श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

Jun 25, 2023 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो

हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले ) हे पाहून त्यांचे चारही बंधूना आश्चर्य वाटले.. त्यांनी हरी पाटील ला समजावून सांगितले तू जे करत आहे ते चुकीचे आहे.. आपण पाटील आहोत.. लोक आपले ऐकतात आणि आपण त्या महाराजांची सेवा करता.. हे चारही भाऊ उसाची मुळी घेऊन मंदिरात गेले आणि श्री महाराजांना म्हणतात.. ऊस खाणार का ? जर आपण ऊस खाणार असाल तर आमची एक अट आहे ती जर आपणस मान्य असेल तर आम्ही आपणस ऊस देतो.. आम्ही तुम्हाला उसाने मारणार जर तुमच्या अंगावर एकही वण उठला नाही तरच आम्ही आपणस योगी मानू.. महाराज काहीच बोलले नाही.. त्यातील एक भाऊ म्हणाला महाराज काही बोलत नाही म्हणजेच ते घाबरले आहेत असे मारुती म्हणाल.. तर दुसरा भाऊ गणपती म्हणतो अरे त्यांचे मौन आहे याचा अर्थ त्यांची संमती आहे..ते सर्व जण महाराजांना मारण्यासाठी आले.. हे सर्व पाहून बाकी सर्व सेवेकरी पळून गेली पण भास्कर पाटील मात्र तिथेच थांबले आणि त्या चौघांना सांगत होते.. अरे अशी चूक करू नका.. मात्र ते चौघे मात्र ऐकण्यास तयार नव्हते.. ते मारत होते महाराज मात्र कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते..त्यांनी इतके मारले मात्र महाराजांच्या शरीरावर एक हि वण नव्हता.. हे पाहून ते चौघे घाबरली आणि श्री महाराजांच्या चरणी लीन झाले.. महाराज त्यांना म्हणतात बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो.. श्री महाराजांनी हाताने उसाचा रस काढला न कोणता चरका होता न काही यंत्र.. हे पाहून त्या चारही भावांना महाराजांच्या योग सामर्थ्यचि अनुभूती आली.. अश्या प्रकारे पाटील बंधू श्री महाराजांचे सेवक ( भक्त) झाले .. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !
बोध – श्री महाराज आपली चुकी माफ करतात फक्त आपणस महाराजांना ह्रदयपूर्वक समर्पित व्हायचे आहे.. बोला श्री गजानन महाराज कि जय


Share
और पढिये !!

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...