Share

विधवेश्वर संहिता १०.हजार श्लोक, रुद्र संहिता ,विनायक संहिता,उमासंहिता,मातृसंहिता यात प्रत्येकी 8 .हजार श्लोक एकादशरुद्रसंहिता 13 .हजार श्लोक ,कैलाससंहिता 6 हजार श्लोक,कोटी रुद्र संहिता 9.हजार श्लोक, सहस्त्र-कोटी रुद्र संहिता ११ हजार श्लोक,वायवीयसंहिता 4 .हजार श्लोक, तसेच धर्म संहिता 12 हजार श्लोक अश्या प्रकारे शिव महा पुराण कथा १ लाख श्लोकांची आहे…व्यासांनी आपल्या साठी २४ हजार श्लोकांची संक्षिप्त महा पुराण कथा लिहिली…शिव पुरणाचे स्थान ४ क्रमांकावर येते…यात सात संहिता आहेत..यातील पहिला संहिता विधवेश्वर संहिता आहे…दुसरी रुद्र संहिता, तिसरी शत रुद्र संहिता,चौथी कोटी रुद्र संहिता, पाचवी उमा संहिता,सहावी कैलास संहिता, सातवी वायवीय संहिता.. याला शैव शिरोमणी भगवान व्यास यांनी संक्षिप्त शिव पुराण निर्माण केले..याचे सर्वांनी श्रवण पठण करावे.. शिव पुराणात काय आहे…भक्ती , घ्यान आणि वैराग्य यांचा उल्लेख शिव पुराणात येतो…जेव्हा सृष्टी ची उत्पत्ती सुरू होती..जे सहा महर्षी होते त्यांच्यात वाद निर्माण झाला।की अमुक एक।गोष्ट श्रेष्ठ…त्यांच्यातील।हा वाद इतका विकोपाला।गेला की ते सर्व ब्रम्हाजी यांच्याकडे गेले…आणि त्याना विचारले की सम्पूर्ण तत्व पेक्षा वेगळा पुराण पुरुष कोण आहे??तेव्हा ते म्हणतात देवाधिदेव महादेव..यांना प्राप्त करायचे असेल तर भक्ती करावी..सर्व देव यांचीच पूजा करतात…भव सागर पार करण्याची शक्ती शिव उपासनेत आहे..शिव भक्ती कशी करावी..कानाने श्रवण..मनाने मनन.. आणि मुखाने कीर्तन हे श्रुतीचे वाक्य आपणस प्रमाण भूत आहे..पराशर मुनी यांचे पुत्र..व्यास देवजी सरस्वती..नदी काठी साधना करत होते..एके दिवशी तिथे सनतकुमार येतात..त्यावेळेस व्यास देवजी ध्यानस्थ होते..काही वेळाने ध्यानातून बाहेर आल्यावर त्यांनी..सनतकुमार यांना पाहिले…ते तात्काळ उठले.. त्यांचे आदर पूर्वक पुजन केले…आता व्यासजी.. सनतकुमार यांना सांगतात..तुम्ही शिव भक्ती करा..यात श्रवण मनन आणि कीर्तन करा..पूर्वी मी अनेक साधनांचा अवलंब केला आणि त्यात अडकलो..हाती मात्र काहीच आले नाही..पण जेव्हा मी भटकलो आणि मंदराचल पर्वतावर गेलो..तिथे मला शिव कृपेने..भगवान नंदिकेश्वर भेटले आणि त्यानी मार्गदर्शन केले..त्यांनीच मला मुक्ती चे साधन सांगितले…आपण ही सर्वांनी या तिन्ही साधनांचा अवलंब करा बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ

बोध – शिव भक्तहो पहा श्री शिव महा पुराण हा ग्रंथ किती मोठा आहे.. व्यासांना त्याच वेळेस जाणवले असेल कि कल युगात लोकांना सोपे असे साधन निर्माण व्हावे त्यांना शिव तत्त्व काय आहे हे समजावे या साठी त्यांनी श्री शिव महा पुराण संक्षिप्त श्लोकात निर्माण केले.. तत्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही.. या लीलेस निमित्त करून आपण त्यांना धन्यवाद देऊयात आणि त्यांना प्रार्थना करूया कि आमच्या कडून शिव महा पुराण कथा श्रवण मनन करून घ्या… पहा वरील लीलेत येते कि सृष्टी ची निर्मिती झाली तेव्हा महर्षी मध्ये वाद निर्माण झाला कि श्रेष्ठ कोण.. खरंतर हा वाद तर आपल्या दैनंदिन जीवनात रोज घालत असतो.. जसे मी जे म्हणतो किंवा करतो ते किती श्रेष्ठ आहे खरंतर अनेकदा हा आपले खूप मोठे नुकसान करत असतो कारण आपण करतो तेव्हा आपणस प्रेरणा देणारी कोणती तरी एक शक्ती असते पण आपण मात्र ते विसरून जातो आणि खोटा अहंकार बाळगतो.. थोडक्यात आपणास आपल्यातील खोटा अहंकार दूर करायचा आहे.. श्री शिव महा पुराण कथा आपणस श्रवण, पठण आणि कीर्तन हि सेवा करण्याची प्रेरणा देत आहे.. व्यास देव स्वतः सांगतात कि ते आधी अनेक सेवा करत होते पण त्यांना मुक्तीची मार्ग म्हणा किंवा सत्य मार्ग मिळत नव्हता पण जेव्हा शिव भक्ती करू लागले तेव्हा त्यांना समजले कि श्रवण मनन आणि कीर्तन हाच मुक्तीचा मार्ग आहे.. आपणस हि मार्गाचा अवलंब करायचा आहे.. पहा रोज थोडा बदल आपले आयुष्य बदलून टाकेल.. तरी सर्वानी या वर कार्य करावे हि विनंती… बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ

चला आपण सर्व मिळून महादेवांना प्रार्थना करूया.. हे महादेवा तुझी भक्ती कशी करावी हे आम्ही जाणत नाही.. त्या मुळे नको त्या अनेक मार्गात आम्ही अडकतो.. आजच्या लीलेत सांगितल्या प्रमाणे आमच्या कडून श्रवण,, मनन आणि कीर्तन सेवा करून घे हीच प्रार्थना.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ


Share
और पढिये !!

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...