देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

Oct 28, 2025 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.
देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत?

देवघर – आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे कसे असावे.. खरंतर याचा उत्तर आपण अनेकांची अनेक मत यावर असतात.. मग खरंच प्रश्न निर्माण होतो कि कोणते उत्तर खरे चला आज आजच्या कालानुरूप देव घराचा विचार करू… शास्त्रानुसार देवघर हे ईशान्य दिशा (ईशान कोपरा) असावे.. पर्यायी दिशा (जर ईशान्य शक्य नसेल तर) पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा सुद्धा योग्य आहेत.. आता हे झाले घरात कुठे असावे याचे उत्तर आता कसे असावे.. याचे साधे आणि सोपे उत्तर आपणस आर्थिक दृष्ट्या परवडणारे.. ज्या देव घरासमोर बसले कि आपले मन शांत होईल असे देव घर असावे.. अनेकदा सांगितले जाते असेच हवे.. तसे नको..पण इथे महत्वाचा विषय आहे.. आपणस आर्थिक दृष्ट्या काय शक्य आहे.. आणि आपल्या मनाला शांती मिळते कि नाही… देवघरात देव कोणते असावेत.. गणपती..कुलदेवी .. कुल देवता टाक .. अन्नपूर्णा .. बाळकृष्ण.. शंख .. घंटा.. इतकेच देव देवघरात असावेत.. आता आपल्या कडे इतरही मूर्ती असतील तर चालतील.. पण शक्यतो जास्त मूर्ती टाळा.. अनेकदा काय होते आपण कुठे देवाला गेलो कि मूर्ती आणतो.. फोटो आणतो.. हे शक्य तो टाळा.. कारण काय तर आपणासही देव पूजा करताना सोपे राहील.. आता अनेकदा काय होते काही लोक आपणस सांगतात कि हि मूर्ती नको.. हे देव घरात नको.. आता याबाबत आपणस योग्य तो निर्णय आपण घ्यावा पण एक गोष्ट नक्कीच मनाला खटकते कि कुणी तर सांगते म्हणून आपण ती मूर्ती किंवा फोटो विसर्जित करतो.. ठीक आहे पण ज्याची आपण इतक्या दिवस पूजा केलीत ती मूर्ती किंवा फोटो आपण कोणत्या तरी मंदिरात वा अन्यत्र ठेवतो.. हे कुठंतरी मनाला पटत नाही.. त्यामुळे हि गोष्ट करताना जे आपणस सल्ला देत आहेत त्यांना योग्य सोलुशन द्याल सांगा.. शेवटी महत्वाची गोष्ट हीच आहे कि देव घर असे बनवा कि आपल्याला प्रसन्न वाटेल.. आपल्यात सकारात्मकता निर्माण होईल.. शेवटी देव फक्त देव्हाऱ्यात नाही तर देव आहे चराचरात आहे.. देव अंतरात वास करतो याची जाणीव आपणास आपले देव घर पाहून झाली पाहिजे.. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये किंवा ई-मेल द्वारे विचारा नक्कीच आपण त्यावर विडिओ बनवूया.. धन्यवाद

 


Share
और पढिये !!

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...