Share

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७)

अमृत वचन

हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो… आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत…आपणस अनेक प्रश्न असतात..अडचणी असतात त्याची उत्तरे आपणस मिळत नाहीत..मग आपण ते प्रश्न इतरांना विचारतो.. उदाहरणार्थ मला आर्थिक समस्या आहे..मग मी काय करतो..अनेक लोकांना विचारतो की माझी समस्या कशी सुटेल..मग समोरची व्यक्ती काही तरी सांगते ते आपण करतो..कधी यश येते.. कधी अपयश येते..पुन्हा आपण आपला प्रश्न घेऊन अजून कुणाकडे जातो…तो आणखी काहीतरी सांगतो..परत आपला प्रवास सुरु होतो..पण आपण कधीच स्वतः ला त्या प्रश्नांची उत्तरे विचारत नाही..कारण आपणस स्वतःला प्रश्न विचार असे कधी कुणी सांगत नाही..आज स्वामीं आपणास सांगत आहेत..हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! ह्रदयाचा आवाज म्हणजे काय? हे आपण आधी समजून घेऊ…विचार हा एक असतो पण.. जे सतत येत जात असतात ते विचार..दुसरे विचार असतात जे आपण शांत असताना येतात त्याला आपण हृदयाचा आवाज म्हणतो.. ..जेव्हा आपण आपल्या आता डोकावतो..कोणताही निर्णय घेताना शांत होतो..सर्व विचार सोडून आपले मन आपल्या ह्रदयावर केंद्रित करतो..मन भटकंती करते..पुन्हा आपण त्याला ह्रदयावर आणतो..याला म्हणतात ह्रदयावर जाणे..हा एक अभ्यास आहे..जो प्रत्येकाने केला पाहीजे…या साठी रोज थोडा वेळ बसा.. सुरवातीला कंटाळा येईल..नंतर आवड निर्माण होईल..आपल्या मनात प्रश्न आहे..तो प्रश्न स्वामीं ना सांगा..स्वामीं आपण तर सर्व जाणताच कृपा करा मला ह्रदयातून मार्गदर्शन करा..प्रार्थना झाली की..डोळे झाका..स्वामीं समोर बसा..मनात विचार येतील..येऊ द्या..विचार आले तसे जातील..आपणस मनाला आपल्या ह्रदय स्थानावर आणायचं आहे..सुरवातीला ५ मिनिट प्रयत्न करा..नंतर ही वेळ १० , २० मिनिट करा..पहा काय काय उत्तरे आपणस मिळतात..आता यात महत्वाचे..आपणस मिळालेले उत्तर आहे की आपले नेहमीचे विचार आहेत हे तपासून पहा..जसे आर्थिक समस्या आहे..आणि आपल्याला उत्तर मिळत आहे..व्यवसाय कर ..पण हा विचार खरंच आपल्या हृदयातून येत आहे कि इतर करतात म्हणून मला सुद्धा व्यवसाय करायचा आहे हे तपासून पहा.. जे काही विचार येत आहेत ते लिहून काढा.. त्यावर चिंतन मनन करा.. अश्या विचारांवर काम करायचे नाही..ज्या वर आपण अभ्यास केलेला नसेल.. आपणस सकारात्मक उत्तर मिळाले पाहिजे..कारण ह्रदयातून मिळणारे मार्गदर्शन हे..आपणस तर सुख..आनंद देतेच पण त्याच बरोबर ते समाज हितकारी असते.. रोज थोडा वेळ तरी आपल्या हृदय स्थानावर जा.. पहा नक्कीच स्वामीना अपेक्षित असणारी अभिव्यक्ती होईल.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...