स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

Jan 30, 2023 | Uncategorized

Share

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड आहे..आपणस वाटते की स्वामीं नाम जप केला व स्वामींचे स्तोत्र वाचले की झाली सेवा..काहींना वाटते की अजूनही काही इतर देव..देवतांचे स्तोत्र म्हंटलं नाही तर स्वामीं सेवा पूर्ण होत नाही..मग आपण यात आणखी सेवा ऍड करतो..पहा प्रत्येक सेवा ही परिपूर्णच आहे..असे नाही की अमुक मंत्राचा जप केला तरच ती स्वामीं सेवा..म्हणजेच कोणतीही सेवा करा पण ह्रदयातून करा..फक्त स्वामीं नाम घेतले तरी ती स्वामीं ची परिपूर्ण सेवा आहे..पण आपले मन नेहमी सगळी खिचडी करते..ही सेवा केली तर असे होईल..नाही केली तर असे होईल..पहिला हा  चुकीचा विचार मनातून काढून टाका.. आपण कोणतीही सेवा करा पण मनापासून करा..तुम्ही स्वामीं म्हणा, राम म्हणा किंवा श्री स्वामीं समर्थ म्हणा..प्रत्येक हाकेला स्वामीं ओ देतातच.. फक्त ती हाक ह्रदयातून हवी..आता हे झाले सेवेचे.. पण ही सेवा अपूर्ण आहे..जर आपण कर्म आणि सेवा यात भेद करत असू तर..कारण स्वामीं नी आपणस जे प्रापंचिक काम दिले आहे..ते जर आपण फक्त काम म्हणून पहात असू तर आपण स्वामीं सेवा ह्रदयातून करत नाही.. म्हणजेच आपणस जे काम मिळाले आहे ती सुद्धा स्वामीं सेवा आहे..ते काम करताना आपले भाव जर नकारात्मक असतील तर..आपली स्वामीं सेवा ही कायम अपूर्ण असते.. आपल्यावर स्वामीं कृपा होऊच शकत नाही.. म्हणून नेहमी आपण जे काही काम करता त्यात स्वामीं सेवेचा भाव ठेवा..आपण गृहिणी आहात.. तर आपले कर्तव्य आहे की घरातील काम हे स्वामी सेवा म्हणून करा..पहा आनंद मिळेल.. नाहीतर आपणस कायम वाटत राहील मला सुट्टी च नसते..अहो स्वामीं सेवेकरी तोच जो म्हणतो..धन्यवाद स्वामीं मला सेवेची संधी दिली…हेच आपण जी काही नोकरी करतो काम करतो याला सुद्धा लागू होते.. जर आपण काम चुकार पणा करत असू..आपले आचरण हे भ्रष्टाचार करणारे असेल तर..आपण कितीही स्तोत्र मंत्र म्हणत असाल तर ती स्वामीं सेवा कधीच असू शकत नाही..पण आपले आचरण शुद्ध असेल आपण आपल्या प्रत्येक कर्मास स्वामी सेवा मानत असाल तर नक्कीच आपलीं स्वामीं सेवा ही नित्यसेवा आहे..स्वामीं कृपेचा वर्षाव आपल्यावर होत आहे..खरंतर हा आपण स्वतः चिंतन मनन करण्याचा विषय आहे..यावर आपण अधिक चिंतन मनन करा..अजूनही काही प्रश्न असतील विचारा..नक्कीच आपण त्यावर चिंतन मनन करूया..स्वामीं ना अपेक्षित अशी स्वामीं सेवा करूया..स्वामीं नाम व आपले प्रामाणिक कर्म करूया..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

मन निशंक कसे करावे

निशंक - स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम...

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?

चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात? मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात... असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान...खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको...

कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल?

चिंतन- कोणती सेवा केली तर आमची समस्या सुटेल? मनन- कोणतीही सेवा करा..समस्या सुटणार नाही..कारण जो पर्यंत आपला त्या सेवेवर विश्वास नसेल...अनेकदा आपण म्हणतो की अमुक सेवा करतो...तमुक सेवा करतो पण माझी समस्या सुटत नाही...अहो आपण एक नाही अनेक सेवा करतो...जो पर्यंत आपण एका...

स्वामीं नाम

प्रातः काळी उठोन ! आधी करावे नामस्मरण !अंतरी घ्यावे स्वामी चरण ! शुद्धमन करोनी ! संदर्भ - श्री स्वामी चरित्र सारामृत - बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !...

वास्तू दोष निवारण प्रार्थना

स्वामी भक्तहो आपण नेहमी ऐकतो किंवा बोलत असतो कि वास्तू दोष आहे.. पण जर कुणाला विचारले कि वास्तू दोष म्हणजे नेमके काय.. तर नक्कीच आपणस सांगता येणार नाही.. वास्तू दोष असतो किंवा नसतो.. यात आपणस पडायचे नाहीये.. पण आपण ज्या वास्तू मध्ये राहतो तिथे दोष आहे असे आपण जेव्हा...

स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ हरिपाठ स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची...

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ पहा काय बोध होतो...स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा www.chetnakeswar.com स्वामी भक्तो... वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण...

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!! मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..! स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके...

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!! चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही...