आपले मन का बरे विसरले आहे..आपले मन हे विसरल्यामुळे काय होते.. आपणस आपले दुःख मोठे वाटू लागते आणि सर्व मार्ग आपणस बंद दिसतात… या मुळे संकट आले कि सर्वप्रथम मनास सांगा… हे संकट नसून मला शिकण्याची संधी आहे… कारण यातून बाहेर तर मी सहजच पडणार आहे… कारण स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत.. आज पर्यंत त्यांनीच तर मला  हाथ दिला आहे… आणि स्वामींनी एकदा हाथ धरला कि ते सोडत नाहीत.

नको डग मगू स्वामी देतील साथ हे मना तू डगमगू नकोस… कारण आज पर्यंत प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांनी साथ दिली आहे… आपले मन डगमगले कि आपले होणारे काम होत नाही… आणि आपला एक नकारात्मक विचार…आपले यश आपल्या पासून दूर नेऊ शकते… त्यामुळे न डगमगता  संकटांना  सांगा… स्वामी महाराजांची साथ माझ्या सोबत आहे… डगमगू नकोस… भिऊ नकोस.