तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

आजचे चिंतन-मनन

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता !
शरण आलो तुला !!
‘मी’ पणाच्या जाळ्यात,मन हे फसले !
मुक्त कर तू मला !!

स्वामी भक्तहो.. तू सुखकर्ता- सर्व सुखाचे कारण स्वामी आहेत.. पण आपले मन नेहमी सुखात म्हणते कि मी कष्ट केले म्हणून आज हे सुखाचे दिवस आलेत.. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत आपला मी पणा वर येतो.. मी अमुक करतो म्हणून हे घडते.. मी सेवा करतो… खरंच आपण करतो म्हणूनच सुख मिळते का? म्हणजे आपणच सुख कारक आहोत का? चला आता यावर विचार करू मग दुःख आल्यावर का बरं आपण म्हणतो कि मी फार कष्ट केले पण मला यश आले नाही..नशिबात नव्हते.. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते कि आपणस दैववादी वा अंधश्रद्धा वादी नाही बनायचे पण आपणस कर्म करून विसरून जायचे आहे.. म्हणजेच कोणत्याही गोष्टीत आपल्यात मी पणा आपणस आणायचा नाहीये.. म्हणजेच आपणस कर्ते पणा स्वामींना अर्पण करायचा आहे.. पण आपल्यातील हा मी पणा कसा दूर होईल तर.. हा मी पण दूर करण्यासाठी आपणस आपल्या विचारांचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे.. विचारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न नाही करायचा पण त्या विचारांना योग्य ती दिशा देणे महत्वाचे आहे.. हे सर्व तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण आपल्या विचारांना स्वामी नामावर स्थिर करायचे आहे..स्वामी नाम सेवेत सातत्य आणायचे आहे.. या सर्व गोष्टीसाठी आपणस स्वामींना आपल्या शब्दात प्रार्थना करणे आवश्यक आहे.. कारण प्रार्थना जेव्हा ह्रद्यातून येते तेव्हा त्यात आवश्यक भक्ती भाव उतरतो.. चला तर मग स्वामींनाच प्रार्थना करूया– हे समर्था तूच सुखकारक आहेस.. तूच दुःख विनाशक आहेस.. पण माझे मन नेहमी मी पणा मागते.. कृपा कर माझ्यातील मी पणाचा भाव दूर कर.. माझ्यातील मी पणा जोपर्यंत तुझी कृपा होत नाही तोपर्यंत तो दूर होऊ शकत नाही..मला मी पणा च्या जाळ्यातून मुक्त कर.. कारण हे तुझ्या कृपेशिवाय शकय नाही.. धन्यवाद समर्था.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. !!


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...