मन निर्भय कसे बनवावे

May 4, 2025 | Uncategorized

Share

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा आहे.. पहा जर प्रामाणिक पणे विचारला तर उत्तर काही प्रमाणात हा येईल .. काही प्रमाणात नाही येईल.. आता निर्भयता म्हणजे काय ? आपल्या मनात असणारी भीती दूर करणे.. आता नेमकी भीती कशा कशाची असू शकते किंवा असते.. मला अपयश येईल का ? कोणतेही काम करण्या पूर्वी हि मनांत भीती निर्माण होते.. मी जर एखादे चांगले काम केले आणि त्यात अपयश आले तर लोक काय म्हणतील.. मी एकटाच आहे मी हे काम कसे करू… माझे भविष्यात कसे होईल .. मी एखादे काम करताना पडेल का.. अश्या अनेक गोष्टी असतात ज्याची आपल्या मनात भीती असते.. मग हीच भीती आपल्या मनात बसते.. आपले मन भीतीने ग्रस्त होते.. मग आपण अपयशी होतो.. अनेकदा आपण स्वामी सेवा हि करत असतो पण तरी आपल्या मनात असणारी भीती मुळे आपली सेवा सुद्धा यांत्रिक होते.. मग कधी अपयश आले कि मन म्हणते मी इतकी सेवा करतो .. असे करतो तसे करतो पण तरी मी अपयशी होतो.. आता पहा खरंतर स्वामी आपणस निर्भयता हा गुण विकसित करण्यास सांगत आहेत .. जिथे निर्भयता तिथे यश.. आता इथे एक गोष्ट आपणस सांगावीशी वाटते ती म्हणजे निर्भयता म्हणजे लोकांवर अन्याय करणे नव्हे .. आता हा निर्भयता हा गुण विकसित करण्यासाठी काय करावे यावर आपण चिंतना करू.. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे आपल्यात प्रामाणिकपणा हा गुण विकसित करावा.. अपयश जरी आले तरी मी त्यातुन शिकणार आहे.. निर्भयता येण्यासाठी जे काही चरित्र असतील ते वाचाव्यात .. त्या चरित्रावर पुन्हा मनात चिंतन मनन करावे.. नेमके आपल्या मनात जी भीती आहे ती का आहे.. त्या भीतीच्या मुळावर काम करावे.. जसे मनात भीती आहे मी चुकलो तर.. मग विचार करा मी जरी चुकलो तरी त्या चुकेवर चिंतन मनन करून जी काही चूक झाली आहे ती चूक पुन्हा होऊ देणार नाही आणि मी यशस्वी होईलच.. रोज थोडा वेळ स्वामी नाम घ्या.. थोडावेळ ५ मिनिटे ध्यान करा.. स्वामींना प्रार्थना करा .. मला निर्भय बनव.. निर्भयता हा गुण विकसित करण्यासाठी मला मदत करा.. पहा रोजच्या सरावाने आपल्यातील मनांतील भीती दूर होईल.. आपल मन निर्भय होईल.. मग यश आपले दार ठोठावेल.. पहा आपणही यावर चिंतन मनन करावे आणि स्वामी सेवा आणि निर्भय मनाने यशाला गवसणी घालावी.. धन्यवाद स्वामी .. कोटी धन्यवाद .. हि सेवा करून घेतल्या बद्दल धन्यवाद

www.chetankeswar.com


Share
और पढिये !!

जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

!!श्री स्वामी समर्थ!! ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे...

असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।

!!श्री स्वामी समर्थ!! असोनी संसारी जिह्वे वेगु करी । दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ हरिपाठ www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो....संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली इथे आपणस नामाची महती सांगत आहेत..संसारात असताना नाम घ्या..पहा किती सोपे आहे..हाताने प्रापंचिक कर्म..मुखाने...

हरि मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा

!!श्री स्वामी समर्थ!! हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ हरिपाठ पहा नामाचा महिमा..रोज किमान १ माळ स्वामीं नाम जप करूया..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत..मुखाने नाम घ्या..त्या सारखे दुसरे पुण्य...

देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

श्री स्वामी समर्थ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरिपाठ ओवी चिंतन मनन स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची...

खरा कर्ता मी आहे का?

श्री स्वामी समर्थ हे मना मला वाटते की..मी करतो म्हणूनच कार्य होत आहे..पण मी नव्हतो तेव्हाही कार्य सुरू होते..मी नसतानाही कार्य सुरूच असणार आहे..मग मी कसा कर्ता.. कर्ता आणि करविता..तू एक स्वामींनाथा..माझ्यातील कर्ता भाव दूर कर..धन्यवाद समर्था..! www.chetnakeswar.com...

आपले विचार इतरांवर लादू नका!

!!श्री स्वामी समर्थ!! हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..! स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत...

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रोज ११ वेळेस म्हणा

!! श्री स्वामी समर्थ !! स्वामी भक्तहो कोणतीही आर्थिक समस्या नसून आपल्या विचारातील मानसिकता आहे.. आपल्या अंतर्मनातील विचार आहेत.. चला आपले विचार बदल्या.. खालील विचार रोज १ वेळेस किंवा ११ वेळेस म्हणा पहा काय बदल घडतात.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद !! हे मना मला...

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७) प्रेरणादायी बोल प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या...

यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५) प्रेरणादायी बोल हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच...

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६) प्रेरणादायी बोल आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया...अक्कलकोट गावात...