अशक्य ही शक्य करतील स्वामी

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५२६(पर्व ४ थे भाग ३०)

आजचे चिंतन-मनन

अशक्य ही शक्य करतील स्वामी
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा ,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा |

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर चिंतन मनन काय करणार..कारण तारक मंत्रातील प्रत्येक शब्द हा..तारणहार आहे..स्वामीं भक्त आणि तारक मंत्र.. हे स्वामीं आणि स्वामीं भक्ताच्या नात्याला घट्ट करणारा दोर म्हणा साखळी म्हणा..काय ते भाव आहेत.. मनाला टॉनिक..बुडत्याला आधार..तारक मंत्र म्हणजे..जो स्वामीं भक्ताला तारतो.. भक्ती भाव ह्रदयात उत्पन्न करतो..या विषयी किती ही लिहिले तरी शब्द भांडार कमी पडेल..असो..आपण रोज तारक मंत्र सेवा करत असालच..करत नसाल तर सुरू करा..जगी.. म्हणजे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण सृष्टीत..प्रत्येक जीवाच्या जन्म आणि मृत्यू ही स्वामीं ची लीला आहे..आणि अश्या या ब्रम्हांड नायकाचे आपण बालक आहोत..इथे बालक म्हणजे आपण त्यांचे बाळ आहोत..पहा आपण आपल्या बाळाची कशी काळजी घेतो..हातावरच्या फोडा पेक्षा अधिक..आपण आपल्या बाळाची काळजी घेतो..मग विचार करा आपण स्वामीं आईचे बाळ आहोत..स्वामीं आपली किती काळजी घेतात…हा अनुभव आहे..जो सूक्ष्म असतो..जो अनुभवता आला पाहिजे..कारण आपले मन चांगले झाले की कधी म्हणते का? स्वामीं मुळे झाले ? जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीत शोधू तेव्हा आपणस याचा अनुभव येतो..आपल्याला मनाला सांगता आले पाहिजे..घाबरू नकोस तू स्वामीं चा बाळ आहेस..हा पण इथे ही गोष्ट लक्षात असावी आपले कर्म स्वामीं ना भूषणावह असावे…एखादी गोष्ट आपणस अशक्य वाटत असेल तर..मनाला सांगा अशक्य असे काहीच नाही..कारण अशक्य हा शब्दच मुळात स्वामीं भक्ताला लागू होत नाही..मी फक्त १००% प्रयत्न करणार..आणि जो पर्यंत यश मिळत नाही..तो पर्यंत थांबणार नाही..कारण.. प्रत्येक वेळेस स्वामीं सांगतात की तू या पेक्षा चांगले करू शकतोस.. थांबू नकोस..पहा..सर्व काही शक्य होताना आपणस दिसेल.. धन्यवाद समर्था..! चला स्वामीं ना प्रार्थना करूया..हे समर्था..मी जाणतो की संपूर्ण ब्रम्हांड चा तूच तर चालक आहे..पण माझे मन।हे विसरते.. हे विसरल्या मुळे.. घाबरते..या मनाचा हा विसराळू पणा कायमचा दूर कर..अशक्य हा शब्द आमच्या मनातून..विचारातून काढून टाक.. कारण मी तुझे बालक आहे..आणि तू कधीच आम्हाला भरकटू देत नाहीस..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…!


Share
और पढिये !!

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...