निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

May 4, 2025 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी भक्त हो…आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो…निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक…म्हणजे मनात शंका नको…पहा..आपले मन शंका निर्माण करतेच…माझे अमूक काम होईल का? नाही होणार…होईल…मन म्हणते होईल…मध्येच म्हणते नाही होणार…मग आता इथे आपल्याला…पहिले काम करावे लागेल ते आपल्या मनावर..मग आता मनावर कार्य कसे करणार…आता या बाबत आपण अनेक उपाय वापरू शकतो…पहा आपल्या घरात भांडी असतात…जी भांडी आपण वापरतो ती रोज आपण धुतो…जी वापरत नाही ती आपण धूत नाही त्या भांड्यावर घाण..धूळ जमा होते…म्हणजेच काय आपणास भांडे जसे स्वच्छ करतो..तसेच आपल्या मनाची स्वच्छता करणे आवश्यक आहे…आता आपल्याला मन स्वच्छ करायचे आहे…याला उपाय आहे स्वामी नाम..रोज स्वामी नाम घ्यावे…आता..मनात येईल की आपण इतक्या काळा पासून स्वामी नाम घेत आहोत…पण मन निःशंक होत नाही…पहा आपणास हे कार्य अखंड चालू ठेवणे आवश्यक आहे…आता स्वामी नाम तर घेतले…दुसरे कार्य आपणास कार्य करायचे आहे…प्रार्थना..स्वामीना प्रार्थना करायची आहे…स्वामी आमचे मन निःशंक करा…हे आम्ही करू शकता नाही. हे आपल्या कृपेनेच शक्य आहे…तिसरे कार्य आपणास करणे आवश्यक आहे…रोज आपणास स्वामी लीला असतील किंवा जे काही सकारात्मक असेल त्याचे वाचन करायचे आहे…आता नुसते वाचन करुन आपणास थांबायचे नाही तर…नेमके आपण आपल्या जीवनात कसे लागू करू शकतो यावर आपणास कार्य करायचे आहे… यावर आपणास स्वतः चिंतन मनन करावे लागेल…हे जेव्हा आपण अखंड करू तेव्हा नक्कीच आपले मन निःशंक होईल आणि स्वामी कृपेने स्वामी चरणी निःशंक होईल…धन्यवाद स्वामी..कोटी कोटी धन्यवाद…!
www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...