प्रार्थना कोणती पूर्ण होते

Sep 22, 2023 | Uncategorized, प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

प्रार्थना – आपण लहान पणा पासून ऐकतो प्रार्थना करत आलो आहोत.. आपण हि आपल्या मुलांना हि प्रार्थना करण्यास सांगतो.. पण प्रार्थना म्हणजे असते तरी काय.. हृदयातून निघालेला आवाज जो सर्वांचा हित दायक असतो त्यास आपण प्रार्थना म्हणू शकतो आता याची अशी एकच व्याख्या करणे अवघड आहे.. कारण प्रत्येकाच्या या बाबत वेगवेगळे मत आहेत.. पण आपण जर अनेक प्रार्थना पाहिले तर आपणस जाणवते कि.. प्रार्थना हि नेहमी विश्व कल्याण करणारी असते हे आपणस जाणवते..आपण अनेकदा व्यक्तिगत प्रार्थना करतो.. त्या पूर्ण होण्यास वेळ लागतो.. पण जेव्हा आपण सर्व समावेशक म्हणजेच अव्यक्तिगत प्रार्थना करतो तेव्हा ती लवकर पूर्ण होते.. जसे पसायदान आपण जर या वर चिंतन मनन केले तर आपणस जाणवेल माऊलींनी विश्वाचे कल्याण व्हावे या साठीच प्रार्थना केली आहे.. आपण प्रार्थना करताना ती कोणत्या भाषेत वा शब्दांत करतो या पेक्षा आपले भाव महत्वाचे आहेत..आपण रोज प्रार्थना करताना प्रयत्न करा कि सर्वांसाठी प्रार्थना करूया.. पहा आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल कि सर्वांसाठी का ? पहा आपल्या सर्वांचे सुख हे एकमेकांवर अवलंबून आहे.. पहा समजा माझा कपडे विकण्याचा व्यवसाय आहे.. मी म्हंटल कि माझा चालू दे.. तर हि प्रार्थना अपूर्ण आहे.. कारण माझा व्यवसाय हा ग्राहकावर अवलंबून आहे.. ग्राहक तेव्हाच येईल जेव्हा त्या कडे पैसे असतील.. त्या कडे तेव्हाच पैसे येतील जेव्हा तो जिथे नोकरी करत असेल तो व्यवसाय व्यवस्थित चालत असेल.. म्हणजेच प्रत्येकाचे सुख हे एकमेकांवर अवलंबून आहे.. जर इतर सुखी होतील तरच आपण हि सुखी होऊ शकतो.. म्हणून मला प्रार्थना करताना अशी करावी लागेल कि.. सर्वांचा व्यवसाय , नोकरी मध्ये यश प्राप्त होऊ दे.. म्हणजेच प्रार्थना व्यक्तिगत न राहता.. विश्वकल्याणाची होईल.. आपणस जी काही प्रार्थना सुचते ती नेहमी लिहून ठेवण्याचा प्रयत्न करा.. पहा आपल्याच प्रार्थना भविष्यात आपणस प्रेरणा देतील.. चला तर मग आजपासून आपल्या प्रार्थना बदलूया.. आपले जीवन बदलूया.. धन्यवाद स्वामी..!
या बाबत आपले अभिप्राय आपण आम्हाला – chetnakeswar.com@gmail.com यावर पाठवू शकता


Share
और पढिये !!

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...