खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

Feb 14, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)*

*प्रेरणादायी बोल*

जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. जर फळे हवी असतील तर पेरले पाहिजे.. पेरणी करण्यापूर्वी जामिनीची मशागत केली पाहिजे..नको असणारा कचरा काढावा लागेल…वेळोवेळी आवश्यक प्रमाणात पाणी द्यावे लागेल..आवश्यकते नुसार खते द्यावी लागतील.. योग्य वेळी पीक काढावे लागेल..हेच स्वामीं आजच्या स्वामीं वाणीतून स्वामीं सांगत आहेत..आपल्या सर्वांना यश रुपी फळ हवे आहे..स्वामीं विचारत आहेत..सर्वप्रथम कष्ट कर…आधी आपल्या मनात जे विचार आहेत त्यांची मशागत कर..नको असलेल्या विचारांचा कचरा दूर कर..तो दूर कसा होईल तर चांगले वाचन, श्रवण केल्याने…नंतर बीज टाका..बीज कशाचे तुम्हाला काय करायचे आहे हे मनात निश्चित करा..त्याचा लिखित आराखडा बनवा..जसे मला पुढील एक वर्षात नवीन भाषा शिकायची आहे..मग त्या साठी आवश्यक ती माहिती तयार करा..कसे कसे नियोजन आवश्यक आहे..हे लिहून काढा..आता पेरणी सुरू करा..रोज संध्याकाळी चिंतन मनन करा..मी किती कष्ट घेतले..पाणी किंवा खते म्हणजे आपणस कोण कोण यात मार्गदर्शन करू शकतो ते शोधा..त्यांच्या कडून जे जे चांगले आहे..त्याचा वापर पाणी व कीटक नाशक म्हणून करा..म्हणजे आपले ज्ञान वाढेल..अज्ञान दूर होईल..वेळोवेळी आपण जे काही प्रयत्न करत आहोत त्याचे आत्म परीक्षण करा…कुठे कुठे कमतरता वाटते ती दूर करा..मनात विचार येईल थकलो।आता नको..खरंतर जेव्हा मन नको म्हणते..तो क्षण फार महत्वाचा कारण तेव्हा जर आपण थांबलो तर आपण यशापासून दूर जातो..मन नको म्हणत असेल तर अजून कष्ट करा..पहा..काही दिवसांत आपणस आपणस हवे असणारे यश आपल्या हातात येईल..तेव्हा हेच भाव ह्रदयातून प्रगट होतील.. धन्यवाद समर्था..कोटी धन्यवाद..बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...