स्वामी भक्त हो…स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात…मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे…त्याच्या साठी सर्वच समान…पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये आले..तेव्हा ते खंडोबा मंदिरात बसले होते..तिथे रीसालदार आणि त्याचं मित्र येतात..त्यांना असे वाटते की स्वामी ची आपण मजाक करू..ते स्वामीना रिकामी चिलीम देतात आणि ओढणार का असे विचारतात…स्वामी ती रिकामी चिलीम घेतात..आणि ओढण्यास सुरुवात करतात..तर चिलीम मधून धूर येऊ..लागतो…हे पाहून त्यांना समजते…स्वामी कुणी साधी विभूती नाहीत…त्यांना हेही समजते की स्वामी तीन दिवसा पासून उपाशी आहेत…ते लगेचच स्वामीना घेऊन चोळप्पा च्या घरी..जातात..चोळप्पा ही त्यांचे पूजन करतो…स्वामीना भोजन करण्यास विनंती करतात…जेवण ताटात वाढले जाते…स्वामी जेवायला बसतात पण रीसालदार यास…ताटाला हात लावण्यास सांगतात….सर्वांना आश्चर्य वाटतं की रीसालदार अमुक धर्माचे आहेत…असे कसे चालेल…पण स्वामी मात्र म्हणतात …जो पर्यंत रीसालदार ताटाला हात लावत नाहीं तो पर्यंत आम्ही जेवणार नाही…रीसालदार ताटाला हात लावतात मग स्वामी जेवण करतात…म्हणजेच पहा स्वामी सेवा करताना आपणास सर्वांकडे एक स्वामी भक्त या भावनेने पहायचे आहे…कारण जितकी कृपा स्वामी आपल्यावर करतात..तितकीच इतरावरही करतात…धन्यवाद स्वामी..!
संदर्भ स्वामी वाणी
www.chetnakeswar.com
जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?
!!श्री स्वामी समर्थ!! ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे...