अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

Sep 17, 2025 | मराठी

Share

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे…सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली, स्मरणशक्ती कमी झाली, महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या जाऊ लागल्या. …गोंधळून व्यासजी ब्रह्माजींकडे गेले आणि विचारले — “हे पितामह! माझे ज्ञान का हरवत आहे? काहीच सुचत नाही. याचे कारण काय?”ब्रह्माजींनी ध्यान करून सांगितले —“व्यासजी! आपण विद्वत्तेच्या गर्वात आहात..कुठेतरी अहंभाव आला आहे…त्यामुळे हे विस्मरण होत आहे..आपण गणेशस्मरण करा.. ते बुद्धिदाता आहेत..विघ्नहर्ता आहेत…व्यासजी नम्रतेने म्हणाले —“पण प्रभो! मला गणेशांचे स्वरूप माहीत नाही. मार्गदर्शन करा.” ब्रह्माजींनी सांगितले —
“गणेशजी हे परात्पर ब्रह्म आहेत. ‘ॐ गं गणपतये नमः’ हा मंत्र सर्वांत सोपा आणि फलदायी आहे. सकाळी स्नान करून, स्वच्छ आसनावर बसून, प्राणायाम करून या मंत्राचा जप करा. व्यासजींनी भक्तिभावाने जप सुरू केला. थोड्याच वेळात त्यांचे विस्मरण नाहीसे झाले. ज्ञान पुन्हा प्रकट झाले. आणि पुराणरचनेचे महान कार्य अखंड सुरू झाले.बोला गणपती बाप्पा मोरया..!

बोध खरंतर अध्यात्म म्हणजे… चालती बोलती..पाठशाळा…यातील अनेक कथा या आपल्या जीवनात लागू करण्यासाठी असतात..पण आपण कथा वाचून सोडून देतो..पहा या कथेत व्यासजी यांनी जे काही लिखाण कार्य केलं आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे..पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला आणि त्यांना अडथळा येऊ लागला…पहा आपल्या जीवनात ही आपण ही अनेक कार्य करत असतो…काही दिवसांनी आपल्याला असे वाटते की मी करतो म्हणून होत आहे..खरतर आज आपण जे काही कार्य करत आहोत..ते आपण नाही केलं तरी दुसरे कुणी तरी करणार आहे…उलट जर आपण जर कार्य करत आहोत त्याला एक संधी …मानले… त्या कार्या करायला मिळाले याबद्दल धन्यवाद भाव ठेवला तर..कोणतेही काम कार्य…काम न राहता ती सेवा बनेल..आणि आपल्यातील अहंभाव दूर होऊन आपण उत्कृष्ट असे कार्य करू…कारण अहंभाव आपल्यातील विचार करण्याची शक्ती कमी करतो..सेवाभाव आपली शक्ती वाढवतो…म्हणून प्रत्येक कार्य सेवा भाव ठेवून करूया…धन्यवाद बाप्पा..चला आपण गणपती बाप्पा ला प्रार्थना करूया..

प्रार्थना हे गजानना…अनेकदा आम्ही कार्य करत असताना.. आमच्यात अहंभाव निर्माण होतो..हा अहंभाव ते कार्य करताना जे लक्ष देऊन कार्य करण्याऐवजी..आमचे लक्ष…आमच्यातील अहंभाव यावर केंद्रित होते…कृपा कर..आमच्यातील अहंभाव दूर कर…कारण जे कार्य आम्ही करत आहोत..त्या साठी बुद्धिदाता तूच आहेस..विघ्नहर्ता तूच आहेस..मग मी तर फक्त निमित्त मात्र आहे..कृपा कर… हे तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही…ही समज दिल्याबद्दल धन्यवाद…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…बोला गणपती बाप्पा मोरया..!


Share
और पढिये !!

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...