सज्जन कुणाला म्हणावे ?

Feb 4, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२)

आजचे चिंतन-मनन

सज्जनांचे सज्जनत्व वाढव !
दुर्जनांचे दुर्जनत्व घालव !
अवघे विश्व स्वामीमय होवो !
हेचि मागणे समर्था !!
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो कि आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो कि सज्जन नेमके कुणास म्हणायचे.. आपल्या मनात एक व्याख्या असते आणि व्यक्ती नुसार ती बदलत असते.. पण मग सज्जन कुणास म्हणावे.. स्वामी तुम्हींच यावर चिंतन मनन करून घ्या.. प्रत्येक व्यक्ती हि सज्जनच असते.. कारण प्रत्येक व्यक्ती मध्ये चांगले बनायची लालसा असते.. अशी एक व्यक्ती नाही कि तिला दुर्जन बनून आनंद होतो पण तो वेळेनुसार आपल्यात बदल करतो आणि स्वतःला दुर्जनांच्या यादीत बसवतो..आपण सज्जनांची व्याख्या करण्याचा प्रयत्न करूया ” जो कोणत्याही परिस्थितीत स्वामींना भूषणावह असेच आचरण करतो तोच सज्जन” पहा आपला काही तरी व्यक्तिगत फायदा होत आहे पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे नुकसान होते आहे तरीही आपण आपल्या फायदा व्हावा या साठी चुकीचे वर्तन करतो तेव्हा आपण सज्जनांच्या भूमिकेतून दुर्जनांच्या भूमिकेत जातो .. आता आपल्या सर्वांच्या मनात येते कि जर आपण वेळेनुसार आम्हीं तसे वागलो नाही तर आमचे कोणतेच काम होऊ शकत नाही मग आम्ही काय करायचे.. पहा जेव्हा आपण अडचणीत असतो आणि तेव्हाही संयम बाळगतो थोडे थांबतो आणि मग निर्णय घेतो नक्कीच स्वामींना भूषणावह निर्णय घेत असतो.. जेव्हा आपल्या मनात संभ्रम असेल तेव्हा थोडे शांत व्हा स्वामींना प्रार्थना करा मार्गदर्शन करा.. पहा आपला निर्णय हा स्वामींना भूषणावह म्हणजे सज्जन माणसाचा असेलसुरवातीला अवघड वाटेल पण नंतर आपणस यात यश.. जेव्हा प्रत्येक जण असा प्रयत्न करेल तेव्हा सर्व दुर्जनांचे दुर्जनत्व दूर होणार आहे.. आपल्या मनात येते मी एकटा चांगला वागून काय फायदा.. पहा पत्त्याचा बंगला असतो.. त्यातील एक पत्ता काढला तर बंगला पडतो तसेच आपण आपल्यातील दुर्गुण काढला तर इतर लोक हि आपल्यातील दुर्गुण काढतील..सज्जन होतील.. आणि संपूर्ण विश्व् हे स्वामी मय होईल.. पहा किती सुंदर नियोजन आहे आपल्या स्वामींचे फक्त गरज आहे आपल्यातील दुर्गुण काढून चांगले गुण धारण करण्याची म्हणजेच आपल्यात स्वामींना भूषणावह असणारे सज्जनांचे गुण आपल्यात धारण करण्याचा.. चला तर मग आपल्या स्वतःवर कार्य करूया.. धन्यवाद समर्था.. कोटी कोटी धन्यवाद… बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...