हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

Feb 16, 2023 | Uncategorized, प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)*

*प्रेरणादायी बोल*

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ लावू शकतो..त्यामुळे यावर खूप खोल चिंतन मनन आवश्यक आहे..स्वामीं आपणच चिंतन मनन करून घ्या..सर्वप्रथम आपण सर्वांनी स्वतःला प्रश्न विचारणे आवश्यक आहे की माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे? कदाचित यांवर विचार केला नसेल तर आता यावर विचार करा..ध्येय हे कोणतेही असू शकते.. माझं ध्येय असेल खूप पैसे कमविणे.. यात वाईट काही आहे का ? नाही ..पण खूप पैसे कशा साठी हे सुद्धा स्पष्ट असावे..त्या साठी काय करणार हे निश्चित असावे…या साठी आपले मार्गदर्शक कोण आहेत..कुणाच्या पावलावर पाऊल आपण टाकणार आहोंत..हे खूप महत्त्वाचे.. आपला आदर्श श्रीमंत व्यक्ती असणार हे निश्चित..पण व्यक्ती श्रीमंत कशी झाली ? कष्ट करून की अनीती ने..त्या व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश केवळ पैसे कमविणे आहे की मिळालेल्या पैशाचा वापर..सर्वांच्या हितासाठी करतो..हे महत्वाचे..कदाचित आपल्या मनात येईल की मी पैसे कमवून समाज हित का करू ? समाज हित म्हणजे केवळ दानधर्म नसून.. आपल्या कर्मातील नीतिमत्ता ही सुद्धा समाज सेवाच आहे..म्हणजेच आपला आदर्श हा असाच असावा जो समाजहित कारी असेल..नाही तर आपले धेय्य कदाचित तातपुरते साध्य होईल पण ते अखंड यश नक्कीच नसेल..त्यात यशाचा सुवास नसेल..स्वामीं ना भूषणावह नसेल.. थोडक्यात अश्याच व्यक्तीच्या पाऊलावर पाऊल टाकूया ज्यांच्या यशाच्या प्रवासाची दिशा ही सर्वसमावेशक असेल.. जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपले प्रत्येक कर्म हे स्वामीं सेवा बनते..स्वामीं ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होते..धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...