परमशांती मधील स्वरनाद – श्री स्वामी समर्थ

Feb 6, 2023 | Uncategorized, प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८०(पर्व ४ थे भाग ८४)*

*आजचे चिंतन-मनन*

परमशांती मधील स्वरनाद तू ,
शून्या मधील अस्तित्व तू ,
बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,
ऐसा अतर्क्य समर्थ तू !!
www.SwamiVaanni.co.in

स्वामीं भक्तहो…परमशांती मधील स्वरनाद तू !!! आपण अनेकदा कळत न कळत कधी तरी म्हणतो मला शांती हवी आहे..पण ही शांती आहे तरी कुठे..याचे उत्तर मात्र आपणस मिळत नाही..आपण केवळ म्हणतो शांती शांती..मग आपण इतरत्र शांतीला शोधतो.. ही आपण शांती शोधतो.. स्वामीं तर आपणस परम शांती देत आहेत..पण ती आपण ग्रहण करत नाही..ती परम शांती आहे स्वामी नामात, स्वामीं चरणी, स्वामीं ध्यानी..फ़क्त गरज आहे त्या स्वामी नामाच्या स्वराशी एकरूप होण्याची…शून्या मधील अस्तित्व तू ..! शुन्य याला किंमत आहे की नाही आपण सर्वजण जाणतो..पैश्यात 0 नसेल तर काय होईल..परीक्षेत 0 मार्क मिळाले तर काय होते…वेळेत 0 सेकंदाचे…सर्वात महत्वाचे आयुष्याच्या शेवटचा श्वास घेतल्यानंतर आपण कुणीही।असलो तरी बरोबर काय येते ? शून्य..म्हणजेच शून्याला इतके।महत्त्व.. या शून्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे कारण या शून्याच्या पलीकडे जे काही परम सत्य..परमशांती आहे ती म्हणजे ” श्री स्वामी समर्थ” कारण त्याच्या शिवाय कोणतेच अस्तित्व निर्माण होत नाही किंवा लय सुद्धा पावत नाही..बुद्धीच्या ही पलीकडे असलेला ,ऐसा अतर्क्य समर्थ तू !! पहा असा जो समर्था आहे तो कुठे आहे? आपणस हा प्रश्न विचारला की आपण आपल्या बुद्धीचा वापर सुरू करतो…आपल्या बुद्धितील तर्क.. वितर्क…मनातील विचार या द्वारे आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो…बुद्धी वर इतका भार देतों की मन म्हणते हे काही शकय नाही…बुद्धिवाद म्हणतो असे काहीच नाहीये..कारण आपण प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या माप दंडात मोजून पहातो.. पण आपण हे विसरतो किंवा आपणस माहिती नसते..ईश्वर ही बुद्धीने शोधण्यासाठी नाही तर ह्रदयातून हाक मारण्याची शक्ती आहे..पहा अनेक विषय बुद्धी ने सुटत नाहीत तेव्हा आपण म्हणतो ” दिमाग से नहीं दिल से काम करो”
म्हणजेच स्वामीं ची अनुभूती घ्यायची असेल तर ह्रदयातून होईल बुद्धीने नाही…कारण स्वामीं अतर्क्य आहेत..धन्यवाद स्वामीं…कोटी कोटी धन्यवाद…बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...