Share

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७)

अमृत वचन

हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो… आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत…आपणस अनेक प्रश्न असतात..अडचणी असतात त्याची उत्तरे आपणस मिळत नाहीत..मग आपण ते प्रश्न इतरांना विचारतो.. उदाहरणार्थ मला आर्थिक समस्या आहे..मग मी काय करतो..अनेक लोकांना विचारतो की माझी समस्या कशी सुटेल..मग समोरची व्यक्ती काही तरी सांगते ते आपण करतो..कधी यश येते.. कधी अपयश येते..पुन्हा आपण आपला प्रश्न घेऊन अजून कुणाकडे जातो…तो आणखी काहीतरी सांगतो..परत आपला प्रवास सुरु होतो..पण आपण कधीच स्वतः ला त्या प्रश्नांची उत्तरे विचारत नाही..कारण आपणस स्वतःला प्रश्न विचार असे कधी कुणी सांगत नाही..आज स्वामीं आपणास सांगत आहेत..हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! ह्रदयाचा आवाज म्हणजे काय? हे आपण आधी समजून घेऊ…विचार हा एक असतो पण.. जे सतत येत जात असतात ते विचार..दुसरे विचार असतात जे आपण शांत असताना येतात त्याला आपण हृदयाचा आवाज म्हणतो.. ..जेव्हा आपण आपल्या आता डोकावतो..कोणताही निर्णय घेताना शांत होतो..सर्व विचार सोडून आपले मन आपल्या ह्रदयावर केंद्रित करतो..मन भटकंती करते..पुन्हा आपण त्याला ह्रदयावर आणतो..याला म्हणतात ह्रदयावर जाणे..हा एक अभ्यास आहे..जो प्रत्येकाने केला पाहीजे…या साठी रोज थोडा वेळ बसा.. सुरवातीला कंटाळा येईल..नंतर आवड निर्माण होईल..आपल्या मनात प्रश्न आहे..तो प्रश्न स्वामीं ना सांगा..स्वामीं आपण तर सर्व जाणताच कृपा करा मला ह्रदयातून मार्गदर्शन करा..प्रार्थना झाली की..डोळे झाका..स्वामीं समोर बसा..मनात विचार येतील..येऊ द्या..विचार आले तसे जातील..आपणस मनाला आपल्या ह्रदय स्थानावर आणायचं आहे..सुरवातीला ५ मिनिट प्रयत्न करा..नंतर ही वेळ १० , २० मिनिट करा..पहा काय काय उत्तरे आपणस मिळतात..आता यात महत्वाचे..आपणस मिळालेले उत्तर आहे की आपले नेहमीचे विचार आहेत हे तपासून पहा..जसे आर्थिक समस्या आहे..आणि आपल्याला उत्तर मिळत आहे..व्यवसाय कर ..पण हा विचार खरंच आपल्या हृदयातून येत आहे कि इतर करतात म्हणून मला सुद्धा व्यवसाय करायचा आहे हे तपासून पहा.. जे काही विचार येत आहेत ते लिहून काढा.. त्यावर चिंतन मनन करा.. अश्या विचारांवर काम करायचे नाही..ज्या वर आपण अभ्यास केलेला नसेल.. आपणस सकारात्मक उत्तर मिळाले पाहिजे..कारण ह्रदयातून मिळणारे मार्गदर्शन हे..आपणस तर सुख..आनंद देतेच पण त्याच बरोबर ते समाज हितकारी असते.. रोज थोडा वेळ तरी आपल्या हृदय स्थानावर जा.. पहा नक्कीच स्वामीना अपेक्षित असणारी अभिव्यक्ती होईल.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...