भोळी भक्ती म्हणजे काय?

Feb 7, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)*

*आजचे चिंतन-मनन*

स्वामी स्वामी जप करता,
स्वामी भेटे भोळ्या भक्ता !
ऐसा माझा देव भोळा,
मात्र नाम घेता,घेतो धावा !!
www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून घ्या..स्वामी स्वामी जप करता..इथे स्वामीं नाम घेण्याचा बोध होतो..आता यात ही आपले मन म्हणते किंवा कुणी तरी सांगते असाच जप करा..हाच जप करा..कुणी स्वामीं..स्वामीं जप करेल..कुणी ओम स्वामी ओम म्हणेल..कुणी ओम श्री स्वामी समर्थ म्हणेल..कुणी श्री स्वामी समर्थ म्हणेल..कुणी गुरुदेव म्हणेल..कुणी श्री गुरुदेव दत्त म्हणेल..जप कोणता करतो यापेक्षा..मुखात नाम येते हे खूप मोठी स्वामीं कृपाच आहे…आता स्वामी नाम तर घेतो..पण मग कुणी म्हणतो असेच घ्या..ही माळ वापरा, इथेच जप करा, अमुक इतकाच जप करा..असे केले तर असे होते..म्हणजेच सेवा बाजूला राहते आपण..नको त्या तांत्रिक, यांत्रिक, शुभ , अशुभ, चूक बरोबर यातच अडकतो..म्हणजेच त्या परब्रह्म चे नाव घेतानाही अनेक आपण आपल्या बुद्धी चे तर्क वितर्क लावतो..खरंतर स्वामीं ना भोळा भक्त आवडतो..काहीच करत नाही पण आपला अहंकार, स्वामीं चरणी अर्पण करतो..त्याला फक्त स्वामीं नाम दिसते.. स्वामीं भक्ती दिसते..बाकी काहीच त्याला समजत नाही..बाकी कोणत्या गोष्टी त तो अडकत नाही.. स्वामीं नाम व आपले प्रामाणिक कर्म म्हणजे स्वामीं सेवा असे ज्याला वाटते तो स्वामीं चा प्रिय भक्त असतो..कारण आपले स्वामीं ही भोळे आहेत..पहा अंगावर वस्त्र आहे का ? फक्त लंगोट आहे..स्वामीं ना आपल्या कडून काहीच नको आहे..हवी आहे ..प्रामाणिक स्वामीं सेवा, प्रामाणिक कर्म..म्हणजेच आपण जे काम करतो त्यात सुद्धा स्वामींना प्रामाणिकपणा हवा आहे..पहा जर हा गुण आपण आपल्यात धारण करण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच स्वामीं कृपेचा वर्षाव होतो..फक्त गरज आपल्यात भोळा भक्ती भाव निर्माण होण्याची..इथे एक गोष्ट कदाचित आपल्या मनात येईल..भोळा भक्ती भाव म्हणजे अंधश्रद्धा.. असे नसून आपणस डोळस स्वामीं भक्ती करायची आहे…म्हणजेच आपणस आपले कर्म १०० % स्वामीं सेवेचा भाव ठेवून करायचे आहे ..कर्म करत असताना आपणस कुणी फसवत नाही ना याचेही भान आवश्यक आहे..कारण स्वामीं ना अंधश्रद्धा बाळगणारे सेवेकरी नाही आवडत..कर्मावर प्रामाणिक श्रद्धा असणारा भक्त आवडतो..आपणस स्वामीं ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे..धन्यवाद स्वामीं..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...