मन निर्भय कसे बनवावे

May 4, 2025 | Uncategorized

Share

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा आहे.. पहा जर प्रामाणिक पणे विचारला तर उत्तर काही प्रमाणात हा येईल .. काही प्रमाणात नाही येईल.. आता निर्भयता म्हणजे काय ? आपल्या मनात असणारी भीती दूर करणे.. आता नेमकी भीती कशा कशाची असू शकते किंवा असते.. मला अपयश येईल का ? कोणतेही काम करण्या पूर्वी हि मनांत भीती निर्माण होते.. मी जर एखादे चांगले काम केले आणि त्यात अपयश आले तर लोक काय म्हणतील.. मी एकटाच आहे मी हे काम कसे करू… माझे भविष्यात कसे होईल .. मी एखादे काम करताना पडेल का.. अश्या अनेक गोष्टी असतात ज्याची आपल्या मनात भीती असते.. मग हीच भीती आपल्या मनात बसते.. आपले मन भीतीने ग्रस्त होते.. मग आपण अपयशी होतो.. अनेकदा आपण स्वामी सेवा हि करत असतो पण तरी आपल्या मनात असणारी भीती मुळे आपली सेवा सुद्धा यांत्रिक होते.. मग कधी अपयश आले कि मन म्हणते मी इतकी सेवा करतो .. असे करतो तसे करतो पण तरी मी अपयशी होतो.. आता पहा खरंतर स्वामी आपणस निर्भयता हा गुण विकसित करण्यास सांगत आहेत .. जिथे निर्भयता तिथे यश.. आता इथे एक गोष्ट आपणस सांगावीशी वाटते ती म्हणजे निर्भयता म्हणजे लोकांवर अन्याय करणे नव्हे .. आता हा निर्भयता हा गुण विकसित करण्यासाठी काय करावे यावर आपण चिंतना करू.. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे आपल्यात प्रामाणिकपणा हा गुण विकसित करावा.. अपयश जरी आले तरी मी त्यातुन शिकणार आहे.. निर्भयता येण्यासाठी जे काही चरित्र असतील ते वाचाव्यात .. त्या चरित्रावर पुन्हा मनात चिंतन मनन करावे.. नेमके आपल्या मनात जी भीती आहे ती का आहे.. त्या भीतीच्या मुळावर काम करावे.. जसे मनात भीती आहे मी चुकलो तर.. मग विचार करा मी जरी चुकलो तरी त्या चुकेवर चिंतन मनन करून जी काही चूक झाली आहे ती चूक पुन्हा होऊ देणार नाही आणि मी यशस्वी होईलच.. रोज थोडा वेळ स्वामी नाम घ्या.. थोडावेळ ५ मिनिटे ध्यान करा.. स्वामींना प्रार्थना करा .. मला निर्भय बनव.. निर्भयता हा गुण विकसित करण्यासाठी मला मदत करा.. पहा रोजच्या सरावाने आपल्यातील मनांतील भीती दूर होईल.. आपल मन निर्भय होईल.. मग यश आपले दार ठोठावेल.. पहा आपणही यावर चिंतन मनन करावे आणि स्वामी सेवा आणि निर्भय मनाने यशाला गवसणी घालावी.. धन्यवाद स्वामी .. कोटी धन्यवाद .. हि सेवा करून घेतल्या बद्दल धन्यवाद

www.chetankeswar.com


Share
और पढिये !!

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...