स्वामीं भक्तहो..आजची चिंतन मनन ची ओवी.. यावर आपण चिंतन मनन करावे.. स्वामीं नेमके काय सांगत आहेत..पहिल्या ओवीतून कदाचित आपला संभ्रम निर्माण होईल..जर आपण दुसरी ओवी वाचली नाही तर…देवांचे ही देव स्वामीं आहेत..स्वामीच ब्रम्हा आहेत..स्वामीं च ब्रह्म आहेत..स्वामीच परब्रह्म आहेत..म्हणजेच.. इथे स्वामीं आपणस तुलनात्मक भक्ती न करण्याचा संदेश देत आहेत..आपले काय होते..ही देवता वेगळी..हा देव वेगळा…असे काही नाही..प्रत्येक देवात स्वामीं आहेत.. स्वामीं मध्ये प्रत्येक देव आहे.. म्हणजेच.. देवत्व एकच आहे.. आपणच त्याला विविध नावे देतो..कुणी स्वामीं म्हणेल..कुणी दत्त म्हणेल..कुणी विष्णू म्हणेल..स्वामीच आहेत सर्वत्र..फक्त या ठिकाणी आपली समज कशी आहे..यावर सर्व अवलंबून आहे..म्हणजेच स्वामीं इथे आपणस स्वामीं तुलनात्मक भक्ती न करण्याचा संदेश देत आहेत…कारण तुलना आली की भक्ती मध्ये भाव उतरणार नाही..भाव नसेल तर भक्ती कशी होणार.. हे समर्था आमच्यातील तुलनात्मक भक्ती दूर कर..सर्वत्र तूच आहेस ही समज दे..तुझ्या नामात दंग कर..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद
मन निशंक कसे करावे
निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...