शिव पुराण कथा २

Oct 1, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

 

समुद्राच्या जवळ एक बाष्कळ नावाचे गाव होते…तिथे धर्माचे आचरण सोडून वागणारे दोघेजण राहत होते….ते खूपच वाईट होते…त्यांचे मन दूषित होते…कायम विषयासक्त होते..ईश्वरावर त्यांचा विश्वास नव्हता..तिथे राहणारे लोक सुद्धा तसेच होते…त्या गावात एक बिंदुग नावाचा व्यक्ती राहत होता…तो फारच कुमार्गी होता…त्याची पत्नीचे नाव चंचुला होते…ती धार्मिक वृत्ती ची होती…पण पती मात्र दुराचारी होता..तरीही तीने तो त्रास सहन केला..त्यामुळे तिला अनेक यातना सहन कराव्या लागल्या..इतका की ती आपल्या पतीसोबत ती सुद्धा अधार्मिक बनली…अशीच अनेक वर्ष झाले..काही काळा नंतर बिंदुग मरण पावला…अनेक यातना झाल्या..त्याला पिशाच्च योनी मिळाली…पती च्या मृत्यू नंतर त्याची पत्नी आपल्या मुलांच्या सोबत रहात होती…एक दिवस काही कारणास्तव गोकर्ण इथे गेली…फिरता फिरता ती एका शिव मंदिरात गेली…तिथे..शिव कथा सुरू होती…ती कथा ऐकत असताना त्यात आपल्या कर्माचे फळ कसे मिळते याची समज तिला मिळाली… हे सर्व ऐकून तिच्या मनात भीती निर्माण झाली…कथा पूर्ण झाल्यानंतर ती जे कथाकार होते त्यांच्या कडे जाते…आणि आज पर्यंत ज्या काही चुका झाल्या त्या कथाकार आहेत त्यांना सांगते..तिचा तो भाव पाहून तिला समजावून सांगतात की  शिव कथा श्रवण करून तुला तुझी चूक लक्षात आली ही खूप मोठी  शिव कृपा आहे…हा निर्भय पण आहे..कारण सत्य स्वीकारणे खूप मोठी गोष्ट आहे…कारण चित्त शुद्ध असल्या शिवाय शिव पार्वती यांचा वास आपल्या ह्रदयात होऊ शकत नाही…कारण चित्त शुद्धी झाली की आपल्या ह्रदयात भगवान शिव जी यांच्या भक्ति चे दोन पुत्र म्हणजे.. ज्ञान आणि वैराग्य प्रगट होते…यात काही संशय नाही..यासाठी तू शिव भक्ती कर..शिव चरित्र वाच.. त्यावर चिंतन मनन कर नक्कीच..तुझी चित्त शुद्ध होईल आणि शिव कृपेस पात्र होशील…हे सर्व ऐकून चंचुला तिथेच राहते..शिव कथा श्रवण करते…तिला स्वानुभव प्राप्त झाला आणि ती विनाकष्ट शिवलोक प्राप्त झाले  .. बोला उमा महेश्वर देवता कि जय

बोध – शिव पुराण ची हि कथा आपणस मनावर कार्य करण्याची प्रेरणा देत आहे.. बिंदुग बरोबर राहून त्याची धार्मिक पत्नी चंचूला सुद्धा अधार्मिक झाली म्हणजेच या ठिकाणी आपणस बोध होतो कि.. आपली संगत कशी असावी.. कारण आपण ज्या संगतीत राहतो त्या नुसार आपले आचार विचार आणि विहार होतो.. त्या मुले आपणस सत्संगाची कास धरायची आहे.. इथे जी चंचुला ती आपल्या सर्वांमध्ये आहे.. पहा आपले मन कायम चंचल असते.. आता  इथे तर थोड्या वेळात दुसरी कडे जाते अश्या चंचल मनावर आपणस कार्य करायचे आहे.. म्हणजे चंचल मन अचल करायचे आहे..शिव पुराण कथा श्रवण केल्या नंतर चंचुला हिला आपल्या सर्व चुका लक्षात आल्या.. पहा अनेकदा असेच ईश्वर आपणस आपल्या चुका दाखवत असतो पण आपले चंचल मन त्या चुका दुर्लक्षित करतो आणि आहे ते चुकीचे वर्तन सुरु ठेवतो.. जो पर्यंत आपणस आपल्या चुका दिसत नाहीत आणि चुकीच्या वर्तनाच्या परिणामांची जाणीव आपणस होत नाही तो पर्यंत.. आपली चित्त शुद्धी होऊ शकत नाही.. पहा चंचुला हिला आपल्या चुका लक्षात आल्या.. मग तिने फक्त शिव पुराण ऐकले का ? नाही तिने शिव पुराणात सांगितल्या प्रमाणे आपल्या चित्तातील चुकीचे आचार विचार दूर केले.. हे करणे इतके सोपे नाही त्यासाठी आपल्यात निर्भयता हा गुण विकसित झाला पाहिजे तरच हे शक्य आहे.. आपणस शिव कृपेचा अनुभव हा तेव्हाच येईल जेव्हा आपले चित्त शुद्ध होईल.. यासाठी आपणस आजची लीला आपले चित्त शुद्ध करण्याची प्रेरणा देत आहे.. धन्यवाद समर्था.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..!

प्रार्थना – हे महादेवा – ज्या प्रमाणे चंचूला हिला शिव पुराण कथेस  निमित्त करून तिचे चित्त शुद्ध केलेस तसेच आमचे चित्त सुद्धा शुद्ध कर.. आमच्या ह्रदयात ज्ञान आणि वैराग्य प्रगट कर.. तुझ्या कृपेशिवाय हे शकय नाही.. धन्यवाद उमा महेश्वर देवता कि जय..

www.chetanakeswar.com

 


Share
और पढिये !!

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...