मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

Nov 20, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6
श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते… गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक विहीर होती तिथे कणसे भाजण्याची तयारी करण्यात आली.. तिथेच एक कल्पवृक्ष होते त्या खाली महाराज बसले .. त्या झाडाला मधमाश्याचे पोळे होते.. हे कुणाच्याही लक्षात आले नाही.. तिथेच कणसे भाजण्यासाठी सुरवात केली.. कणसे भाजत असताना धूर व अग्नीची दाहकता याचा परिणाम असा झाला कि त्या झाडावरील मधमाश्या उठल्या व सर्वांना चावू लागल्या.. सर्व जण पळू लागले श्री महाराज मात्र जागेवरून उठले नाही..ते स्वस्वरूपात रममाण होते.. सर्व माश्या श्री महाराजांच्या अंगावर बसल्या होत्या.. जसे कि महाराजांनी माश्यांची शाल केली आहे.. हे सर्व पाहून श्री बंकटलाल यांचे हृद्य द्रवित झाले.. त्यांच्या मनात विचार आला कि उगाचच आपण श्री महाराजांना कणसे खाण्यासाठी इथे आणले.. आणि श्री बंकटलाल श्री महाराजांकडे जाऊ लागला.. त्या क्षणी श्री महाराजांनी त्या मध माशांना आपल्या जागी जाण्याची आज्ञा दिली.. ते म्हणाले अरे माझा खरा भक्त माझ्या साठी येत आहे.. त्याला त्रास देऊ नका तुम्ही आपल्या जागेवर जा.. महाराजांनी असे म्हणताच सर्व माश्या झाडावर जाऊन बसल्या.. श्री बंकटलाल यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.. ते महाराजांना म्हणाले.. मी सोनाराला घेऊन येतो काटे काढण्यासाठी.. बंकटलाल सोनाराला घेऊन येतात.. सोनार पहातो तर त्याला एकही काटा दिसत नाही… तेव्हा तेव्हा सोनार म्हणतो कि मला तर काटे दिसत नाहीत.. तेव्हा श्री महाराज म्हणाले काटे काढण्यासाठी चिमट्याची आवश्यकता नाही.. महाराजांनी काही क्षण श्वास रोखला व काही क्षणात सर्व काटे बाहेर आले.. महाराजांचे शरीर पूर्वी प्रमाणे झाले.. हे सर्व पाहून सर्वांनी महाराजांचा जयजयकार केला.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – वरील लीला म्हणजे भक्ती कशी असावी हे सांगण्यासाठीच हि लीला आहे.. पहा ब्रम्हांड नायक कणीस खाण्यासाठी शेतात गेले.. खरे तर हे एक निमित्त होते परीक्षा पाहण्यासाठी..मधमाशी मध देते पण ते अदृश्य रूपाने देते.. कारण आपण मध तेव्हाच खाऊ शकतो जेव्हा तिथे माशी नसेल.. म्हणजेच गुरुकृपा तेव्हाच होते जेव्हा संकट रुपी माशी दूर करू.. संकट रुपी माशी असतानाही जेव्हा आपण अखंड सेवा सुरु ठेवतो.. तेव्हा त्या सेवेचे फलित म्हणजे मधाप्रमाणे गोडवा होय.. जेव्हा आपण संकटाशी दोन हात करतो.. संकटात देखील आपली श्रद्धा ढळत नाही तेव्हा त्याचे फलस्वरूप गोडच असते.. वरील लीलेत कणसे खाण्यासाठी सर्व आली पण मध माश्या आल्यावर सर्वजण पळून गेली.. श्री बंकटलाल मात्र त्याही स्थिती मध्ये श्री महाराजांकडे जाण्यासाठी तयार होते.. त्याचे फलस्वरूप श्री महाराजांनी माश्याना आपल्या जागेवर जाण्याची आज्ञा दिली.. श्री बंकटलाल यांची भक्ती फारच उच्चतम होती.. यातून हाही बोध आपणस मिळतो कि एखादा संकटात असेल तर त्याला मदत करा कारण आज आपण त्याला केलेली मदत हि देखील सेवेचा एक भाग आहे.. इथे कदाचित आपल्यात मनात येइल कि आर्थिक मदत का ? आर्थिक मदत असे नाही तर आपण इथे मानसिक मदत करू शकतो.. आत्म बळ वाढवू शकतो.. मदत हि अनेक प्रकारे होऊ शकते फक्त मदत करताना आपले तसेच समाजाचे तसेच ज्याला आपण मदत करत आहोत त्याचे नुकसान तर होत नाही ना याची देखील आपणस भान ठेवायचे आहे.. चला तर मग आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया –हे समर्था.. आजची तुझी लीला म्हणजे भक्तीचा पाठच म्हणावी लागेल.. आजच्या लीलेतून संकटकाळी सुद्धा कशी भक्ती करावी याची शिकवण दिलीत त्याबद्दल धन्यवाद…जसे भक्ती भाव बंकटलाल यांच्या हृदयात प्रगट झाले.. त्या पात्रतेचे आम्हाला बनव.. हे मध माश्यानो आज पर्यंत आम्हीं आपणस फक्त आपण चावता एवढेच लक्षात ठेवल.. पण मधाची मधुरता तुमच्या शिवाय शक्य नाही हि शिकवण आम्हाला दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. कोणतेही संकट येवो.. आपल्यातील मधुरता आम्हाला आठवावी हीच समर्था प्रार्थना

 


Share
और पढिये !!

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...

जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

!!श्री स्वामी समर्थ!! ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे...

असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।

!!श्री स्वामी समर्थ!! असोनी संसारी जिह्वे वेगु करी । दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ हरिपाठ www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो....संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली इथे आपणस नामाची महती सांगत आहेत..संसारात असताना नाम घ्या..पहा किती सोपे आहे..हाताने प्रापंचिक कर्म..मुखाने...

हरि मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा

!!श्री स्वामी समर्थ!! हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ हरिपाठ पहा नामाचा महिमा..रोज किमान १ माळ स्वामीं नाम जप करूया..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत..मुखाने नाम घ्या..त्या सारखे दुसरे पुण्य...

देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

श्री स्वामी समर्थ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरिपाठ ओवी चिंतन मनन स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची...

खरा कर्ता मी आहे का?

श्री स्वामी समर्थ हे मना मला वाटते की..मी करतो म्हणूनच कार्य होत आहे..पण मी नव्हतो तेव्हाही कार्य सुरू होते..मी नसतानाही कार्य सुरूच असणार आहे..मग मी कसा कर्ता.. कर्ता आणि करविता..तू एक स्वामींनाथा..माझ्यातील कर्ता भाव दूर कर..धन्यवाद समर्था..! www.chetnakeswar.com...

आपले विचार इतरांवर लादू नका!

!!श्री स्वामी समर्थ!! हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..! स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत...

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रोज ११ वेळेस म्हणा

!! श्री स्वामी समर्थ !! स्वामी भक्तहो कोणतीही आर्थिक समस्या नसून आपल्या विचारातील मानसिकता आहे.. आपल्या अंतर्मनातील विचार आहेत.. चला आपले विचार बदल्या.. खालील विचार रोज १ वेळेस किंवा ११ वेळेस म्हणा पहा काय बदल घडतात.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद !! हे मना मला...

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७) प्रेरणादायी बोल प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या...

यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५) प्रेरणादायी बोल हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच...