कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

Sep 15, 2025 | मराठी

Share

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला.

महर्षींनी सांगितले की हा रोग त्याच्या पूर्वजन्मीच्या पापांचा परिणाम आहे — त्या जन्मी तो “कामद” नावाचा व्यापाऱ्याचा मुलगा होता, ज्याने क्रूरपणे निरपराध लोकांची हत्या केली होती, त्यामुळे त्याला शाप मिळाला होता.

महर्षींनी त्याला उपाय सांगितला — गणेशभक्ती. राजा एका जीर्ण गणेश मंदिरात गेला, उपाशी असूनही भक्तिभावाने उपासना करू लागला आणि आपल्या धनाने मंदिराचा जीर्णोद्धार केला. यामुळे त्याचे पाप क्षीण झाले.

गणेश उपासनेच्या सामर्थ्याने त्याचे पापरूपी विकराळ रूप त्याच्यापासून वेगळे झाले आणि नाहीसे झाले. शेवटी महर्षींच्या कृपेने व गणेशपुराण श्रवणामुळे त्याचा कुष्ठरोगही नाहीसा झाला.

बोध . आपण जे काही करम करतो त्याचे फळ आपणास भोगावेच लागते…पण सत्कर्म करून आपण जी काही चुकीचे कर्म केली असतील..त्याची तीव्रता कमी करू शकतो…राजा असो किंवा अजून कुणी असो..प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब द्यावाचा लागतो…त्यामुळे प्रत्येक कर्म करत असताना आपण सावध असणे आवश्यक आहे…अनेकदा आपण चुकीचे कर्म करताना आपणास असे वाटते की मला कुणी पहात नाही…जरी बाहेरचे कुणी पहात नसेल..तरी आपले कर्म हे आपणच पहात असतो..जसे इतरांचे वाईट कर्मावर आपण न पाहता बोट ठेवू शकतो..तर आपणच केलेल्या कर्मा पासून आपली सुटका कशी होईल..म्हणून प्रयत्न करू चांगले कर्म करण्याचे…जरी चुकून वाईट कर्म झाले असेल..तर नक्कीच त्याबद्दल माफी मागा… पहा आपली चूक आपण मान्य करणे हे सुद्धा एक चांगले कर्म आहे..यातून आपण आपली अंतर्गत शुद्धी करतो..पण चूक मान्य करणे ही क्रिया सुद्धा मना पासून असावी…पहा आज आपल्या जीवनात सुख दुःख आहेत…किंवा असणार आहेत..ती आपल्याच कर्माची फळ असणार आहेत..त्यामुळे प्रत्येक कर्म हे विचार पूर्वक करूया…त्या साठी..गणपती बाप्पा कडेच प्रार्थना करूया…! बोला गणपती बाप्पा मोरया..!
प्रार्थना… हे गणपती बाप्पा…आज जी काही सुख किंवा दुःख आमच्या जीवनात आहेत..ती आमच्या कर्माचीच फळे आहेत…आज राजा
सोमकांत याची गोष्टीला निमित्ताने तू आम्हाला प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते याची जाणीव करून दिलीस त्याबद्दल धन्यवाद…आम्हाला प्रत्येक कर्म करताना या नियमाची आठवण असू दे..आम्ही हे विसरणारच..पण तू तर बुद्धी दाता आहेस…आम्हाला सदैव जागृत अवस्थेत कर्म करून घे…चुकीचे कर्म करण्यापूर्वी आम्हाला त्या कर्माची जाणीव करून दे… चांगल्या कर्मा साठी आम्हाला तयार कर.. हे तुझ्या कृपे शिवाय शक्य नाही…सदैव कृपा कर…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…ही समज दिल्याबद्दल धन्यवाद…बोला गणपती बाप्पा मोरया..!


Share
और पढिये !!

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...