आपले विचार इतरांवर लादू नका!

Feb 20, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

!!श्री स्वामी समर्थ!!
हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..!

स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत आहेत..पहा हा माझा स्वतःचा अनुभव आहे..याचे उत्तर ही स्वामींनी वरील ओवीतून दिले..धन्यवाद स्वामीं..आपण काय करतो आपले जे काही विचार आहेत ते इतर व्यक्तींवर लादण्याचा प्रयत्न करतो..पहा आपल्याला कारले फार आवडते.. मग आपण आपल्या घरातील सर्वांनी किंवा जगातील प्रत्येक व्यक्ती ने कारले खाल्लेच पाहिजे हा आपण अट्टाहास करतो..कारण काय तर मला आवडते..अहो समोरील व्यक्तीला कांदा आवडतो मग तूम्हाला आवडतो का? याचे संमिश्र उत्तर असणार आहे…पहा कधी तरी आपल्या कडून काही तरी चूक होते तेव्हा आपण काय म्हणतो की मी चुकून बोललो..अहो तसेच समोरील व्यक्ती सुद्धा चुकून बोलू शकत नाही का? आपल्या मनात विचार येतात..या विचारांना प्रेरणा देणारी शक्ती आहे की नाही..कुणी तिला देव म्हणेल..कुणी स्वामीं म्हणेल..कुणी अल्लाह म्हणेल..कुणी अजून काही म्हणेल..पण सर्वांना प्रेरणा देणारा स्रोत एकच आहे..म्हणजेच ती व्यक्तीला प्रेरणा देणारे स्वामीच आहेत..तर मग आपण कसे आपले विचार कुणावर लादू शकतो..हा इथे याचा अर्थ असा नाही की एखादी व्यक्ती चुकत आहे तरी आपण आपले मत मांडायचे नाही..आपले मत असे मांडा की समोरच्या व्यक्ती ला असे वाटू नये की आपण विरोध करत आहोत…धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद..!


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...