अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४)

आजचे चिंतन-मनन

अनन्य भक्ती दे समर्था !
अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!
निरंतर ध्यास दे समर्था !
आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !!

www.SwamiVaani.com

स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.. स्वामी आपणस आवश्यक असणारी भौतिक वस्तु आपण मागतं असतो .. पण आपली भौतिक गरज कधीच संपत नाही.. एक गरज संपली कि आपण दुसरे काही तरी मागतच असतो.. इथे आपण स्वामींना जे खरंच मागायचे आहे ते मागत आहोत.. अनन्य भक्ती.. अशी भक्ती जी भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे..इथे संपूर्ण समर्पण भाव आहे..काही होवो स्वामी जे करणार ते योग्यच आहे.. असा भाव.. अनन्य भक्ती ची अवस्था स्वामी कृपेशिवाय नाही प्राप्त होऊ शकत.. त्या साठी कायम आपणस स्वामी चरित्रावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे..अतूट अभेद्य श्रध्दा.. हि श्रध्दा ची उच्च्तम अवस्था आहे.. म्हणजेच कोणताही प्रसंग असो.. मुखातून फक्त स्वामी नामच येते.. किती अडचण असो.. समस्या असो.. स्वामी नामच येते..म्हणजेच इथे आपली श्रद्धा इतकी असावी कि काही होवो स्वामी सेवा सुटता कामा नये…आपल्या मनाला फक्त स्वामी सेवेचाच ध्यास लागावा.. जेव्हा अनन्य भक्ती,अतूट अभेद्य श्रध्दा, निरंतर ध्यास निर्माण होईल तेव्हा आपले जीवन हे आनंदी बनेल.. आणि आपली सेवा हि सेवा न राहता सेवेचा महायज्ञ होईल.. म्हणूनच स्वामींना भक्ती श्रद्धा , विश्वास आणि स्वामी सेवेचा ध्यास मागा.. हे सर्व एका दिवसात मिळेल का? नाही या साठी आपणस अखंड स्वामी नाम सेवा करणे आवश्यक आहे.. आज आता पासून स्वामी सेवेस सुरवात करूया.. धन्यवाद समर्था… !


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...